शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
4
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
5
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
6
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
7
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
8
Stock Market Today: शेअर बाजाराचं फ्लॅट ओपनिंग, १११ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; फार्मा-रियल्टी शेअर्स आपटले
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
10
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
11
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
12
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
13
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
14
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
15
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
16
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
17
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
18
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
19
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
20
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला

रबी ५० हजार हेक्टरने घटणार

By admin | Updated: October 30, 2014 22:57 IST

निसर्गाचा लहरीपणा, वातावरणातील बदल, वीज संकट आणि खरिपाने दिलेला दगा आदी कारणांनी जिल्ह्यातील रबीचे क्षेत्र यंदा तब्बल ५० ते ६० हजार हेक्टरने घटण्याची शक्यता आहे. प्रकल्पात पुरेसे पाणी

शेतकरी धास्तावले : थंडीचाही पत्ता नाही, वीज संकट कायम ज्ञानेश्वर मुंदे - यवतमाळ निसर्गाचा लहरीपणा, वातावरणातील बदल, वीज संकट आणि खरिपाने दिलेला दगा आदी कारणांनी जिल्ह्यातील रबीचे क्षेत्र यंदा तब्बल ५० ते ६० हजार हेक्टरने घटण्याची शक्यता आहे. प्रकल्पात पुरेसे पाणी असले तरी कालवे नादुरुस्त असल्याने सिंचनातही अडसर येणार आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांनी रबी लागवड करताना हात आखडता घेण्याचा निर्णय घेतला आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा यंदा शेतकऱ्यांना जबर तडाखा बसला. अपुऱ्या पावसाने खरीप हातचा गेला. सोयाबीनच्या ३० किलो बॅगला ८० किलोचा उतारा येत आहे. मजुरीही यातून निघत नाही. कापसाचीही अशीच अवस्था आहे. एकरी आठ ते दहा हजार रुपये खर्च करूनही निम्मे पैसे निघण्याची शक्यता नाही. दोनही नगदी पीक हातचे गेल्याने शेतकरी धास्तावला आहे. अशातच रबी हंगामाला प्रारंभ होत आहे. मात्र शेतकरी रबी हंगामाच्या मन:स्थितीत दिसत नाही. परिणामी जिल्ह्याच्या रबी हंगामाच्या क्षेत्रात प्रचंड घट येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात गहू, हरभरा यासह सूर्यफुल आदी पिके रबी हंगामात घेतली जातात. कृषी विभागाने रबी हंगामाचे नियोजन केले असून यंदा एक लाख २६ हजार ८०४ हेक्टरवर रबीची पेरणी होणे अपेक्षित आहे. त्यात ८४ हजार ९९२ हेक्टर हरभरा आणि ३९ हजार २९२ हेक्टर गहू व इतर पिकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे गतवर्षी जिल्ह्यात एक लाख ८० हजार ५७० हेक्टरवर रबीची पेरणी झाली होती. त्यात हरभऱ्याचे क्षेत्र एक लाख ४० हजार ५६७ हेक्टर होते. तर गहू ३४ हजार ४९९ हेक्टरवर पेरण्यात आला होता. यंदा गतवर्षीच्या हरभरा क्षेत्रापेक्षाही कमी क्षेत्रावर गहू-हरभराची लागवड होणार असल्याचे कृषी विभागाच्या नियोजनावरून दिसत आहे. तब्बल ५३ हजार ७६६ हेक्टर गतवर्षी पेक्षा यंदा रबीचे कमी क्षेत्र राहणार आहे. रबीच्या क्षेत्रात घट येण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यातील महत्वाचे कारण म्हणजे वीज भारनियमन होय. पुरेसे पाणी असतानाही खरिपातच शेतकऱ्यांंना सिंचन करता आले नाही. दोन ते तीन तास वीज मिळत असल्याने ओलित करणे अशक्य होते. हीच स्थिती रबी हंगामातही राहण्याची शक्यता असून उभे पीक डोळ्याने वाळताना पाहण्यापेक्षा पेरणीच न केलेली बरी, असा अनेक शेतकऱ्यांचा सध्या तरी सूर दिसत आहे. गतवर्षी झालेल्या गारपिटीनेही शेतकरी यावर्षी पेरणीसाठी पुढे येताना दिसत नाही. ऐन हरभरा काढण्याच्यावेळी प्रचंड गारपीट झाली. गहू, हरभरा पीक उद्ध्वस्त झाले. यंदाही निसर्गाचा लहरीपणा दिसत आहे. ऐन सोयाबीन काढणीच्या वेळी ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यामुळे अनेकांची पाचावर धारण बसली होती. या सर्व बाबींचा परिणाम रबी हंगामाच्या क्षेत्रावर होत आहे.