शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

विदर्भाच्या वीज कर्मचाऱ्यांना रायगडाची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 19:49 IST

३ जून रोजी महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळाने धडक दिली. त्यात रायगड जिल्ह्यात अतोनात नुकसान झाले. रायगडाचे जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी विदर्भातील वीज कर्मचाऱ्यांची अतिरिक्त कुमक बोलाविली गेली.

ठळक मुद्दे३५८ जण तातडीने रवाना निसर्ग चक्रीवादळानंतर युद्धपातळीवर दुरुस्ती सुरू

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निसर्ग चक्रीवादळाच्या धुमाकुळाने निसर्गसंपन्न रायगड जिल्ह्यात पायाभूत सुविधांची दाणादाण उडाली. पंधरवाडा लोटूनही महावितरणचे उद्ध्वस्त झालेले जाळे दुरुस्त होऊ शकलेले नाही. अखेर रायगडाचे जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी विदर्भातील वीज कर्मचाऱ्यांची अतिरिक्त कुमक बोलाविली गेली.रायगडाची हाक येताच तब्बल ३५८ वीज कर्मचारी, अधिकारी प्रतिनियुक्तीवर गेले. स्वजिल्ह्यात पावसाळी वातावरणामुळे दुरुस्तीची कामे प्रलंबित असताना आणि राज्यात कोरोनाचे भीतीदायक वातावरण असतानाही हे कर्मचारी मंगळवारीच रवाना झाले.३ जून रोजी महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळाने धडक दिली. त्यात रायगड जिल्ह्यात अतोनात नुकसान झाले. विशेषत: वीज महावितरणची संपूर्ण यंत्रणा जमीनदोस्त झाली. त्यामुळे १५ दिवसांपासून तेथील वीज पुरवठा ठप्प आहे. पिण्याचे पाणी व इतर समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे महावितरणची नेटवर्कची युद्धपातळीवर दुरुस्ती करण्यासाठी महावितरण संचालकांनी (संचालन) महाराष्ट्रातून अतिरिक्त कर्मचारी तातडीने रायगडात प्रतिनियुक्तीवर पाचारण केले. विशेष म्हणजे सोमवारी हे आदेश धडकताच मंगळवारी सकाळीच ३५८ कर्मचारी रायगडकडे रवाना झाले. यात नाशिक व औरंगाबाद मंडळातील कर्मचाऱ्यांचाही नगण्य समावेश असला तरी तब्बल सव्वादोनशे कर्मचारी विदर्भातील आहेत.यात यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा विभागातून सहायक अभियंत्यासह आठ कर्मचारी, पुसद विभागातून उपकार्यकारी अभियंत्यासह नऊ तर यवतमाळ विभागातून उपकार्यकारी अभियंत्यासह ११ जण रायगड जिल्ह्यात प्रतिनियुक्तीवर गेले आहे.

टॅग्स :electricityवीज