शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

रबीच्या ज्वारीवर चिकट्याचा प्रादुर्भाव

By admin | Updated: April 5, 2015 00:01 IST

रबी ज्वारीचे पीक काढणीस आले असताना भरलेल्या कणसावर चिकट्याचा प्रादूर्भाव झाला.

हिवरा परिसरातील शेतकरी हवालदिल : काढणीच्या वेळेस निसर्गाचा फटका हिवरासंगम : रबी ज्वारीचे पीक काढणीस आले असताना भरलेल्या कणसावर चिकट्याचा प्रादूर्भाव झाला. वातावरणातील बदलामुळे चिकटा पडला असून यामुळे ज्वारीचे पीक धोक्यात आले आहे. महागाव तालुक्यातील हिवरासंगम, कासारबेहळ, वरोडी, कवठा या परिसरात मोठ्या प्रमाणात रबी ज्वारीची लागवड करण्यात आली. सध्या ज्वारी काढणीला आली आहे. असे असताना निसर्गाच्या निर्दयतेचा पुन्हा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. चिकट द्रव कणसावर पडले असून तो कणासातून पानावरही ओसंडून पडत आहे. जाणकार शेतकऱ्यांच्या मते चिकटा हा द्रव विषारी असून कणसातील ज्वारी खाण्यायोग्य आणि कडबा जनावरांना चारणे हानीकारण असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे चिकट्याचे आक्रमण प्रत्येक शेतात नसून अनेकांच्या ज्वारीला चिकट्याचा स्पर्शही झाला नाही. काही शेतकऱ्यांच्या ज्वारीवर मात्र चिकट्याने जोरदार आक्रमण केले आहे. जुन्या जाणत्या शेतकऱ्यांशी संपर्क साधला असता ज्वारीवर चिकटा येतच नाही. चिकटा पाहण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले.आधीच सतत तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीचा सामना शेतकरी झेलत आहे. अशा परिस्थितीत ज्वारीवरील चिकट्याने पुन्हा नवीन संकट उभे केले आहे. याबाबत कृषी विभागाशी संपर्क केला असता काही गावातील ज्वारीवर चिकटा पडला आहे. चिकटा निर्माण करणारी कणसातील अळी आणि वातावरणातील बदल कारणीभूत असू शकतो किंवा बियाण्यातील दोषसुद्धा त्याचे कारण असू शकते, असे त्यांनी सांगितले. वातावरणातील बदलामुळे चिकटा पडला असता तर सरसकट सर्वच ज्वारीवर चिकटा आला असता. परंतु काही शेतातील ज्वारीला चिकट्याचा स्पर्शही झाला नाही. एकरी २० ते २५ क्ंिवटल उत्पादन होईल, असा अंदाज असताना आता चिकट्याने संपूर्ण स्वप्नच उद्ध्वस्त केले आहे. कासारबेहळ येथील शेतकरी ज्योतीराम चव्हाण या शेतकऱ्याने उद्ध्वस्त झाल्याचे सांगितले. एकरी एक क्ंिवटलही ज्वारी होणार नसल्याचे ते म्हणाले. कृषी विभागाने गंभीर दखल घेऊन उपाययोजना सूचवाव्या अशी मागणी आहे. (वार्ताहर)