शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
3
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
4
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
5
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
6
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
7
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
8
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
9
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
10
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
11
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या
12
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
13
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
14
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
15
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
16
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
17
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
18
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
19
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
20
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."

उमरखेड शहराच्या बायपासचा प्रश्न अडगळीत

By admin | Updated: June 12, 2016 02:14 IST

शहराच्या मध्यवस्तीतून जाणाऱ्या नागपूर-बोरी-तुळजापूर राज्य महामार्गामुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून,

वाहतूक शहरातून : नागपूर-बोरी-तुळजापूर राज्यमार्ग शहरातून जात असल्याने अपघाताची भीतीउमरखेड : शहराच्या मध्यवस्तीतून जाणाऱ्या नागपूर-बोरी-तुळजापूर राज्य महामार्गामुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, अहोरात्र धावणाऱ्या अवजड वाहनांमुळे अपघाताची भीती कायम असते. ही वाहतूक वळविण्यासाठी बायपासची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून असून, आंदोलन करूनही बायपास मात्र झाला नाही. जणू बायपासचा प्रश्न अडगळीत पडल्याचे दिसते. उमरखेड हे तालुक्याचे ठिकाण आहे. याठिकाणी येणाऱ्यांची संख्या मोठी असते. शहरातील शाळा, महाविद्यालये आणि कार्याल्यामुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी कायम असते. त्यातच अनेक व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केल्याने रस्ते अरुंद झाले आहे. त्यावरून वाटचाल करताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. यासोबतच शहरातून नागपूर-बोरी-तुळजापूर राज्यमार्ग जातो. यावरून रात्रंदिवस वाहतूक सुरू असते. अवजड वाहने आणि मोठाले ट्रेलर शहरातूनच धावतात. मोठा ट्रेलर शहरातून जात असताना मोठा अडथळा निर्माण होतो. तासंतास वाहतूक खोळंबलेली असते. या वाहतुकीमुळे अपघाताची भीती असते. शाळा, महाविद्यालये सुटण्याच्या वेळात वाहतुकीचे तीनतेरा वाजतात. बसस्थानाकसमोरील आणि ढाणकी मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते. सायकलने जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. यावर पर्याय म्हणून शहरातून जाणारी वाहतूक शहराबाहेरून वळविणे आवश्यक आहे. त्यासाठी काही वर्षापूर्वी बायपासचा मुद्दा पुढे आला. यासाठी विविध संघटना व पक्षांच्यावतीने आंदोलन करण्यात आले. परंतु अद्यापही बायपास निर्माण झाला नाही. त्यामुळे शहरातील नागरिक जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून चालताना दिसतात. या प्रकरणी आता नागरिकच रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. (शहर प्रतिनिधी)