शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची दडी, शेतकरी चिंतेत

By admin | Updated: August 24, 2016 01:09 IST

सोयाबीन ऐन फुलोऱ्याच्या स्थिती असताना पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

डोळे आकाशाकडे : सोयाबीन, कापूस करपू लागले, सिंचनासाठी धडपड पुसद : सोयाबीन ऐन फुलोऱ्याच्या स्थिती असताना पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. गत २४ दिवसांपासून पाऊ नसल्याने शेतातील सोयाबीन, कापूस, तूर पिकाने माना टाकल्या आहेत. एक-दोन दिवसात पाऊस आला नाही तर त्याचा परिणाम उत्पन्नावर होण्याची शक्यता आहे. पुसद उपविभागात यंदा सुरूवातीला पावसाने दमदार हजेरी लावली. शेतकऱ्यांनी पेरणी केली. पीक जोमात वाढू लागले. परंतु आता २४ दिवसांपासून उपविभागात पावसाने दडी मारली आहे. बहरलेला खरीप हंगाम धोक्यात सापडला आहे. पावसाअभावी पिकांची वाढ खुटली असून, पिके माना टाकत आहे. खडकाळ जमिनीतील पिके वाळत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पूर्वी कपाशीतून उत्पन्न मिळविणारा तालुक्यातील शेतकरी नगदी पीक असलेल्या सोयाबीनकडे वळला आहे. कपाशीचा लागवड खर्च वाढला आहे. कीड नियंत्रणासाठी मोठी दमछाक होते. त्यामुळे शेतकरी सोयाबीनकडे वळले आहे. तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे क्षेत्र दिसत आहे. परंतु पावसाने दडी मारल्याने पीक माना टाकत आहे. ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा आहे ते शेतकरी ओलित करीत आहे. परंतु ८० टक्के शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. येत्या तीन-चार दिवसात पाऊस न झाल्यास खरिपाची पिके हातून जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गत वर्षी खरिप हंगामाने शेतकऱ्यांना दगा दिला. यावर्षी पिकांची स्थिती चांगली आहे. परंतु आता पावसाची आवश्यकता असताना पाऊस येत नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. शेतीची कामे आटोपली असून, आता पावसाची नितांत गरज असल्याचे शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष नारायण पुलाते यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)