शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

कपाशी, सोयाबीन पिकावर पावसाचे ढग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 21:53 IST

मोठ्या कष्टानं रानात पिकविलेला कापूस व सोयाबीनचे पीक हाती येण्याच्या अवस्थेत असताना गेल्या दोन दिवसांपासून वणी उपविभागात पावसाळी वातावरण तयार झाले आहे.

ठळक मुद्देशेतकºयांच्या उरात धडकी : हाती येणारे पीक वाचविण्यासाठी धडपड

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : मोठ्या कष्टानं रानात पिकविलेला कापूस व सोयाबीनचे पीक हाती येण्याच्या अवस्थेत असताना गेल्या दोन दिवसांपासून वणी उपविभागात पावसाळी वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे शेतकºयांच्या उरात धडकी भरली आहे. कापूस वेचाई व सोयाबीन कापणीसाठी मजुरच मिळेनासे झाल्याने ७५ टक्के पीक अद्यापही शेतातच उभे आहे. त्यात निसर्गाच्या प्रकोपाची शक्यता निर्माण झाल्याने हे पीक वाचविण्यासाठी शेतकºयांची धडपड सुरू आहे.शुक्रवारी पांढरकवडा परिसरात पावसाने हजेरी लावली, तर शनिवारी वणी व झरी परिसरात आभाळ दाटून आले होते. दुपारच्या सुमारास झरी तालुक्यात मेघगर्जना सुरू होती. पावसाच्या शक्यतेने शेतकºयांची चांगलीच तारांबळ उडाली. या परिसरातील शेतांमध्ये अजूनही ४० ते ५० क्विंटल कापूस शेतात आहे. त्यात मजुरांची वाणवा असल्याने शेतकºयांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. मजुराअभावी कापूस वेचणीला विलंब होत आहे. सोयाबीनचीही तिच अवस्था आहे. सोयाबीनच्या शेंगा भरल्याने ज्यांना जमले त्यांनी सोयाबीनची कापणी केली. मात्र ज्यांना मजुरच मिळाले नाही, त्यांचे सोयाबीन अद्यापही कापणीच्या प्रतीक्षेत शेतात उभे आहे. त्यात आता ढगाळी वातावरण तयार झाल्याने पिकाला धोका निर्माण झाला आहे.वणी, मारेगाव तालुक्यातही तिच स्थिती आहे. या भागातही कापूस व सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणावर आहे. अगोदर या पिकांवर अनेक रोगांच्या प्रादूर्भावाने शेतकरी वैतागला होता. त्यातून सावरतो न सावरतो, तोच आता अचानक पावसाळी वातावरण तयार झाल्याने या पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान खात्याने २२ आॅक्टोबरपर्यंत विदर्भात वादळी पावसाची शक्यता वर्तविली आहे. तसे वातावरणही तयार झाले आहे. काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पिकांना फटका बसला.आंध्र, मराठवाड्यातून मजुरांची आयात, मजुरीचे दर भिडले गगनाला४मजुरांच्या तुटवड्यामुळे शेतकरी हैराण आहेत. झरी, मारेगाव व वणी तालुक्यात तेलंगणा व मराठवाड्यातून मजुरांची आयात केली जात आहे. तेलंगणा व मराठवाड्यातील अनेक मजूर कामाच्या शोधात या भागात येत आहेत. रेल्वेने येणाºया या मजुरांची प्रतीक्षा करीत अनेक शेतकरी आपआपल्या परिसरातील रेल्व स्थानकावर थांबतात. तेथे आलेल्या मजुरांशी कामाबाबत सौदा केला जात आहे. सौदा झाल्यास हे मजूर शेतात कामासाठी येतात. मात्र सध्या दिवाळीचा सण असल्याने या मजुरांचे येणेदेखील थांबले आहे. त्यामुळे काही शेतकरी अदिलाबाद व मराठवाड्यात मजुरांच्या शोधात गेले आहेत.पांढरकवडा तालुक्यातही पिकांचे नुकसानपांढरकवडा : तालुक्यात गुरूवार व शुक्रवारी झालेल्या पावसाने सोयाबीन व कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पांढरकवडा तालुका हा सर्वाधिक कापूस पिकाविणारा तालुका म्हणून ओळखला जातो. त्याखालोखाल शेतकरी सोयाबीनचे उत्पन्न घेतात. सध्या कपाशी वेचणीचा व सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू आहे. अनेक शेतकºयांनी आपल्या शेतातील सोयाबीन काढणे सुरू केले आहे. काहींनी सोयाबीनची कापणी करून शेतातच ढिग मारून ठेवले आहे. परंतु अचानक आलेल्या मुसळधार पावसाने सोयाबीन पिकाचे फारमोठे नुकसान झाले.हीच परिस्थिती कपाशी पिकाची झाली आहे. अनेक शेतकºयांच्या शेतात कापूस फुटलेला आहे. वेचणीची लगबग सुरू असतानाच अचानक आलेल्या पावसाने कापूस खराब झाला आहे. एवढेच नव्हे तर पºहाटीच्या झाडाला लागलेली मोठमोठी बोंडे गळून पडली आहेत.