शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानावर बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
2
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
3
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
4
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
5
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
6
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
7
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
8
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
9
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
10
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
11
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
12
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
13
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
14
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
15
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
16
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
17
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
18
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
19
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
20
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द

आदिवासींचे प्रश्न राज्यपालांच्या दरबारी

By admin | Updated: September 7, 2015 02:23 IST

आदिवासींचे प्रश्न सोडविण्यासाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने राज्यपालांच्या दरबारात प्रश्न मांडले आहे. विविध २३ मागण्यांचा यामध्ये समावेश आहे.

दोन तास चर्चा : शिष्टमंडळाने मांडल्या २३ मागण्यायवतमाळ : आदिवासींचे प्रश्न सोडविण्यासाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने राज्यपालांच्या दरबारात प्रश्न मांडले आहे. विविध २३ मागण्यांचा यामध्ये समावेश आहे. राज्यपालांनी या विषयात गांभीर्याने लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती रविवारी यवतमाळात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या नेतृत्वात आदिवासी नेत्यांचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटले. यावेळी राज्यपालांकडे आदिवासी समाजाच्या आबाधित आरक्षणाचा मुद्दा मांडण्यात आला. घटनादत्त आरक्षणात इतर कुठल्याही समाजाला टाकू नये, असे प्रामुख्याने सांगण्यात आले. केळकर समितीच्या शिफारशीनुसार आदिवासी बांधवांच्या समतोल विकासासाठी तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी. पेसा कायद्या अंतर्गत राज्यपालांनी आदिवासी गावांना विशेष घटनादत्त अधिकार दिले आहेत. अध्यादेशाची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी, आदिवासी क्षेत्राची पुनर्रचना करण्यात यावी, आदिवासी विकास निधी वाटपात गावांना ५० टक्के, जिल्हास्तर २० टक्के, तालुकास्तर १५ टक्के तर राज्यस्तरावर १५ टक्के निधी देण्यात यावा. लोकसंख्येनुसार आदिवासी जिल्हे आणि तालुक्याची निर्मिती करण्यात यावी यासह विविध २३ मागण्यांचा यामध्ये समावेश आहे. पत्रकार परिषदेला माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, माजी विधानसभा उपाध्यक्ष वसंतराव पुरके, दशरथ मडावी, किरण कुमरे, माधव सरकुंडे उपस्थित होते. (शहर वार्ताहर)