शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
5
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
6
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
7
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
8
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
9
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
10
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
11
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
12
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
13
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
14
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
15
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
18
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
19
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
20
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट

रेल्वेमार्गाच्या भूसंपादनाचे अवॉर्ड थांबले

By admin | Updated: January 19, 2016 03:39 IST

जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यावश्यक असलेल्या वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाच्या कामाला अद्यापही ग्रहण लागले

वर्धा-यवतमाळ-नांदेड मार्ग : रूळाचे अलायमेंट बदलल्याने निधी वाटपात तांत्रिक अडचणयवतमाळ : जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यावश्यक असलेल्या वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाच्या कामाला अद्यापही ग्रहण लागले आहे. त्या मार्गाच्या भूसंपादनासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त असतानाही त्याला वेळोवेळी इतर विभागाच्या कामात जुंपले जाते. त्यामुळे २००८-०९ पासूनची भूसंपादन प्रकरणे रेंगाळली आहेत. आता तर रेल्वे मार्गाचे अलायमेंट निश्चित नसल्याने जमिनीचे अवॉर्ड करण्याची प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. एकूण २८४ किलोमिटर लांबीच्या या प्रस्तावित मार्गाचा सर्वाधिक म्हणजे १८० किलोमीटरचा भाग यवतमाळ जिल्ह्यात येतो. कळंब तालुक्यातून जिल्हा प्रशासनाने भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली यात १४० शेतकऱ्यांची ४५ हेक्टर जमिन लोहमार्गात जाणार आहे. लोहमार्गासाठी भूसंपादीत करण्यासाठी अनेक वर्षांपासून नियमित भूसंपादन अधिकारीच नव्हता. त्यामुळे २००८-०९ पासूनची प्रकरणे येथे प्रलंबित होती. उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांच्या रुपाने पूर्णवेळ भूसंपादन अधिकारी मिळाला. मात्र दुर्देवाने येथेही पाठ सोडली नाही. भाकरे यांच्याकडे रोहयो त्यानंतर महसूल यांसारख्या व्यस्त विभागांचा प्रभार देण्यात आला. परिणामी भूसंपादनाची प्रक्रिया आणखी मंदावली. तरीही या काळात अकरा प्रकरणांचा नवीन भूसंपादन कायद्यानुसार निपटारा करण्यात आला. ही प्रकरणे अंतिम निवाड्यासाठी ठेवली असतानाच रेल्वे रुळाच्या अलायमेंटचा प्रश्न निर्माण झाला. यामध्ये प्रत्यक्ष ज्या शेतकऱ्यांची जमिन गेली त्यांच्याऐवजी इतर कोणाला लाभ मिळण्याची शक्यता निर्माण झाली. हे टाळण्यासाठीच निकाली निघालेल्या अकरा प्रकरणांचे अवॉर्ड थांबविण्यात आले. आता रेल्वेच्या तांत्रिक विभागाकडून रेल्वे मार्गाचे अलायमेंट निश्चित झाल्यानंतरच कारवाई केली जाणार आहे व शेतकऱ्यांना मोबदलाही देण्यात येणार आहे. जिल्हावासीयांची या रेल्वे मार्गासंदर्भात मोठी अपेक्षा आहे. त्यासाठी तब्बल ५५० हेक्टर शेतजमिन भूसंपादित करावी लागणार आहे. या रेल्वे मार्गावर एकूण २८ स्टेशन प्रस्तावित आहेत. त्यामध्ये जिल्हयातील कळंब, तळेगाव, यवतमाळ, बोथबोडन, लाडखेड, तपोना, दारव्हा, अंतरगाव, हरसूल, वाई, दिग्रस, बेलवन, पुसद, हर्षी, शिळोणा, उमरखेड हे स्टेशन राहणार आहेत. या मार्गावर एकूण सहा बोगदे राहणार आहेत. या मार्गाच्या कामाला खऱ्या अर्थाने गती देण्यासाठी प्रशासनाकडूनच प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्याशिवाय जिल्हावासियांचे रेल्वेचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणार नाही. (कार्यालय प्रतिनिधी)