शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेमार्गाच्या भूसंपादनाचे अवॉर्ड थांबले

By admin | Updated: January 19, 2016 03:39 IST

जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यावश्यक असलेल्या वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाच्या कामाला अद्यापही ग्रहण लागले

वर्धा-यवतमाळ-नांदेड मार्ग : रूळाचे अलायमेंट बदलल्याने निधी वाटपात तांत्रिक अडचणयवतमाळ : जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यावश्यक असलेल्या वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाच्या कामाला अद्यापही ग्रहण लागले आहे. त्या मार्गाच्या भूसंपादनासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त असतानाही त्याला वेळोवेळी इतर विभागाच्या कामात जुंपले जाते. त्यामुळे २००८-०९ पासूनची भूसंपादन प्रकरणे रेंगाळली आहेत. आता तर रेल्वे मार्गाचे अलायमेंट निश्चित नसल्याने जमिनीचे अवॉर्ड करण्याची प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. एकूण २८४ किलोमिटर लांबीच्या या प्रस्तावित मार्गाचा सर्वाधिक म्हणजे १८० किलोमीटरचा भाग यवतमाळ जिल्ह्यात येतो. कळंब तालुक्यातून जिल्हा प्रशासनाने भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली यात १४० शेतकऱ्यांची ४५ हेक्टर जमिन लोहमार्गात जाणार आहे. लोहमार्गासाठी भूसंपादीत करण्यासाठी अनेक वर्षांपासून नियमित भूसंपादन अधिकारीच नव्हता. त्यामुळे २००८-०९ पासूनची प्रकरणे येथे प्रलंबित होती. उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांच्या रुपाने पूर्णवेळ भूसंपादन अधिकारी मिळाला. मात्र दुर्देवाने येथेही पाठ सोडली नाही. भाकरे यांच्याकडे रोहयो त्यानंतर महसूल यांसारख्या व्यस्त विभागांचा प्रभार देण्यात आला. परिणामी भूसंपादनाची प्रक्रिया आणखी मंदावली. तरीही या काळात अकरा प्रकरणांचा नवीन भूसंपादन कायद्यानुसार निपटारा करण्यात आला. ही प्रकरणे अंतिम निवाड्यासाठी ठेवली असतानाच रेल्वे रुळाच्या अलायमेंटचा प्रश्न निर्माण झाला. यामध्ये प्रत्यक्ष ज्या शेतकऱ्यांची जमिन गेली त्यांच्याऐवजी इतर कोणाला लाभ मिळण्याची शक्यता निर्माण झाली. हे टाळण्यासाठीच निकाली निघालेल्या अकरा प्रकरणांचे अवॉर्ड थांबविण्यात आले. आता रेल्वेच्या तांत्रिक विभागाकडून रेल्वे मार्गाचे अलायमेंट निश्चित झाल्यानंतरच कारवाई केली जाणार आहे व शेतकऱ्यांना मोबदलाही देण्यात येणार आहे. जिल्हावासीयांची या रेल्वे मार्गासंदर्भात मोठी अपेक्षा आहे. त्यासाठी तब्बल ५५० हेक्टर शेतजमिन भूसंपादित करावी लागणार आहे. या रेल्वे मार्गावर एकूण २८ स्टेशन प्रस्तावित आहेत. त्यामध्ये जिल्हयातील कळंब, तळेगाव, यवतमाळ, बोथबोडन, लाडखेड, तपोना, दारव्हा, अंतरगाव, हरसूल, वाई, दिग्रस, बेलवन, पुसद, हर्षी, शिळोणा, उमरखेड हे स्टेशन राहणार आहेत. या मार्गावर एकूण सहा बोगदे राहणार आहेत. या मार्गाच्या कामाला खऱ्या अर्थाने गती देण्यासाठी प्रशासनाकडूनच प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्याशिवाय जिल्हावासियांचे रेल्वेचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणार नाही. (कार्यालय प्रतिनिधी)