शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

पावसानेच आशा लावून दिला दगा

By admin | Updated: October 5, 2014 23:13 IST

‘पोळ्याच्या हप्त्यात पाऊस आला नसता तर, आता एवढा मोठा खर्च झाला नसता. पाऊस येत नाही आणि कीड सुधरू देत नाही. तेव्हाच उलंगवाडी झाली असती तर आताच्या खर्चातून तरी वाचलो असतो.’ असे आता गावागावातील

ज्ञानेश्वर मुंदे - यवतमाळ ‘पोळ्याच्या हप्त्यात पाऊस आला नसता तर, आता एवढा मोठा खर्च झाला नसता. पाऊस येत नाही आणि कीड सुधरू देत नाही. तेव्हाच उलंगवाडी झाली असती तर आताच्या खर्चातून तरी वाचलो असतो.’ असे आता गावागावातील हतबल शेतकरी म्हणत आहे. करपणाऱ्या पिकांना पोळ््याच्या आठवड्यात झालेल्या पावसाने जिवदान दिले. शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. मात्र त्यानंतर तब्बल महिना झाला तरी पावसाचा थेंब नाही. याकाळात शेतकऱ्यांनी मोठ्या आशाने कीड नियंत्रणासह खातावर मोठा खर्च केला. पोळ््यातल्या पावसाने आशा लावून नंतर मात्र दगा दिला. त्याचवेळी पाऊस आला नसता तर आताचा खर्च वाचला असता. या पावसानेच आम्हाला उद्ध्वस्त केले, असे आता शेतकरी म्हणत आहेत. निसर्गाच्या अवकृपेचा फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या १० वर्षांपासून बसत आहे. कधी कोरडा तर कधी ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागतो. गत वर्षी ओल्या दुष्काळाने उद्ध्वसस्त झालेल्या शेतकऱ्यांना यंदा कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. पेरणीपासूनच पावसाने दडी मारली. दुबार-तिबार पेरणी केली. मात्र पावसाचा पत्ता नसल्याने शेतातील पीक करपू लागले. सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. आता खारीफ हातचा गेला असे म्हणून शेतकऱ्यांनीही मन घट्ट केले होते. अनेकांनी तर शेतात जाणेही सोडून दिले होते. मात्र पोळ््याच्या आठवड्यात पावसाला प्रारंभ झाला. गणेशोत्सवाच्या काळात सारखा पाऊस कोसळला. शेतकऱ्यांची भाबडी आशा पुन्हा जागी झाली. आता खरीप वाचणार असे वाटू लागले. त्यामुळे शेतकरी नव्या जोमाने कामाला लागला. खतांच्या मात्रा देऊ लागला. चढ्या दराने खत खरेदी करू लागला. अशातच सोयाबीनवर मोझॅक आणि इतर किडींनी आक्रमण केले. तर कपाशीवर लाल्याचा प्रकोप वाढला. सुक्ष्म अन्नद्रव्यांसह कीड नियंत्रणासाठी महागडी औषधी फवारू लागला. मात्र कीड नियंत्रणात यायचे नावच नाही. तर पावसाचा थेंब नाही. उन्हाळ््यापेक्षाही कडक उन्ह तापत आहे. त्यामुळे सोयाबीन पूर्णत: उद्ध्वस्त झाला असून, शेतकऱ्यांनी तर काही भागात जनावरे शेतात सोडली. कपाशीही पाण्या अभावी सुकत आहे. पोळ््याच्या आठवड्यात पाऊस पडलाच नसता तर त्याचवेळी उलंगवाडी झाली असती. मात्र पावसाने आशा लागली. होते नव्हते पैसे शेतकऱ्यांनी पुन्हा पिकांवर लावले. परंतु पावसाचा पत्ता नाही आणि कीड नियंत्रणात यायचे नाव घेत नाही. पोळ््याच्या आठवड्यात पाऊस आलाच नसता तर एवढे उद्ध्वस्त झाले नसतो, हातातला पैसा गेला नसता, असे शेतकरी म्हणतात.