शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

पाणीवापर संस्थांवर प्रश्नचिन्ह

By admin | Updated: December 9, 2014 22:59 IST

सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून ओलिताचे उद्दिष्ट वाढविता यावे या हेतुने पाणीवापर संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्यक्षात या निर्णयाची अंमलबजावणी कागदावरच राहिली आहे.

यवतमाळ : सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून ओलिताचे उद्दिष्ट वाढविता यावे या हेतुने पाणीवापर संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्यक्षात या निर्णयाची अंमलबजावणी कागदावरच राहिली आहे. इतकेच नव्हे तर या संस्थांकडे पाणीकर वसुलीचे उद्दिष्ट सोपविण्यात आले होते. ते उदिष्टेही संस्थेला पूर्ण करता आले नाही. यामुळे पाणीवापर संस्थांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्ह्यात एक मोठा, सात मध्यम आणि ६२ लघू प्रकल्प आहेत. या प्रकल्पातून ३५ हजार हेक्टरवरील शेतीला ओलित करण्यात येते. प्रकल्पातील ओलित यापेक्षाही मोठ्या प्रमाणात वाढविता यावे, यासोबतच पाण्याचा होणारा अपव्यय टाळता यावा या उद्देशाने प्रकल्पाची जबाबदारी पाणीवापर संस्थांवर सोपविण्यात आली आहे. प्रकल्पांमधून किती घनमिटर पाण्याचा उपसा करण्यात आला, यासाठी किती रुपयांचा निधी आकारला पाहिजे, याबाबत दर ठरविण्याचा अधिकार पाणीवापर संस्थांकडेच आहे. प्रकल्पाचा अधिकार संस्थेकडे आहे. एकूणच प्रकल्पाची मालकी गावाकडे सोपविल्याने प्रकल्पाच्या ओलितात वाढ होईल, ही अपेक्षा आहे. पाणीवापर संस्थेने शेतकऱ्यांना पाण्याचे महत्व पटवून देण्यासोबतच पाण्याचा वापर काटकसरीने कसा करावा, याबाबत मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे. कुठलाही सस्थांनी याबाबत कोणत्याही प्रकारे नियमाचे पालन केलेले दिसून येत नाही. यामुळे मूळ उद्देशालाच तडा गेला आहे. जिल्ह्यात १७६ पाणीवापर संस्था स्थापन करायच्या होत्या. प्रत्यक्षात ११८ पाणीवापर संस्था स्थापन झाल्या आहे. यामधील ८४ पाणीवापर संस्था हस्तांतरित झाल्या. ५८ संस्थांनी अद्याप नोंदणी बाकी आहे. यामुळे प्रकल्प क्षेत्रात क्षेत्रातील सर्व लाभार्थी शेतकरी सहभागी होण्यास अडथडा निर्माण झाला आहे. २००६ पासून २०१३ पर्यंत १ कोटी २५ लाख रुपयांची वसुली करायची होती. प्रत्यक्षात एक कोटी रुपयांची वसुली झाली. यामधील ६३ लाख रुपयांचे अनुदान पाणीवापर संस्थांना द्यायचे होते. यापैकी ४५ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले. १८ लाख रुपयांचे अनुदानाचा निधी पाणीवापर संस्थांना मिळाला नाही. प्राप्त निधीमधून प्रकल्पाची डागडुजी आणि पाणी वितरण व्यवस्था मजबूत करण्यासाठी निधी खर्ची घालायचा होता. घनमापन यंत्रातून पाणी सोडायचे होते. त्याचे रेकॉर्ड संस्थेला ठेवायचे होते. बहुतांश संस्थांनी पाणी वाटपाचा रेकॉर्ड अद्याप ठेवलेला नाही. यामुळे शासनाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासल्या गेला आहे. यातून ओलिताचे प्रमाण जैसे थे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रकल्प केवळ पांढरा हत्ती ठरावा, असेच झाल्याचे सध्यातरी दिसून येते. याबाबत पाटबंधारे विभागाने त्वरित ठोस पावले उचलल्यास जिल्ह्यातील सिंचनाचे क्षेत्र निश्चितच वाढू शकेल. याकडे पाटबंधारे विभागाने गांभीर्याने बघणे आवश्यक आहे. नियोजनाचा अभाव दूर करून योग्य अंमलबजावणी केल्यास निश्चितच ओलिताचे क्षेत्र वाढू शकते. (शहर वार्ताहर)