शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
4
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
5
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
6
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
7
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
8
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
9
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
10
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
11
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
12
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
13
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
14
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
15
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
16
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
17
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
18
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
19
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
20
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका

पावसानेच आशा लावून दिला दगा

By admin | Updated: October 5, 2014 23:13 IST

‘पोळ्याच्या हप्त्यात पाऊस आला नसता तर, आता एवढा मोठा खर्च झाला नसता. पाऊस येत नाही आणि कीड सुधरू देत नाही. तेव्हाच उलंगवाडी झाली असती तर आताच्या खर्चातून तरी वाचलो असतो.’ असे आता गावागावातील

ज्ञानेश्वर मुंदे - यवतमाळ ‘पोळ्याच्या हप्त्यात पाऊस आला नसता तर, आता एवढा मोठा खर्च झाला नसता. पाऊस येत नाही आणि कीड सुधरू देत नाही. तेव्हाच उलंगवाडी झाली असती तर आताच्या खर्चातून तरी वाचलो असतो.’ असे आता गावागावातील हतबल शेतकरी म्हणत आहे. करपणाऱ्या पिकांना पोळ््याच्या आठवड्यात झालेल्या पावसाने जिवदान दिले. शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. मात्र त्यानंतर तब्बल महिना झाला तरी पावसाचा थेंब नाही. याकाळात शेतकऱ्यांनी मोठ्या आशाने कीड नियंत्रणासह खातावर मोठा खर्च केला. पोळ््यातल्या पावसाने आशा लावून नंतर मात्र दगा दिला. त्याचवेळी पाऊस आला नसता तर आताचा खर्च वाचला असता. या पावसानेच आम्हाला उद्ध्वस्त केले, असे आता शेतकरी म्हणत आहेत. निसर्गाच्या अवकृपेचा फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या १० वर्षांपासून बसत आहे. कधी कोरडा तर कधी ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागतो. गत वर्षी ओल्या दुष्काळाने उद्ध्वसस्त झालेल्या शेतकऱ्यांना यंदा कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. पेरणीपासूनच पावसाने दडी मारली. दुबार-तिबार पेरणी केली. मात्र पावसाचा पत्ता नसल्याने शेतातील पीक करपू लागले. सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. आता खारीफ हातचा गेला असे म्हणून शेतकऱ्यांनीही मन घट्ट केले होते. अनेकांनी तर शेतात जाणेही सोडून दिले होते. मात्र पोळ््याच्या आठवड्यात पावसाला प्रारंभ झाला. गणेशोत्सवाच्या काळात सारखा पाऊस कोसळला. शेतकऱ्यांची भाबडी आशा पुन्हा जागी झाली. आता खरीप वाचणार असे वाटू लागले. त्यामुळे शेतकरी नव्या जोमाने कामाला लागला. खतांच्या मात्रा देऊ लागला. चढ्या दराने खत खरेदी करू लागला. अशातच सोयाबीनवर मोझॅक आणि इतर किडींनी आक्रमण केले. तर कपाशीवर लाल्याचा प्रकोप वाढला. सुक्ष्म अन्नद्रव्यांसह कीड नियंत्रणासाठी महागडी औषधी फवारू लागला. मात्र कीड नियंत्रणात यायचे नावच नाही. तर पावसाचा थेंब नाही. उन्हाळ््यापेक्षाही कडक उन्ह तापत आहे. त्यामुळे सोयाबीन पूर्णत: उद्ध्वस्त झाला असून, शेतकऱ्यांनी तर काही भागात जनावरे शेतात सोडली. कपाशीही पाण्या अभावी सुकत आहे. पोळ््याच्या आठवड्यात पाऊस पडलाच नसता तर त्याचवेळी उलंगवाडी झाली असती. मात्र पावसाने आशा लागली. होते नव्हते पैसे शेतकऱ्यांनी पुन्हा पिकांवर लावले. परंतु पावसाचा पत्ता नाही आणि कीड नियंत्रणात यायचे नाव घेत नाही. पोळ््याच्या आठवड्यात पाऊस आलाच नसता तर एवढे उद्ध्वस्त झाले नसतो, हातातला पैसा गेला नसता, असे शेतकरी म्हणतात.