शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

पुसदमध्ये सिग्नल आणि वाहनतळच नाही

By admin | Updated: March 11, 2017 01:00 IST

एक लाखाच्यावर लोकसंख्या असलेल्या पुसद शहरात कुठेही ट्रॅफिक सिग्नल लावण्यात आले नसून वाहनतळांचाही थांगपत्ता लागत नाही.

वाहतुकीची कोंडी : रस्त्यावरच वाहनांचे पार्किंग, अपघातात वाढ, सिग्नलसाठी नगरपरिषदेकडे प्रस्ताव पुसद : एक लाखाच्यावर लोकसंख्या असलेल्या पुसद शहरात कुठेही ट्रॅफिक सिग्नल लावण्यात आले नसून वाहनतळांचाही थांगपत्ता लागत नाही. परिणामी शहरातील वाहतुकीची समस्या गंभीर झाली असून याचा ताण वाहतूक शाखेसह नागरिकांनाही सहन करावा लागत आहे. पुसद शहर आणि लगतच्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या लाखाच्या आसपास आहे. वाढती लोकसंख्या आणि त्यामुळे वाढणारी वाहनांची संख्या शहरात समस्या निर्माण करीत आहे. पुसद शहरातील रस्ते आधीच अरुंद असून या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रकार वारंवार घडतात. शहरात कुठेही ट्रॅफिक सिग्नल लावलेले नाही. वाहतूक पोलिसांना वाहतूक नियंत्रित करावी लागते. परंतु शहरातील रस्त्यावरील हातगाड्यांना बाजूला सारतानाच त्यांची शक्ती खर्च होते, तर काही चौकात वाहतूक पोलीसच दिसत नाही. येथील गजबजलेल्या शिवाजी चौकात चारही बाजूने येणारी वाहने शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वळसा घालतात. त्यावेळी अपघात होण्याची शक्यता असते. भरधाव वाहनांच्या मध्ये पायदळ चालणाऱ्यांचाही गोंधळ सुरू असतो. शहरातील बसस्थानकासमोर आॅटोरिक्षाचालकांचा कायम धुमाकूळ सुरू असतो. विक्रेत्यांनी आपली दुकाने थेट डांबरी रस्त्यालगत लावली आहे. आधीच दुभाजकामुळे रस्ता अरुंद झाला असून या दुकानांमुळे पायदळ चालणाऱ्यांना थेट रस्त्याच्या मधोमध चालावे लागते. त्यामुळे येणाऱ्या वाहनांना अडचणीचे जाते. तसेच खरेदी व इतर व्यवहारासाठी येणारे नागरिकही रस्त्यावरच वाहने उभी करतात. कारण पार्कींगसाठी आवश्यक जागाच सोडण्यात आली नाही. ही समस्या गेल्या कित्येक वर्षापासूनची आहे. यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे. शहरातील इतरही परिसरात अशीच अवस्था दिसून येते. भरधाव जाणाऱ्या दुचाकी अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवितात. पुसद शहरातील शिवाजी चौक आणि बसस्थानकासमोर ट्रॅफिक सिग्नलची आवश्यकता आहे. या ठिकाणी सिग्नल लावल्यास स्वयंचलित पद्धतीने वाहतूक नियंत्रित होवू शकते. यासाठी येथील वाहतूक उपशाखेने नगरपरिषदेकडे प्रस्ताव पाठविला आहे. परंतु अद्याप तरी या प्रस्तावावर उपाययोजना झाली नाही. तसेच शहरात अपवाद वगळता कुठेही वाहनतळ दिसत नाही. केवळ बसस्थानकाच्या आवारात वाहनतळ आहे. शहरात इतर ठिकाणी कुठेही पार्किंगची व्यवस्था नाही. बाजारात खरेदीसाठी चारचाकी वाहन घेवून जाणे म्हणजे अंगावर काटा आणण्यासारखा प्रकार आहे. वाहन पार्किंग करताना जागेची शोधाशोध करण्याच्या वेळात खरेदी होवू शकते. त्यामुळे अनेकजण चारचाकी वाहनाऐवजी दुचाकीनेच बाजारात येतात. परंतु दुचाकी उभी करतानाही दुकानदार आणि इतरांचे बोलणे ऐकावे लागते. (कार्यालय चमू)