शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची दांडी; कास्तकारांच्या डोळ्यात काळजीचे ढग

By admin | Updated: July 13, 2015 00:14 IST

बळीराजाने खरीप हंगाम सुरू होताच आपल्या शेतात कपाशी, सोयाबीन, ज्वारी, तूर पिकाच्या पेरणीला सुरुवात केली.

जमिनीला पडल्या भेगा : कापूस, सोयाबीनचे पीक धोक्यात, पाणी प्रश्न निर्माण होण्याची शक्यताघारफळ : बळीराजाने खरीप हंगाम सुरू होताच आपल्या शेतात कपाशी, सोयाबीन, ज्वारी, तूर पिकाच्या पेरणीला सुरुवात केली. पण पंधरा दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने बळीराजाच्या डोळ्यात आसवे दाटली आहेत. त्याचे डोळे आभाळाकडे लागले असून शेतजमिनीला मात्र भेगा पडलेल्या आहेत.निसर्गाच्या लहरीपणामुळे ओला व कोरड्या दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. यंदा शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील मशागतीची कामे उन्हाळ्यात तातडीने आटोपून घेतली. मृगाचा पाऊस बरसल्याने बळीराजाने पेरणीचीही कामे पूर्ण करून घेतली. मात्र, ऐन पिकांना अंकुर फुटण्याच्या काळातच पाऊस गुल झाला. नुकतीच उगवलेली पिके आता करपण्याचा धोका निर्माण झाला आहे. पाऊस आज येईल, उद्या येईल एवढ्याच आशेवर शेतकरी दिवस कसेबसे लोटत आहे. शेतकऱ्यांना दोन वर्षे सतत नापिकी झालेली आहे. बँकेतून कर्ज काढून यंदा त्याने बियाणे खरेदी केले. मात्र, पावसाविना आता उगवलेले पीक वाया जाण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याचे संकट पुन्हा कोसळणार, अशी शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या हाती पैसाच नसल्याने दुबार पेरणीची वेळ आल्यास शेत पडिक ठेवण्याशिवाय शेतकऱ्यांना दुसरा पर्याय नाही. बियाणे उगवून रोपटी बहरू लागली की, शेतात निंदण, खुरपणी, खत देणे, डवरणी आदी कामांची लगबग सुरू होत असते. पण गेल्या १५ दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने शेतातील कामेच ठप्प पडली आहेत. त्यामुळे मजुरांच्या हाताला कामच नाही. याचा परिणाम छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांवर पडला असून बाजारपेठेत शेतकऱ्यांची गर्दी कमी दिसत आहे. या सर्व परिस्थितीमुळे आधीच कर्जात बुडालेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. (वार्ताहर)