शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

कपाशी, सोयाबीन पिकावर पावसाचे ढग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 21:53 IST

मोठ्या कष्टानं रानात पिकविलेला कापूस व सोयाबीनचे पीक हाती येण्याच्या अवस्थेत असताना गेल्या दोन दिवसांपासून वणी उपविभागात पावसाळी वातावरण तयार झाले आहे.

ठळक मुद्देशेतकºयांच्या उरात धडकी : हाती येणारे पीक वाचविण्यासाठी धडपड

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : मोठ्या कष्टानं रानात पिकविलेला कापूस व सोयाबीनचे पीक हाती येण्याच्या अवस्थेत असताना गेल्या दोन दिवसांपासून वणी उपविभागात पावसाळी वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे शेतकºयांच्या उरात धडकी भरली आहे. कापूस वेचाई व सोयाबीन कापणीसाठी मजुरच मिळेनासे झाल्याने ७५ टक्के पीक अद्यापही शेतातच उभे आहे. त्यात निसर्गाच्या प्रकोपाची शक्यता निर्माण झाल्याने हे पीक वाचविण्यासाठी शेतकºयांची धडपड सुरू आहे.शुक्रवारी पांढरकवडा परिसरात पावसाने हजेरी लावली, तर शनिवारी वणी व झरी परिसरात आभाळ दाटून आले होते. दुपारच्या सुमारास झरी तालुक्यात मेघगर्जना सुरू होती. पावसाच्या शक्यतेने शेतकºयांची चांगलीच तारांबळ उडाली. या परिसरातील शेतांमध्ये अजूनही ४० ते ५० क्विंटल कापूस शेतात आहे. त्यात मजुरांची वाणवा असल्याने शेतकºयांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. मजुराअभावी कापूस वेचणीला विलंब होत आहे. सोयाबीनचीही तिच अवस्था आहे. सोयाबीनच्या शेंगा भरल्याने ज्यांना जमले त्यांनी सोयाबीनची कापणी केली. मात्र ज्यांना मजुरच मिळाले नाही, त्यांचे सोयाबीन अद्यापही कापणीच्या प्रतीक्षेत शेतात उभे आहे. त्यात आता ढगाळी वातावरण तयार झाल्याने पिकाला धोका निर्माण झाला आहे.वणी, मारेगाव तालुक्यातही तिच स्थिती आहे. या भागातही कापूस व सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणावर आहे. अगोदर या पिकांवर अनेक रोगांच्या प्रादूर्भावाने शेतकरी वैतागला होता. त्यातून सावरतो न सावरतो, तोच आता अचानक पावसाळी वातावरण तयार झाल्याने या पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान खात्याने २२ आॅक्टोबरपर्यंत विदर्भात वादळी पावसाची शक्यता वर्तविली आहे. तसे वातावरणही तयार झाले आहे. काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पिकांना फटका बसला.आंध्र, मराठवाड्यातून मजुरांची आयात, मजुरीचे दर भिडले गगनाला४मजुरांच्या तुटवड्यामुळे शेतकरी हैराण आहेत. झरी, मारेगाव व वणी तालुक्यात तेलंगणा व मराठवाड्यातून मजुरांची आयात केली जात आहे. तेलंगणा व मराठवाड्यातील अनेक मजूर कामाच्या शोधात या भागात येत आहेत. रेल्वेने येणाºया या मजुरांची प्रतीक्षा करीत अनेक शेतकरी आपआपल्या परिसरातील रेल्व स्थानकावर थांबतात. तेथे आलेल्या मजुरांशी कामाबाबत सौदा केला जात आहे. सौदा झाल्यास हे मजूर शेतात कामासाठी येतात. मात्र सध्या दिवाळीचा सण असल्याने या मजुरांचे येणेदेखील थांबले आहे. त्यामुळे काही शेतकरी अदिलाबाद व मराठवाड्यात मजुरांच्या शोधात गेले आहेत.पांढरकवडा तालुक्यातही पिकांचे नुकसानपांढरकवडा : तालुक्यात गुरूवार व शुक्रवारी झालेल्या पावसाने सोयाबीन व कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पांढरकवडा तालुका हा सर्वाधिक कापूस पिकाविणारा तालुका म्हणून ओळखला जातो. त्याखालोखाल शेतकरी सोयाबीनचे उत्पन्न घेतात. सध्या कपाशी वेचणीचा व सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू आहे. अनेक शेतकºयांनी आपल्या शेतातील सोयाबीन काढणे सुरू केले आहे. काहींनी सोयाबीनची कापणी करून शेतातच ढिग मारून ठेवले आहे. परंतु अचानक आलेल्या मुसळधार पावसाने सोयाबीन पिकाचे फारमोठे नुकसान झाले.हीच परिस्थिती कपाशी पिकाची झाली आहे. अनेक शेतकºयांच्या शेतात कापूस फुटलेला आहे. वेचणीची लगबग सुरू असतानाच अचानक आलेल्या पावसाने कापूस खराब झाला आहे. एवढेच नव्हे तर पºहाटीच्या झाडाला लागलेली मोठमोठी बोंडे गळून पडली आहेत.