शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

सर्वत्र पावसाची रिपरिप सुरूच

By admin | Updated: July 16, 2014 00:29 IST

दीड महिन्याच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर वणी, मारेगाव, पांढरकवडा, झरीजामणी तालुक्यात १४ जुलैच्या सायंकाळपासून पावसाची रिपरिप सुरू झाली. दमदार आणि मुरवणी पावसाचे आगमन झाल्याने बळीराजाच्या

वणी : दीड महिन्याच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर वणी, मारेगाव, पांढरकवडा, झरीजामणी तालुक्यात १४ जुलैच्या सायंकाळपासून पावसाची रिपरिप सुरू झाली. दमदार आणि मुरवणी पावसाचे आगमन झाल्याने बळीराजाच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. शेती पिकांसाठी हा पाऊस समाधानकारक असल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहे.यावर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने बळीराजा प्रचंड अडचणीत सापडला आहे़ पावसाळ्याच्या दीड महिन्याच्या कालावधीत मोजून तीनच वेळा पाऊस पडला़ पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी जोमाने खरीपातील कपाशीची पेरणी केली. परंतु त्यानंतर पावसाने दडी मारली. परिणामी बळीराजावर दुबारच नव्हे तर तिबार पेरणी करण्याचे संकट ओढवले. त्यासाठी त्यांना सावकारांचे उंबरठे झीजवावे लागले. घरातील लक्ष्मीचे असले-नसले सोने गहाण ठेवावे लागले. त्यातून दुबार, तिबार पेरणीसाठी कशी तरी त्यांनी बियाण्यांची तजवीज केली. मात्र दुबार, तिबार पेरणी करूनसुध्दा पाऊस न आल्याने पेरलेले बियाणे मातीतच सडले. त्यामुळे बळीराजाला प्रचंड आर्थिक फटका सहन करावा लागला आहे.आता दोन दिवसांपासून शेती पिकांना पोषक असा पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांचा जिवात जीव आला आहे. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य फुलले आहे. गेल्या २४ तासांपासून पाऊस कोसळत असल्याने सर्वत्र गारवा निर्माण झाला आहे. मात्र आता बहुतांश शेतकऱ्यांकडे बियाणे उपलब्ध नसल्याने पुन्हा नव्याने पेरणी कशी करावी, असा यक्षप्रश्न त्यांना सतावत आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी पुन्हा एकदा बळीराजाची धडपड सुरू झाली आहे. कृषी केंद्र चालकांनी शेतकऱ्यांची नाजूक आर्थिक स्थिती बघता बियाणे संपल्याच्या पाट्या लावल्या आहेत. त्यांना उधारीत बियाणे द्यायला ते तयार नाही़ ज्या शेतकऱ्यांकडे पैसे आहे, त्यांना मात्र मागच्या दारातून बियाणे मिळत आहे़ आता बियाणे घ्यायला शेतकऱ्यांकडे पैसे नसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेत्या बियाण्याअभावी पडित राहण्याची भिती वर्तविण्यात येत आहे़ (लोकमत चमू )