शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
5
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
6
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
7
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
8
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
9
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
10
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
11
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
12
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
13
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
14
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
15
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
16
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
17
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
18
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
19
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
20
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन

पुसद पंचायत समिती उपसभापतींवर अविश्वास

By admin | Updated: April 2, 2015 00:04 IST

विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या पंचायत समिती सभापती व उपसभापतींच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळासाठी सभापतीपदी राष्ट्रवादीचे ....

पुसद : विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या पंचायत समिती सभापती व उपसभापतींच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळासाठी सभापतीपदी राष्ट्रवादीचे सुभाष कांबळे व उपसभापती काँग्रेसचे अवधूत मस्के यांची अविरोध निवड झाली होती. मात्र मागील सात महिन्यांपासून सर्व काही सुरळीत असताना अचानकपणे मंगळवारी राष्ट्रवादीच्या सर्व १२ सदस्यांनी उपसभापती अवधूत मस्के यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांच्याकडे दाखल केल्याने एकच खळबळ उडाली. आता काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीमध्ये खिंडार पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुसद पंचायत समितीवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार मनोहरराव नाईक यांचे वर्चस्व असून, एकूण १४ सदस्यांपैकी १२ सदस्य सध्या पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीचे आहेत. तर काँग्रेसचे केवळ दोन सदस्य आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यस्तरावर काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी होण्याची शक्यता असल्याने आमदार मनोहरराव नाईक यांनी काँग्रेसचे अवधूत मस्के यांना उपसभापतीपद बहाल केले होते. मात्र विधानसभेत या दोन्ही पक्षांची युती न होता, हे पक्ष वेगवेगळे लढले. त्यामध्ये मस्के यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकाराने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती. पंचायत समितीचे उपसभापती अवधूत मस्के यांनी सन्मानजनक पद्धतीने राजीनामा द्यावा असा प्रस्ताव राष्ट्रवादीने त्यांच्यासमोर ठेवला होता. मात्र त्यांनी हा प्रस्ताव धुडकून लावल्याने सहा महिने वाट पाहून अखेरीस मस्के यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला. या प्रस्तावावर एकूण १४ पैकी १२ सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या प्रकारामुळे पुसद तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)काँग्रेस उमेदवाराचा प्रचार भोवला$$्रिअवधूत मस्के हे काँग्रेसचेच असल्याने त्यांनी विधानसभा निवडणुकीत अर्थातच काँग्रेस उमेदवाराचा प्रचार केला. आणि हिच बाब राष्ट्रवादीच्या नेत्यांना खटकली. पुसद पंचायत समितीमध्ये तब्बल बारा सदस्य हे राष्ट्रवादीचे असून केवळ दोन सदस्य हे काँग्रेस पार्टीचे आहेत. पंचायत समितीचे सभापती सुभाष कांबळे हे राष्ट्रवादीचे असून उपसभापती अवधूत मस्के हे काँग्रेसचे आहेत. पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर सात महिने सर्वकाही सुरळीत चालल्यानंतर विधानसभेतील प्रचाराचा वचपा राष्ट्रवादीने काढण्याचे ठरविले आणि यातूनच अविश्वास ठराव आणण्यात आला.