शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

पूर संरक्षक भिंतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

By admin | Updated: September 1, 2014 00:16 IST

गेल्या तीन ते चार वर्षापासून सतत आर्णी मार्गावरील हिवरी गावाला पुराचा तडाखा बसत आहे. नाल्यावरील पूरसंरक्षक भिंतीअभावी हा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्यावर्षी नाल्याला पूर येवून

हिवरी : गेल्या तीन ते चार वर्षापासून सतत आर्णी मार्गावरील हिवरी गावाला पुराचा तडाखा बसत आहे. नाल्यावरील पूरसंरक्षक भिंतीअभावी हा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्यावर्षी नाल्याला पूर येवून गावातील अडीचशे घरात पाणी घुसले होते. त्यामध्ये गावकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले. याहीवर्षी प्रशासनाच्या आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणाने तीच परिस्थिती आहे. शनिवारी रात्री आणि रविवारी दिवसा झालेल्या पावसाची गावकऱ्यांनी चांगलीच धास्ती घेतल्याचे दिसून आले.आर्णी मार्गावर हिवरी हे गाव आहे. गावाला लागूनच मोठा नाला असून त्याचे पाणी गावात शिरू नये म्हणून आजवर कुठलीही उपाययोजना करण्यात आली नाही. गतवर्षी या नाल्याचे पाणी गावात शिरून अन्नधान्य आणि घरांचे मोठे नुकसान झाले होते. सुदैवाने प्राणहानी झाली नसली तरी अनेकांचे संसार उघड्यावर आले होते. त्यानंतर मात्र प्रशासन खडबडून जागे झाले. शाळेत आणि ग्रामपंचायत कार्यालयात पूर पीडितांची व्यवस्था करण्यात आली. या परिस्थितीवर काही दिवस उलटल्यानंतर मात्र पुराने बाधित झालेल्या कुटुंबांनाच आपले संसार उभे करावे लागले. शासनाकडून प्रभावी मदत मिळाली नाही. दरम्यान, त्यावेळी लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने पूर संरक्षक भिंत बांधण्याची कबुली दिली होती. ती आजवर पूर्ण झालेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा हिवरी गावात पूर शिरण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यातच खासदार फंडातून बांधलेल्या समाज भवनामुळे पाण्याचे लोट गावात शिरत आहे. त्याचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. (वार्ताहर)