शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

पुसद पंचायत समिती उपसभापतींवर अविश्वास

By admin | Updated: April 2, 2015 00:04 IST

विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या पंचायत समिती सभापती व उपसभापतींच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळासाठी सभापतीपदी राष्ट्रवादीचे ....

पुसद : विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या पंचायत समिती सभापती व उपसभापतींच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळासाठी सभापतीपदी राष्ट्रवादीचे सुभाष कांबळे व उपसभापती काँग्रेसचे अवधूत मस्के यांची अविरोध निवड झाली होती. मात्र मागील सात महिन्यांपासून सर्व काही सुरळीत असताना अचानकपणे मंगळवारी राष्ट्रवादीच्या सर्व १२ सदस्यांनी उपसभापती अवधूत मस्के यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांच्याकडे दाखल केल्याने एकच खळबळ उडाली. आता काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीमध्ये खिंडार पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुसद पंचायत समितीवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार मनोहरराव नाईक यांचे वर्चस्व असून, एकूण १४ सदस्यांपैकी १२ सदस्य सध्या पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीचे आहेत. तर काँग्रेसचे केवळ दोन सदस्य आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यस्तरावर काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी होण्याची शक्यता असल्याने आमदार मनोहरराव नाईक यांनी काँग्रेसचे अवधूत मस्के यांना उपसभापतीपद बहाल केले होते. मात्र विधानसभेत या दोन्ही पक्षांची युती न होता, हे पक्ष वेगवेगळे लढले. त्यामध्ये मस्के यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकाराने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती. पंचायत समितीचे उपसभापती अवधूत मस्के यांनी सन्मानजनक पद्धतीने राजीनामा द्यावा असा प्रस्ताव राष्ट्रवादीने त्यांच्यासमोर ठेवला होता. मात्र त्यांनी हा प्रस्ताव धुडकून लावल्याने सहा महिने वाट पाहून अखेरीस मस्के यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला. या प्रस्तावावर एकूण १४ पैकी १२ सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या प्रकारामुळे पुसद तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)काँग्रेस उमेदवाराचा प्रचार भोवला$$्रिअवधूत मस्के हे काँग्रेसचेच असल्याने त्यांनी विधानसभा निवडणुकीत अर्थातच काँग्रेस उमेदवाराचा प्रचार केला. आणि हिच बाब राष्ट्रवादीच्या नेत्यांना खटकली. पुसद पंचायत समितीमध्ये तब्बल बारा सदस्य हे राष्ट्रवादीचे असून केवळ दोन सदस्य हे काँग्रेस पार्टीचे आहेत. पंचायत समितीचे सभापती सुभाष कांबळे हे राष्ट्रवादीचे असून उपसभापती अवधूत मस्के हे काँग्रेसचे आहेत. पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर सात महिने सर्वकाही सुरळीत चालल्यानंतर विधानसभेतील प्रचाराचा वचपा राष्ट्रवादीने काढण्याचे ठरविले आणि यातूनच अविश्वास ठराव आणण्यात आला.