शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
4
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
5
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
6
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
7
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
8
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
9
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
10
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
11
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
12
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
13
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
14
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
15
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
16
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
17
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
18
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
19
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
20
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन

महामार्ग रद्द झाल्याने गुंतवणूकदारांना धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 21:56 IST

राजेश निस्ताने । लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : धारणी-करंजी हा ३१४ किलोमीटरचा प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग नीती आयोगाने रद्द केल्याने ...

ठळक मुद्देधारणी-करंजी : शासनाला चौपट दरात जमिनी विकण्याचा मनसुबा उधळला

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : धारणी-करंजी हा ३१४ किलोमीटरचा प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग नीती आयोगाने रद्द केल्याने या मार्गावरील तमाम गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला आहे. महामार्गाच्या भूसंपादनात जमिनी जातील आणि शासनाकडून चार-पाच पट मोबदला मिळेल, असा या गुंतवणूकदारांचा मनसुबा होता. परंतु तो नीती आयोगाच्या नकारामुळे उधळला गेला.अमरावती जिल्ह्यातील धारणी (मेळघाट) ते यवतमाळ जिल्ह्यातील करंजी असा मध्यप्रदेश ते आंध्रप्रदेशला जोडणारा राष्टष्ट्रीय महामार्ग प्रस्तावित होता. गेल्या तीन-चार वर्षांपासून त्यासाठी सर्वेक्षण, मोजणी व प्रस्तावांची प्रक्रिया सुरू होती. कुठे उड्डान पुल, कुठे बायपास, कुठे वळण, कुठे घाट समाप्ती याचा संपूर्ण अभ्यास करून सुमारे साडेतीन हजार कोटींचे बजेट असलेला हा रस्ता प्रस्तावित केला गेला होता. ही बाब डोळ्यापुढे ठेऊन अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातीलच नव्हे तर अन्य जिल्ह्यातील व राज्यातील गुंतवणूकदारांनी धारणी ते करंजी या मार्गावर दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात गेल्या तीन-चार वर्षात कमी दरात जमिनींची खरेदी केली होती. जेथून बायपास जाणार तेथेही जमिनी घेतल्या गेल्या. कमी दरात या जमिनी घेऊन शासनाला भूसंपादनाच्या नावाखाली जास्त दरात विकण्याचा गुंतवणूकदारांचा मनसुबा होता. त्यात नागपूर-बोरी-तुळजापूर व वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गावरील काही गुंतवणूकदारांचाही समावेश आहे. परंतु नीती आयोगाने हा महामार्गच रद्द केल्याने या गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला आहे. कारण धारणी ते करंजी हा महामार्ग रुंदीकरण न करता आहे त्याच स्थितीत बांधला जाणार आहे. पर्यायाने भूसंपादनाचा प्रश्नच निर्माण होणार नाही. त्यामुळे आज तरी ही गुंतवणूक फसल्याचे मानले जात आहे. या मार्गाच्या भूसंपादनासाठी सुमारे पाचशे कोटी रुपये लागणार होते. अर्थात यातील बहुतांश रक्कम जमिनीचा मोबदला म्हणून त्या गुंतवणूकदारांच्या घशात जाणार होती. मात्र या पाचशे कोटींमुळेच नीती आयोगाने महामार्गास नकार दिला. धारणी-करंजीच्या धर्तीवर वरुड-मोर्शी-तिवसा-धामणगाव-बाभूळगाव-यवतमाळ या महामार्गासाठी चाचपणी सुरू होती. परंतु आता त्यालाही आपसुकच ब्रेक लागला आहे.दिल्लीत लॉबिंगनीती आयोगाने भूसंपादनासाठी पाचशे कोटी परवडणारे नाही, तेवढा निधी नाही असे कारण पुढे करून धारणी ते करंजी हा राष्ट्रीय महामार्ग रोखला असला तरी तो व्हावा यासाठी यवतमाळ व अमरावती जिल्ह्यातील गुंतवणूकदारांची लॉबी सक्रिय झाली आहे. नागपूर-मुंबई-दिल्ली या मार्गाने हा राष्ट्रीय महामार्ग परत आणता येतो का या दृष्टीने या गुंतवणूकदारांच्या लॉबीचे राजकीयस्तरावरून ‘वजनदार’ प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे.