शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पुसदमध्ये सिग्नल आणि वाहनतळच नाही

By admin | Updated: March 11, 2017 01:00 IST

एक लाखाच्यावर लोकसंख्या असलेल्या पुसद शहरात कुठेही ट्रॅफिक सिग्नल लावण्यात आले नसून वाहनतळांचाही थांगपत्ता लागत नाही.

वाहतुकीची कोंडी : रस्त्यावरच वाहनांचे पार्किंग, अपघातात वाढ, सिग्नलसाठी नगरपरिषदेकडे प्रस्ताव पुसद : एक लाखाच्यावर लोकसंख्या असलेल्या पुसद शहरात कुठेही ट्रॅफिक सिग्नल लावण्यात आले नसून वाहनतळांचाही थांगपत्ता लागत नाही. परिणामी शहरातील वाहतुकीची समस्या गंभीर झाली असून याचा ताण वाहतूक शाखेसह नागरिकांनाही सहन करावा लागत आहे. पुसद शहर आणि लगतच्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या लाखाच्या आसपास आहे. वाढती लोकसंख्या आणि त्यामुळे वाढणारी वाहनांची संख्या शहरात समस्या निर्माण करीत आहे. पुसद शहरातील रस्ते आधीच अरुंद असून या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रकार वारंवार घडतात. शहरात कुठेही ट्रॅफिक सिग्नल लावलेले नाही. वाहतूक पोलिसांना वाहतूक नियंत्रित करावी लागते. परंतु शहरातील रस्त्यावरील हातगाड्यांना बाजूला सारतानाच त्यांची शक्ती खर्च होते, तर काही चौकात वाहतूक पोलीसच दिसत नाही. येथील गजबजलेल्या शिवाजी चौकात चारही बाजूने येणारी वाहने शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वळसा घालतात. त्यावेळी अपघात होण्याची शक्यता असते. भरधाव वाहनांच्या मध्ये पायदळ चालणाऱ्यांचाही गोंधळ सुरू असतो. शहरातील बसस्थानकासमोर आॅटोरिक्षाचालकांचा कायम धुमाकूळ सुरू असतो. विक्रेत्यांनी आपली दुकाने थेट डांबरी रस्त्यालगत लावली आहे. आधीच दुभाजकामुळे रस्ता अरुंद झाला असून या दुकानांमुळे पायदळ चालणाऱ्यांना थेट रस्त्याच्या मधोमध चालावे लागते. त्यामुळे येणाऱ्या वाहनांना अडचणीचे जाते. तसेच खरेदी व इतर व्यवहारासाठी येणारे नागरिकही रस्त्यावरच वाहने उभी करतात. कारण पार्कींगसाठी आवश्यक जागाच सोडण्यात आली नाही. ही समस्या गेल्या कित्येक वर्षापासूनची आहे. यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे. शहरातील इतरही परिसरात अशीच अवस्था दिसून येते. भरधाव जाणाऱ्या दुचाकी अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवितात. पुसद शहरातील शिवाजी चौक आणि बसस्थानकासमोर ट्रॅफिक सिग्नलची आवश्यकता आहे. या ठिकाणी सिग्नल लावल्यास स्वयंचलित पद्धतीने वाहतूक नियंत्रित होवू शकते. यासाठी येथील वाहतूक उपशाखेने नगरपरिषदेकडे प्रस्ताव पाठविला आहे. परंतु अद्याप तरी या प्रस्तावावर उपाययोजना झाली नाही. तसेच शहरात अपवाद वगळता कुठेही वाहनतळ दिसत नाही. केवळ बसस्थानकाच्या आवारात वाहनतळ आहे. शहरात इतर ठिकाणी कुठेही पार्किंगची व्यवस्था नाही. बाजारात खरेदीसाठी चारचाकी वाहन घेवून जाणे म्हणजे अंगावर काटा आणण्यासारखा प्रकार आहे. वाहन पार्किंग करताना जागेची शोधाशोध करण्याच्या वेळात खरेदी होवू शकते. त्यामुळे अनेकजण चारचाकी वाहनाऐवजी दुचाकीनेच बाजारात येतात. परंतु दुचाकी उभी करतानाही दुकानदार आणि इतरांचे बोलणे ऐकावे लागते. (कार्यालय चमू)