शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
6
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
7
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
8
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
9
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
10
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
11
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
12
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
13
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
14
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
15
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
16
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
17
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
18
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
19
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
20
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
Daily Top 2Weekly Top 5

रबी ५० हजार हेक्टरने घटणार

By admin | Updated: October 30, 2014 22:57 IST

निसर्गाचा लहरीपणा, वातावरणातील बदल, वीज संकट आणि खरिपाने दिलेला दगा आदी कारणांनी जिल्ह्यातील रबीचे क्षेत्र यंदा तब्बल ५० ते ६० हजार हेक्टरने घटण्याची शक्यता आहे. प्रकल्पात पुरेसे पाणी

शेतकरी धास्तावले : थंडीचाही पत्ता नाही, वीज संकट कायम ज्ञानेश्वर मुंदे - यवतमाळ निसर्गाचा लहरीपणा, वातावरणातील बदल, वीज संकट आणि खरिपाने दिलेला दगा आदी कारणांनी जिल्ह्यातील रबीचे क्षेत्र यंदा तब्बल ५० ते ६० हजार हेक्टरने घटण्याची शक्यता आहे. प्रकल्पात पुरेसे पाणी असले तरी कालवे नादुरुस्त असल्याने सिंचनातही अडसर येणार आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांनी रबी लागवड करताना हात आखडता घेण्याचा निर्णय घेतला आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा यंदा शेतकऱ्यांना जबर तडाखा बसला. अपुऱ्या पावसाने खरीप हातचा गेला. सोयाबीनच्या ३० किलो बॅगला ८० किलोचा उतारा येत आहे. मजुरीही यातून निघत नाही. कापसाचीही अशीच अवस्था आहे. एकरी आठ ते दहा हजार रुपये खर्च करूनही निम्मे पैसे निघण्याची शक्यता नाही. दोनही नगदी पीक हातचे गेल्याने शेतकरी धास्तावला आहे. अशातच रबी हंगामाला प्रारंभ होत आहे. मात्र शेतकरी रबी हंगामाच्या मन:स्थितीत दिसत नाही. परिणामी जिल्ह्याच्या रबी हंगामाच्या क्षेत्रात प्रचंड घट येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात गहू, हरभरा यासह सूर्यफुल आदी पिके रबी हंगामात घेतली जातात. कृषी विभागाने रबी हंगामाचे नियोजन केले असून यंदा एक लाख २६ हजार ८०४ हेक्टरवर रबीची पेरणी होणे अपेक्षित आहे. त्यात ८४ हजार ९९२ हेक्टर हरभरा आणि ३९ हजार २९२ हेक्टर गहू व इतर पिकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे गतवर्षी जिल्ह्यात एक लाख ८० हजार ५७० हेक्टरवर रबीची पेरणी झाली होती. त्यात हरभऱ्याचे क्षेत्र एक लाख ४० हजार ५६७ हेक्टर होते. तर गहू ३४ हजार ४९९ हेक्टरवर पेरण्यात आला होता. यंदा गतवर्षीच्या हरभरा क्षेत्रापेक्षाही कमी क्षेत्रावर गहू-हरभराची लागवड होणार असल्याचे कृषी विभागाच्या नियोजनावरून दिसत आहे. तब्बल ५३ हजार ७६६ हेक्टर गतवर्षी पेक्षा यंदा रबीचे कमी क्षेत्र राहणार आहे. रबीच्या क्षेत्रात घट येण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यातील महत्वाचे कारण म्हणजे वीज भारनियमन होय. पुरेसे पाणी असतानाही खरिपातच शेतकऱ्यांंना सिंचन करता आले नाही. दोन ते तीन तास वीज मिळत असल्याने ओलित करणे अशक्य होते. हीच स्थिती रबी हंगामातही राहण्याची शक्यता असून उभे पीक डोळ्याने वाळताना पाहण्यापेक्षा पेरणीच न केलेली बरी, असा अनेक शेतकऱ्यांचा सध्या तरी सूर दिसत आहे. गतवर्षी झालेल्या गारपिटीनेही शेतकरी यावर्षी पेरणीसाठी पुढे येताना दिसत नाही. ऐन हरभरा काढण्याच्यावेळी प्रचंड गारपीट झाली. गहू, हरभरा पीक उद्ध्वस्त झाले. यंदाही निसर्गाचा लहरीपणा दिसत आहे. ऐन सोयाबीन काढणीच्या वेळी ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यामुळे अनेकांची पाचावर धारण बसली होती. या सर्व बाबींचा परिणाम रबी हंगामाच्या क्षेत्रावर होत आहे.