शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

आदिवासींचे प्रश्न राज्यपालांच्या दरबारी

By admin | Updated: September 7, 2015 02:23 IST

आदिवासींचे प्रश्न सोडविण्यासाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने राज्यपालांच्या दरबारात प्रश्न मांडले आहे. विविध २३ मागण्यांचा यामध्ये समावेश आहे.

दोन तास चर्चा : शिष्टमंडळाने मांडल्या २३ मागण्यायवतमाळ : आदिवासींचे प्रश्न सोडविण्यासाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने राज्यपालांच्या दरबारात प्रश्न मांडले आहे. विविध २३ मागण्यांचा यामध्ये समावेश आहे. राज्यपालांनी या विषयात गांभीर्याने लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती रविवारी यवतमाळात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या नेतृत्वात आदिवासी नेत्यांचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटले. यावेळी राज्यपालांकडे आदिवासी समाजाच्या आबाधित आरक्षणाचा मुद्दा मांडण्यात आला. घटनादत्त आरक्षणात इतर कुठल्याही समाजाला टाकू नये, असे प्रामुख्याने सांगण्यात आले. केळकर समितीच्या शिफारशीनुसार आदिवासी बांधवांच्या समतोल विकासासाठी तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी. पेसा कायद्या अंतर्गत राज्यपालांनी आदिवासी गावांना विशेष घटनादत्त अधिकार दिले आहेत. अध्यादेशाची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी, आदिवासी क्षेत्राची पुनर्रचना करण्यात यावी, आदिवासी विकास निधी वाटपात गावांना ५० टक्के, जिल्हास्तर २० टक्के, तालुकास्तर १५ टक्के तर राज्यस्तरावर १५ टक्के निधी देण्यात यावा. लोकसंख्येनुसार आदिवासी जिल्हे आणि तालुक्याची निर्मिती करण्यात यावी यासह विविध २३ मागण्यांचा यामध्ये समावेश आहे. पत्रकार परिषदेला माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, माजी विधानसभा उपाध्यक्ष वसंतराव पुरके, दशरथ मडावी, किरण कुमरे, माधव सरकुंडे उपस्थित होते. (शहर वार्ताहर)