शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
4
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
5
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
6
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
7
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
8
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
9
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
10
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
11
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
12
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?
13
नवरात्र २०२५: ललिता सहस्रनामाचे नियमित करा पठण, देवी सदैव करेल पाठराखण; अपार लाभ-समृद्धी! 
14
ट्रम्पनी H-1B फीवरून ब्लॅकमेल केले, अमेरिकी कंपनीने भारतातच १२,००० नोकऱ्यांची घोषणा केली...
15
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
16
पुढच्या वर्षी ९४,००० पर्यंत जाणार Sensex; HSBC नं दृष्टीकोन बदलला, भारताचं रेटिंगही वाढवलं
17
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
18
बुद्धिबळाची 'राणी'! वडिलांची साथ, लेकीने रचला इतिहास; बिहारची पहिली महिला FIDE मास्टर
19
Tiger Attack: समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
20
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...

पुसदमध्ये सिग्नल आणि वाहनतळच नाही

By admin | Updated: March 11, 2017 01:00 IST

एक लाखाच्यावर लोकसंख्या असलेल्या पुसद शहरात कुठेही ट्रॅफिक सिग्नल लावण्यात आले नसून वाहनतळांचाही थांगपत्ता लागत नाही.

वाहतुकीची कोंडी : रस्त्यावरच वाहनांचे पार्किंग, अपघातात वाढ, सिग्नलसाठी नगरपरिषदेकडे प्रस्ताव पुसद : एक लाखाच्यावर लोकसंख्या असलेल्या पुसद शहरात कुठेही ट्रॅफिक सिग्नल लावण्यात आले नसून वाहनतळांचाही थांगपत्ता लागत नाही. परिणामी शहरातील वाहतुकीची समस्या गंभीर झाली असून याचा ताण वाहतूक शाखेसह नागरिकांनाही सहन करावा लागत आहे. पुसद शहर आणि लगतच्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या लाखाच्या आसपास आहे. वाढती लोकसंख्या आणि त्यामुळे वाढणारी वाहनांची संख्या शहरात समस्या निर्माण करीत आहे. पुसद शहरातील रस्ते आधीच अरुंद असून या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रकार वारंवार घडतात. शहरात कुठेही ट्रॅफिक सिग्नल लावलेले नाही. वाहतूक पोलिसांना वाहतूक नियंत्रित करावी लागते. परंतु शहरातील रस्त्यावरील हातगाड्यांना बाजूला सारतानाच त्यांची शक्ती खर्च होते, तर काही चौकात वाहतूक पोलीसच दिसत नाही. येथील गजबजलेल्या शिवाजी चौकात चारही बाजूने येणारी वाहने शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वळसा घालतात. त्यावेळी अपघात होण्याची शक्यता असते. भरधाव वाहनांच्या मध्ये पायदळ चालणाऱ्यांचाही गोंधळ सुरू असतो. शहरातील बसस्थानकासमोर आॅटोरिक्षाचालकांचा कायम धुमाकूळ सुरू असतो. विक्रेत्यांनी आपली दुकाने थेट डांबरी रस्त्यालगत लावली आहे. आधीच दुभाजकामुळे रस्ता अरुंद झाला असून या दुकानांमुळे पायदळ चालणाऱ्यांना थेट रस्त्याच्या मधोमध चालावे लागते. त्यामुळे येणाऱ्या वाहनांना अडचणीचे जाते. तसेच खरेदी व इतर व्यवहारासाठी येणारे नागरिकही रस्त्यावरच वाहने उभी करतात. कारण पार्कींगसाठी आवश्यक जागाच सोडण्यात आली नाही. ही समस्या गेल्या कित्येक वर्षापासूनची आहे. यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे. शहरातील इतरही परिसरात अशीच अवस्था दिसून येते. भरधाव जाणाऱ्या दुचाकी अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवितात. पुसद शहरातील शिवाजी चौक आणि बसस्थानकासमोर ट्रॅफिक सिग्नलची आवश्यकता आहे. या ठिकाणी सिग्नल लावल्यास स्वयंचलित पद्धतीने वाहतूक नियंत्रित होवू शकते. यासाठी येथील वाहतूक उपशाखेने नगरपरिषदेकडे प्रस्ताव पाठविला आहे. परंतु अद्याप तरी या प्रस्तावावर उपाययोजना झाली नाही. तसेच शहरात अपवाद वगळता कुठेही वाहनतळ दिसत नाही. केवळ बसस्थानकाच्या आवारात वाहनतळ आहे. शहरात इतर ठिकाणी कुठेही पार्किंगची व्यवस्था नाही. बाजारात खरेदीसाठी चारचाकी वाहन घेवून जाणे म्हणजे अंगावर काटा आणण्यासारखा प्रकार आहे. वाहन पार्किंग करताना जागेची शोधाशोध करण्याच्या वेळात खरेदी होवू शकते. त्यामुळे अनेकजण चारचाकी वाहनाऐवजी दुचाकीनेच बाजारात येतात. परंतु दुचाकी उभी करतानाही दुकानदार आणि इतरांचे बोलणे ऐकावे लागते. (कार्यालय चमू)