शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रेल्वे भूसंपादन मोबदला वितरण

By admin | Updated: May 7, 2017 00:57 IST

वर्धा-यवतमाळ- नांदेड रेल्वे मार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया राबविली जात असून ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम

धडक अभियान : शासन आपल्या दारी, २७ कोटी शेतकऱ्यांच्या हाती धनादेश लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : वर्धा-यवतमाळ- नांदेड रेल्वे मार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया राबविली जात असून ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राबवून थेट शेतकऱ्यांना त्यांच्या गावात जावून मोबदला दिला जात आहे. याच उपक्रमांतर्गत शनिवारी बाभूळगाव पंचायत समितीत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भारी येथील रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मोबदल्याचे धनादेश देण्यात आले. रेल्वे प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी शासन आपल्या दारी उपक्रम राबवित ३ वर्षांतील प्रकरणांचा ११ महिन्यात निपटारा केला. यातून ३ कोटी रुपयांची बचत झाली. याचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांची प्रशंसाही केली. यावेळी पालकमंत्री मदन येरावार यांनी थेट गावात जाऊन लाभार्थ्यांना मोबदला देत असल्याचे सांगितले. यावेळी खासदार भावना गवळी, आमदार अशोक उईके उपस्थित होते. शुक्रवारी बोरजई येथे जलसंधारण मंत्री राम शिंदे आणि पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते २६ कोटी ७४ लाखांचे वाटप करण्यात आले. यातून तब्बल ११८ हेक्टर ४८ आर. जमीन संपादित केली. यामुळे १८ किलोमीटरच्या रेल्वेमार्गाच्या कामासाठी जमीन उपलब्ध झाली आहे. जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह आणि भूसंपादन अधिकारी विजय भाकरे यांच्या पुढाकारात ही प्रक्रिया राबविली जात आहे. कळंब आणि यवतमाळ तालुक्यातील शेत जमीन संपादनाची प्रक्रिया अखेरच्या टप्प्यात पोहोचली आहे. एकूण ५८ किलोमीटरचा मार्ग येथून जाणार आहे. त्यापैकी २९ किलोमीटर रेल्वे मार्गासाठी जमिनीचे संपादन करून मोबदला वाटप झाले. आता उर्वरित आट प्रकरणांमध्ये १०० कोटींचा मोबदला वितरित केला जाणार आहे. हे उद्दिष्ट एक महिन्यात पूर्ण करण्याचा विडा भूसंपादन विभागाने उचलला आहे. एकरकमी मिळालेली रक्कम शेतकऱ्यांसाठी लाभाची ठरत आहे. त्यांना यातून इतरत्र मालमत्ता खरेदी करता येणार आहे. शिवाय चार पट मोबदला मिळत असल्याने न्यायालयीन प्रक्रियेवर होणाऱ्या खर्चातूनही त्यांची सुटका झाली.