शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
4
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
5
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
6
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
7
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
8
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
9
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
10
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
11
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
12
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
13
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
14
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
15
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
16
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
17
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
18
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
19
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
20
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...

वकिलांवरच प्रश्नांची सरबत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 22:32 IST

जिल्हा परिषदेत बुधवारी चक्क वकिलांवरच प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. पॅनल निवडीसाठी बुधवारी वकिलांची निवड समितीने मुलाखत घेतली. त्यात वकिलांना विविध प्रश्नांनी भांडावून सोडले.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेत पॅनेलसाठी मुलाखती : ४६ जणांची हजेरी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेत बुधवारी चक्क वकिलांवरच प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. पॅनल निवडीसाठी बुधवारी वकिलांची निवड समितीने मुलाखत घेतली. त्यात वकिलांना विविध प्रश्नांनी भांडावून सोडले.उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय, कामगार न्यायालय आणि औद्योगिक न्यायालयात जिल्हा परिषदेची बाजू मांडण्यासाठी दरवर्षी वकिलांच्या पॅनलची निवड केली जाते. यासाठी ५२ वकिलांनी अर्ज केले. त्यात यवतमाळसह नागपूर, वर्धा आणि अमरावतीच्या वकिलांचा समावेश होता. या वकिलांची बुधवारी निवड समितीने मुलाखत घेतली. ५२ पैकी ४६ वकील निवड समितीच्या मुलाखतीला सामोरे गेले. यावेळी वकिलांवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. संबंधित नसलेले प्रश्नही विचारण्यात आले. पदाधिकाऱ्यांचे नातेवाईकही लुडबुड करीत असल्याचा दावा वकिलांनी केला. ४६ पैकी जवळपास १२ जणांची निवड निश्चित मानली जात आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवड समितीच्या अध्यक्ष होत्या. मुलाखतीला त्यांच्यासह सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधर, इतर एक पदाधिकारी उपस्थित होते. समितीचे सदस्य असलेले मुख्य कार्यकारी अधिकारी आणि बांधकाम सभापती मुलाखतीला गैरहजर होते. निवड झालेल्या वकिलांना उच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी प्रती प्रकरण दहा हजार रुपये तर जिल्हा व इतर न्यायालयात बाजू मांडण्यासाठी प्रती प्रकरण सहा हजार रुपये अदा केले जाणार आहे.दौऱ्यामुळे निवड लांबणीवरमुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा पंतप्रधानांच्या दौºयात व्यस्त असल्याने वकिलांच्या पॅनलची निवड लांबली आहे. तथापि समितीने १२ जणांची निवड निश्चित केली आहे. मुलाखतीत वकिलांना संबंधित प्रश्नच विचारण्यात आले असा दावा डेप्युटी सीईओ मनोज चौधर यांनी केला. पदाधिकाºयांचे कोणतेही नातेवाईक मुलाखतीला हजर नव्हते, असाही दावा त्यांनी केला.