शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

पाऊस व गारपिटीचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 22:12 IST

सोमवारी सायंकाळी झालेला पाऊस, वादळ आणि गारपिटीचा शेतीपिकासह घरांना तडाखा बसला. लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कळंब तालुक्यातील नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

ठळक मुद्देपिकांचे नुकसान : लासीना येथे बैल विहिरीत पडले, सर्व्हेक्षणाचे आदेश

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : सोमवारी सायंकाळी झालेला पाऊस, वादळ आणि गारपिटीचा शेतीपिकासह घरांना तडाखा बसला. लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कळंब तालुक्यातील नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहे. घारफळ परिसरातील नुकसानीची पाहणी आमदार डॉ.अशोक उईके यांनी केली. सोनखास परिसरातील रबीची पिके भूईसपाट झाली.घारफळ परिसरात गारांचा सडाघारफळ : परिसरातील अनेका गावे सोमवारी गारांच्या तडाख्यात सापडली. पाचखेड, आष्टारामपूर, सौजना, गोंधळी, किन्ही, वाटखेड, येरंडगाव या गावांमध्ये अधिक नुकसान झाले. जवळपास अर्धा तासपर्यंत वादळ, पाऊस सुरू होता. २०० ग्रॅम वजनाच्या गारांचा सर्वत्र सडा पडला होता. अनेकांच्या घरावरील कौल फुटले. पाचखेड येथे गारांमुळे २० बैल जखमी झाले. बादल यांच्या पाचखेड शिवारातील केळीच्या बागेचे नुकसान झाले. आष्टारामपूर येथील सात मजूर जखमी झाल्याने त्यांच्यावर यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचार केले जात आहे. यामध्ये वतीने टेवरे, वंदना नागतोडे, ललिता डंभारे, अंजना कुथटे, गंगाधर नाकतोडे, पाचखेड येथील मधुकर ठोंबरे, श्रीराम नागपूरे यांचा समावेश आहे. दरम्यान मंगळवारी आमदार प्रा. डॉ. अशोक उईके, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, बाभूळगावचे तहसीलदार दिलीप झाडे यांनी प्रभावित परिसराची पाहणी केली नुकसानीचे तत्काळ सर्वेक्षण करण्याचे आदेश आमदार डॉ. उईके यांनी दिले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सतीश मानलवार, संजय राठी, पाचखेडचे सरपंच पंकज देशमुख आदी उपस्थित होते.कळंबमध्ये सर्व्हेक्षणाचे आदेशकळंब : सोमवारी झालेला मुसळधार पाऊस आणि गारपिटीने तालुक्यातील पिकांना मोठा फटका बसला. काढणीवर आलेला हरभरा, भरलेला गहू आणि तोडणीवर आलेला संत्रा हातचा गेला. भाजीपाला पिकांनाही गारपिटीचा मोठा फटका बसला. शासनाने सर्वे करून शासकीय मदत तातडीने द्यावी, अशी मागणी संत्रा उत्पादक शेतकरी चंद्रशेखर चांदोरे यांच्यासह अनेकांनी केली आहे.दरम्यान, गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश महसूल व कृषी यंत्रणेला दिले आहे. यासंदर्भातील अहवाल तातडीने शासनाकडे पाठविला जाईल, अशी माहिती उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी दिली.बैलजोडी विहिरीत पडलीसोनखास : सोमवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसासह गारपिटीचा परिसरातील अनेक गावांना तडाखा बसला. लिंबाच्या आकाराच्या गारांनी गहू, हरभरा जमीनदोस्त केला. लासीना येथे दोन बैल विहिरीत कोसळले. त्यांना सुखरुप बाहेर काढण्यात गावकऱ्यांना यश आले.उत्तरवाढोणा, सोनवाढोणा, मालखेड हेटी, लासीना, वाघापूर, घुई आदी गावांना तडाखा बसला. लासीना येथील आनंदराव केशव गाडेकर व सीताबाई आनंदराव गाडेकर या वृद्ध दाम्पत्याला घरकूलाचा लाभ मिळाला. छतापर्यंत बांधकाम झालेले त्यांचे घर कोसळले. लासीना येथील शेषराव राठोड यांची बैलजोडी गारांचा मार बसल्याने घराकडे निघाली असतानाच विहिरीत कोसळली. गावकºयांनी घटनास्थळी धाव घेऊन जेसीबीच्या मदतीने बैलजोडी बाहेर काढली. लासीना, हेटी येथील विनायक वाघाडे यांच्या घरावरील टीन उडाले.काही गावातील विजेचे खांब कोसळल्याने वीज पुरवठा खंडीत झाला. यवतमाळ रोडवरील जयभवानी आणि जिंगाट ढाब्यावरील टीनपत्रे उडाली. राजन भोरे यांच्या शेतातील शेळी पालनाच्या फार्मवरील टीनपत्रे उडाले.अनेकांचे गारपिट आणि वादळाने नुकसान झाले.