शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
4
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
5
'या' केसांच्या तेलामुळे गुंतवणूकदार झाले मालामाल! एका दिवसात २०% नफा, स्टॉक झाला रॉकेट!
6
"एक, दोन नव्हे, पत्नीने केली पाच लग्नं, आता दिरासोबत करतेय प्रेमाचे चाळे’’, त्रस्त पतीची पोलिसांत धाव 
7
Crime: शिक्षिकाचे शाळेतच नको ते उद्योग; २४ विद्यार्थिनींसोबत...; नराधमाला अटक!
8
IND vs ENG: ऋषभ पंत-केएल राहुलच्या शतकानंतर इंग्लंडच्या माजी गोलंदाजाचा आरोप, अंपायरनाही सुनावलं...
9
५ वर्षात चौपट झाला गुंतवणूकदारांचा पैसा, आता प्रत्येक शेअरवर मिळणार डिविडेंड; तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
11
इराणच्या बाजुलाच आहे अमेरिकन लष्कराचा ताफा, कशासाठी झाला आहे वापर?
12
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
13
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
14
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
15
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
16
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
17
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
18
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
19
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
20
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  

रबी ५० हजार हेक्टरने घटणार

By admin | Updated: October 30, 2014 22:57 IST

निसर्गाचा लहरीपणा, वातावरणातील बदल, वीज संकट आणि खरिपाने दिलेला दगा आदी कारणांनी जिल्ह्यातील रबीचे क्षेत्र यंदा तब्बल ५० ते ६० हजार हेक्टरने घटण्याची शक्यता आहे. प्रकल्पात पुरेसे पाणी

शेतकरी धास्तावले : थंडीचाही पत्ता नाही, वीज संकट कायम ज्ञानेश्वर मुंदे - यवतमाळ निसर्गाचा लहरीपणा, वातावरणातील बदल, वीज संकट आणि खरिपाने दिलेला दगा आदी कारणांनी जिल्ह्यातील रबीचे क्षेत्र यंदा तब्बल ५० ते ६० हजार हेक्टरने घटण्याची शक्यता आहे. प्रकल्पात पुरेसे पाणी असले तरी कालवे नादुरुस्त असल्याने सिंचनातही अडसर येणार आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांनी रबी लागवड करताना हात आखडता घेण्याचा निर्णय घेतला आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा यंदा शेतकऱ्यांना जबर तडाखा बसला. अपुऱ्या पावसाने खरीप हातचा गेला. सोयाबीनच्या ३० किलो बॅगला ८० किलोचा उतारा येत आहे. मजुरीही यातून निघत नाही. कापसाचीही अशीच अवस्था आहे. एकरी आठ ते दहा हजार रुपये खर्च करूनही निम्मे पैसे निघण्याची शक्यता नाही. दोनही नगदी पीक हातचे गेल्याने शेतकरी धास्तावला आहे. अशातच रबी हंगामाला प्रारंभ होत आहे. मात्र शेतकरी रबी हंगामाच्या मन:स्थितीत दिसत नाही. परिणामी जिल्ह्याच्या रबी हंगामाच्या क्षेत्रात प्रचंड घट येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात गहू, हरभरा यासह सूर्यफुल आदी पिके रबी हंगामात घेतली जातात. कृषी विभागाने रबी हंगामाचे नियोजन केले असून यंदा एक लाख २६ हजार ८०४ हेक्टरवर रबीची पेरणी होणे अपेक्षित आहे. त्यात ८४ हजार ९९२ हेक्टर हरभरा आणि ३९ हजार २९२ हेक्टर गहू व इतर पिकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे गतवर्षी जिल्ह्यात एक लाख ८० हजार ५७० हेक्टरवर रबीची पेरणी झाली होती. त्यात हरभऱ्याचे क्षेत्र एक लाख ४० हजार ५६७ हेक्टर होते. तर गहू ३४ हजार ४९९ हेक्टरवर पेरण्यात आला होता. यंदा गतवर्षीच्या हरभरा क्षेत्रापेक्षाही कमी क्षेत्रावर गहू-हरभराची लागवड होणार असल्याचे कृषी विभागाच्या नियोजनावरून दिसत आहे. तब्बल ५३ हजार ७६६ हेक्टर गतवर्षी पेक्षा यंदा रबीचे कमी क्षेत्र राहणार आहे. रबीच्या क्षेत्रात घट येण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यातील महत्वाचे कारण म्हणजे वीज भारनियमन होय. पुरेसे पाणी असतानाही खरिपातच शेतकऱ्यांंना सिंचन करता आले नाही. दोन ते तीन तास वीज मिळत असल्याने ओलित करणे अशक्य होते. हीच स्थिती रबी हंगामातही राहण्याची शक्यता असून उभे पीक डोळ्याने वाळताना पाहण्यापेक्षा पेरणीच न केलेली बरी, असा अनेक शेतकऱ्यांचा सध्या तरी सूर दिसत आहे. गतवर्षी झालेल्या गारपिटीनेही शेतकरी यावर्षी पेरणीसाठी पुढे येताना दिसत नाही. ऐन हरभरा काढण्याच्यावेळी प्रचंड गारपीट झाली. गहू, हरभरा पीक उद्ध्वस्त झाले. यंदाही निसर्गाचा लहरीपणा दिसत आहे. ऐन सोयाबीन काढणीच्या वेळी ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यामुळे अनेकांची पाचावर धारण बसली होती. या सर्व बाबींचा परिणाम रबी हंगामाच्या क्षेत्रावर होत आहे.