शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

पावसाची दांडी; कास्तकारांच्या डोळ्यात काळजीचे ढग

By admin | Updated: July 13, 2015 00:14 IST

बळीराजाने खरीप हंगाम सुरू होताच आपल्या शेतात कपाशी, सोयाबीन, ज्वारी, तूर पिकाच्या पेरणीला सुरुवात केली.

जमिनीला पडल्या भेगा : कापूस, सोयाबीनचे पीक धोक्यात, पाणी प्रश्न निर्माण होण्याची शक्यताघारफळ : बळीराजाने खरीप हंगाम सुरू होताच आपल्या शेतात कपाशी, सोयाबीन, ज्वारी, तूर पिकाच्या पेरणीला सुरुवात केली. पण पंधरा दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने बळीराजाच्या डोळ्यात आसवे दाटली आहेत. त्याचे डोळे आभाळाकडे लागले असून शेतजमिनीला मात्र भेगा पडलेल्या आहेत.निसर्गाच्या लहरीपणामुळे ओला व कोरड्या दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. यंदा शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील मशागतीची कामे उन्हाळ्यात तातडीने आटोपून घेतली. मृगाचा पाऊस बरसल्याने बळीराजाने पेरणीचीही कामे पूर्ण करून घेतली. मात्र, ऐन पिकांना अंकुर फुटण्याच्या काळातच पाऊस गुल झाला. नुकतीच उगवलेली पिके आता करपण्याचा धोका निर्माण झाला आहे. पाऊस आज येईल, उद्या येईल एवढ्याच आशेवर शेतकरी दिवस कसेबसे लोटत आहे. शेतकऱ्यांना दोन वर्षे सतत नापिकी झालेली आहे. बँकेतून कर्ज काढून यंदा त्याने बियाणे खरेदी केले. मात्र, पावसाविना आता उगवलेले पीक वाया जाण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याचे संकट पुन्हा कोसळणार, अशी शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या हाती पैसाच नसल्याने दुबार पेरणीची वेळ आल्यास शेत पडिक ठेवण्याशिवाय शेतकऱ्यांना दुसरा पर्याय नाही. बियाणे उगवून रोपटी बहरू लागली की, शेतात निंदण, खुरपणी, खत देणे, डवरणी आदी कामांची लगबग सुरू होत असते. पण गेल्या १५ दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने शेतातील कामेच ठप्प पडली आहेत. त्यामुळे मजुरांच्या हाताला कामच नाही. याचा परिणाम छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांवर पडला असून बाजारपेठेत शेतकऱ्यांची गर्दी कमी दिसत आहे. या सर्व परिस्थितीमुळे आधीच कर्जात बुडालेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. (वार्ताहर)