शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

उमरखेड शहराच्या बायपासचा प्रश्न अडगळीत

By admin | Updated: June 12, 2016 02:14 IST

शहराच्या मध्यवस्तीतून जाणाऱ्या नागपूर-बोरी-तुळजापूर राज्य महामार्गामुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून,

वाहतूक शहरातून : नागपूर-बोरी-तुळजापूर राज्यमार्ग शहरातून जात असल्याने अपघाताची भीतीउमरखेड : शहराच्या मध्यवस्तीतून जाणाऱ्या नागपूर-बोरी-तुळजापूर राज्य महामार्गामुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, अहोरात्र धावणाऱ्या अवजड वाहनांमुळे अपघाताची भीती कायम असते. ही वाहतूक वळविण्यासाठी बायपासची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून असून, आंदोलन करूनही बायपास मात्र झाला नाही. जणू बायपासचा प्रश्न अडगळीत पडल्याचे दिसते. उमरखेड हे तालुक्याचे ठिकाण आहे. याठिकाणी येणाऱ्यांची संख्या मोठी असते. शहरातील शाळा, महाविद्यालये आणि कार्याल्यामुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी कायम असते. त्यातच अनेक व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केल्याने रस्ते अरुंद झाले आहे. त्यावरून वाटचाल करताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. यासोबतच शहरातून नागपूर-बोरी-तुळजापूर राज्यमार्ग जातो. यावरून रात्रंदिवस वाहतूक सुरू असते. अवजड वाहने आणि मोठाले ट्रेलर शहरातूनच धावतात. मोठा ट्रेलर शहरातून जात असताना मोठा अडथळा निर्माण होतो. तासंतास वाहतूक खोळंबलेली असते. या वाहतुकीमुळे अपघाताची भीती असते. शाळा, महाविद्यालये सुटण्याच्या वेळात वाहतुकीचे तीनतेरा वाजतात. बसस्थानाकसमोरील आणि ढाणकी मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते. सायकलने जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. यावर पर्याय म्हणून शहरातून जाणारी वाहतूक शहराबाहेरून वळविणे आवश्यक आहे. त्यासाठी काही वर्षापूर्वी बायपासचा मुद्दा पुढे आला. यासाठी विविध संघटना व पक्षांच्यावतीने आंदोलन करण्यात आले. परंतु अद्यापही बायपास निर्माण झाला नाही. त्यामुळे शहरातील नागरिक जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून चालताना दिसतात. या प्रकरणी आता नागरिकच रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. (शहर प्रतिनिधी)