शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
Tejasvee Ghosalkar: तेजस्वी घोसाळकर मुंबै बँकेच्या संचालकपदी
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

पावसाची दांडी; कास्तकारांच्या डोळ्यात काळजीचे ढग

By admin | Updated: July 13, 2015 00:14 IST

बळीराजाने खरीप हंगाम सुरू होताच आपल्या शेतात कपाशी, सोयाबीन, ज्वारी, तूर पिकाच्या पेरणीला सुरुवात केली.

जमिनीला पडल्या भेगा : कापूस, सोयाबीनचे पीक धोक्यात, पाणी प्रश्न निर्माण होण्याची शक्यताघारफळ : बळीराजाने खरीप हंगाम सुरू होताच आपल्या शेतात कपाशी, सोयाबीन, ज्वारी, तूर पिकाच्या पेरणीला सुरुवात केली. पण पंधरा दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने बळीराजाच्या डोळ्यात आसवे दाटली आहेत. त्याचे डोळे आभाळाकडे लागले असून शेतजमिनीला मात्र भेगा पडलेल्या आहेत.निसर्गाच्या लहरीपणामुळे ओला व कोरड्या दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. यंदा शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील मशागतीची कामे उन्हाळ्यात तातडीने आटोपून घेतली. मृगाचा पाऊस बरसल्याने बळीराजाने पेरणीचीही कामे पूर्ण करून घेतली. मात्र, ऐन पिकांना अंकुर फुटण्याच्या काळातच पाऊस गुल झाला. नुकतीच उगवलेली पिके आता करपण्याचा धोका निर्माण झाला आहे. पाऊस आज येईल, उद्या येईल एवढ्याच आशेवर शेतकरी दिवस कसेबसे लोटत आहे. शेतकऱ्यांना दोन वर्षे सतत नापिकी झालेली आहे. बँकेतून कर्ज काढून यंदा त्याने बियाणे खरेदी केले. मात्र, पावसाविना आता उगवलेले पीक वाया जाण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याचे संकट पुन्हा कोसळणार, अशी शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या हाती पैसाच नसल्याने दुबार पेरणीची वेळ आल्यास शेत पडिक ठेवण्याशिवाय शेतकऱ्यांना दुसरा पर्याय नाही. बियाणे उगवून रोपटी बहरू लागली की, शेतात निंदण, खुरपणी, खत देणे, डवरणी आदी कामांची लगबग सुरू होत असते. पण गेल्या १५ दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने शेतातील कामेच ठप्प पडली आहेत. त्यामुळे मजुरांच्या हाताला कामच नाही. याचा परिणाम छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांवर पडला असून बाजारपेठेत शेतकऱ्यांची गर्दी कमी दिसत आहे. या सर्व परिस्थितीमुळे आधीच कर्जात बुडालेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. (वार्ताहर)