शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

पुसदमध्ये अकरा हजार हेक्टरवर रबीची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 05:00 IST

यावर्षी पावसाने खरिपातील कपाशी व सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांची सर्व मदार आता रबी पिकांवर अवलंबून आहे. आतापर्यंत तालुक्यात ११ हजार ५३२ हेक्टरवर रबी पिकांची पेरणी झाली आहे. त्यात सहा हजार २९३ हेक्टरवर हरभरा तर चार हजार २३६ हेक्टरवर गव्हाची पेरणी पूर्ण झाली आहे. याशिवाय १६५ हेक्टरवर रबी ज्वारी, ९५ हेक्टरवर चारा पीक, ४२२ हेक्टरमध्ये ऊस तर ३४५ हेक्टरवर भाजीपाला पिकाची लागवड पूर्ण झाली आहे.

ठळक मुद्देअद्याप साडेचार हजार हेक्टर बाकी : गहू आणि हरभरावर जोर

  लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : तालुक्यातील शेतकऱ्यांनी आतापर्यंत तब्बल ११ हजार ५३२ हेक्टरवर रबी पिकांची पेरणी केली आहे. त्यात गहू आणि हरभरासह विविध पिकांचा समावेश आहे. यावर्षी पावसाने खरिपातील कपाशी व सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांची सर्व मदार आता रबी पिकांवर अवलंबून आहे. आतापर्यंत तालुक्यात ११ हजार ५३२ हेक्टरवर रबी पिकांची पेरणी झाली आहे. त्यात सहा हजार २९३ हेक्टरवर हरभरा तर चार हजार २३६ हेक्टरवर गव्हाची पेरणी पूर्ण झाली आहे. याशिवाय १६५ हेक्टरवर रबी ज्वारी, ९५ हेक्टरवर चारा पीक, ४२२ हेक्टरमध्ये ऊस तर ३४५ हेक्टरवर भाजीपाला पिकाची लागवड पूर्ण झाली आहे. अद्यापही चार ते चार हजार ५०० हेक्टरवर रबी पिकांची पेरणी झाली नाही. कृषी विभागाने लवकरच ही पूर्ण होण्याचा अंदाज व्यक्त केला. यावर्षी हरभरा पेरणीच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. त्याखालोखाल शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी केली आहे. सध्या हरभरा खुडणीला आला आहे. काही ठिकाणी डवरणीसुद्धा सुरू झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी रबीतील पिकांना दोन पाळ्यांमध्ये पाणी दिले आहे. काही परिसरात पेरणी झालेला गहू अंकुरत आहे. शेतकरी आता रबीतील पिकांच्या सिंचनाकडे लक्ष देत आहे. खरीप हंगामातील नुकसान या पिकांमधून भरून काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी दिवसरात्र सिंचन केले जात आहे. मात्र रात्री सिंचन करताना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. रात्री सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका वाढला आहे. अनेकांना सर्पदंशाच्या घटना घडल्या आहे.

विजेअभावी शेतकऱ्यांचे हाल रबी हंगामातील बहुतांश पेरणी पूर्णत्वास गेली आहे. आता पिकांचे सिंचन सुरू झाले. मात्र लोडशेडींग आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांसमोर समस्या उभी ठाकली आहे. ओलितासाठी दिवसभर सलग वीज पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे. विजेअभावी अनेक शेतकऱ्यांना रात्री सिंचन करावे लागते. मात्र रात्रीच्या वेळेस वन्यप्राणी व सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका असतो. त्यामुळे सलग वीज उपलब्ध करून देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

टॅग्स :agricultureशेती