शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुसदमध्ये अकरा हजार हेक्टरवर रबीची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 05:00 IST

यावर्षी पावसाने खरिपातील कपाशी व सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांची सर्व मदार आता रबी पिकांवर अवलंबून आहे. आतापर्यंत तालुक्यात ११ हजार ५३२ हेक्टरवर रबी पिकांची पेरणी झाली आहे. त्यात सहा हजार २९३ हेक्टरवर हरभरा तर चार हजार २३६ हेक्टरवर गव्हाची पेरणी पूर्ण झाली आहे. याशिवाय १६५ हेक्टरवर रबी ज्वारी, ९५ हेक्टरवर चारा पीक, ४२२ हेक्टरमध्ये ऊस तर ३४५ हेक्टरवर भाजीपाला पिकाची लागवड पूर्ण झाली आहे.

ठळक मुद्देअद्याप साडेचार हजार हेक्टर बाकी : गहू आणि हरभरावर जोर

  लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : तालुक्यातील शेतकऱ्यांनी आतापर्यंत तब्बल ११ हजार ५३२ हेक्टरवर रबी पिकांची पेरणी केली आहे. त्यात गहू आणि हरभरासह विविध पिकांचा समावेश आहे. यावर्षी पावसाने खरिपातील कपाशी व सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांची सर्व मदार आता रबी पिकांवर अवलंबून आहे. आतापर्यंत तालुक्यात ११ हजार ५३२ हेक्टरवर रबी पिकांची पेरणी झाली आहे. त्यात सहा हजार २९३ हेक्टरवर हरभरा तर चार हजार २३६ हेक्टरवर गव्हाची पेरणी पूर्ण झाली आहे. याशिवाय १६५ हेक्टरवर रबी ज्वारी, ९५ हेक्टरवर चारा पीक, ४२२ हेक्टरमध्ये ऊस तर ३४५ हेक्टरवर भाजीपाला पिकाची लागवड पूर्ण झाली आहे. अद्यापही चार ते चार हजार ५०० हेक्टरवर रबी पिकांची पेरणी झाली नाही. कृषी विभागाने लवकरच ही पूर्ण होण्याचा अंदाज व्यक्त केला. यावर्षी हरभरा पेरणीच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. त्याखालोखाल शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी केली आहे. सध्या हरभरा खुडणीला आला आहे. काही ठिकाणी डवरणीसुद्धा सुरू झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी रबीतील पिकांना दोन पाळ्यांमध्ये पाणी दिले आहे. काही परिसरात पेरणी झालेला गहू अंकुरत आहे. शेतकरी आता रबीतील पिकांच्या सिंचनाकडे लक्ष देत आहे. खरीप हंगामातील नुकसान या पिकांमधून भरून काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी दिवसरात्र सिंचन केले जात आहे. मात्र रात्री सिंचन करताना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. रात्री सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका वाढला आहे. अनेकांना सर्पदंशाच्या घटना घडल्या आहे.

विजेअभावी शेतकऱ्यांचे हाल रबी हंगामातील बहुतांश पेरणी पूर्णत्वास गेली आहे. आता पिकांचे सिंचन सुरू झाले. मात्र लोडशेडींग आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांसमोर समस्या उभी ठाकली आहे. ओलितासाठी दिवसभर सलग वीज पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे. विजेअभावी अनेक शेतकऱ्यांना रात्री सिंचन करावे लागते. मात्र रात्रीच्या वेळेस वन्यप्राणी व सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका असतो. त्यामुळे सलग वीज उपलब्ध करून देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

टॅग्स :agricultureशेती