शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
3
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
4
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
5
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
6
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
7
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
8
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
9
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
10
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
11
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
12
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
13
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
14
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
15
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
16
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
17
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
18
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
19
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
20
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

पावसाळा संपताच रेतीघाट तस्करांच्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2021 05:00 IST

रेती घाट लिलाव झाल्यावर या रेतीघाटावर लिलाव घेणाऱ्यांची करडी नजर असते. त्यामुळे रेतीची तस्करी करणे कठीण असते. रेती लिलाव होण्यापूर्वीच हे रेती तस्कर चोरट्या मार्गाने या रेतीचा साठा करत आहे. मागील आठवड्यात १५ दिवस पाऊस कोसळला नाही. त्यामुळे काही रेती घाटापर्यंत पोहोचण्याचे मार्ग सुरू होताच, अंधाराचा फायदा घेत रेती तस्करांनी रेतीचा साठा करणे सुरू केले आहे. परंतु आणखी अचानक तालुक्यात पावसाचे आगमन झाल्याने रेती तस्करीला ‘ब्रेक’ लागला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : यावर्षी धो-धो कोसळणारा पाऊस कमी होताच तालुक्यातील रेती घाटावरील रेतीची तस्करी करण्याचे नियोजन रेती तस्करांनी आखले आहे. दोन आठवडे पाऊस गायब होताच, रेती तस्करीला सुरुवात झाली असून महसूल प्रशासन आणि पोलीस विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या सुमारास या रेती तस्करांकडून रेतीचा वारेमाप उपसा केला जात आहे. तालुक्यात वर्धा नदीवरील कोसारा, दांडगाव गाडेगाव आदी  ठिकाणी रेती घाट आहे, तर निर्गुडा नदी आणि इतर मोठ्या नाल्यांवरसुद्धा रेतीचे मुबलक साठे आहेत. गेल्यावर्षी शेवटच्या टप्प्यात जिल्हा प्रशासनाने या रेतीघाटाचे लिलाव करून हे रेती घाट तीन वर्षांच्या कालावधीनंतर खुले केले होते. यावर्षीसुद्धा तालुक्यातील सर्वच रेती घाट लिलाव होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. रेती घाट लिलाव झाल्यावर या रेतीघाटावर लिलाव घेणाऱ्यांची करडी नजर असते. त्यामुळे रेतीची तस्करी करणे कठीण असते. रेती लिलाव होण्यापूर्वीच हे रेती तस्कर चोरट्या मार्गाने या रेतीचा साठा करत आहे. मागील आठवड्यात १५ दिवस पाऊस कोसळला नाही. त्यामुळे काही रेती घाटापर्यंत पोहोचण्याचे मार्ग सुरू होताच, अंधाराचा फायदा घेत रेती तस्करांनी रेतीचा साठा करणे सुरू केले आहे. परंतु आणखी अचानक तालुक्यात पावसाचे आगमन झाल्याने रेती तस्करीला ‘ब्रेक’ लागला आहे. रेतीला मिळणारे दर पाहता तस्कराची संख्या वाढली आहे. स्थानिक पुढारी राजकीय आश्रय मिळवत रेती तस्करीच्या व्यवसायात येत असल्याचे काही घटनांवरून उघड होत आहे. आगामी सणासुदीचे दिवस पाहता आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांची व्यस्तता पाहता, या रेती चोरीला उधाण येण्याची शक्यता आहे. प्रशासकीय कर्मचारी  सुट्ट्यांमध्ये बाहेरगावी जाणार असल्याने नेमका याचा फायदा उचलत मोठ्या प्रमाणात रेती तस्करी होण्याची भीती व्यक्त होत आहे. 

 शासनाने रेतीघाटांचा लिलाव करण्याची मागणी  - रेतीचा चढा दर आणि तस्करीतून होणारी कमाई पाहता, या व्यवसायात अनेकजण येत आहेत. जिल्हा प्रशासन या रेती घाटाचे लवकर लिलाव करत नसल्याने रेती तस्करीला चांगलाच वाव मिळत आहे. तालुका प्रशासनाने डोळ्यांत तेल घालून जरी या रेती घाटाचे रक्षण केले तरी रेती चोरीच्या घटना घडणारच आहेत. त्यात राजकीय दबाव प्रशासनावर येत असतो. त्यामुळे रेती तस्करी रोखताना  तालुका प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते. त्याचा परिणाम रेती लिलावाच्या रकमेवर होतो. त्यापेक्षा जिल्हा प्रशासनाने या रेती घाटाचे लवकर लिलाव करावे, अशी मागणी रेती घाट खरेदीदारांकडून होत आहे.

 

टॅग्स :sandवाळू