शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

पाण्यासाठी पेटुरच्या महिलांचा वणी पंचायत समितीत ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 23:34 IST

तालुक्यातील पेटुर येथे गेल्या १० ते १२ वर्षापासून उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होते. यावर्षीही गावात पाणी टंचाई निर्माण झाल्याने अखेर त्रस्त झालेल्या महिलांनी .......

ठळक मुद्दे१० वर्षांपासून पाणी प्रश्न सुटेना : बीडीओंना घातला एक तास घेराव

ऑनलाईन लोकमतवणी : तालुक्यातील पेटुर येथे गेल्या १० ते १२ वर्षापासून उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होते. यावर्षीही गावात पाणी टंचाई निर्माण झाल्याने अखेर त्रस्त झालेल्या महिलांनी मंगळवारी येथील पंचायत समितीत ठिय्या आंदोलन केले. यावेळी महिलांनी तब्बल एक तास गटविकास अधिकाऱ्यांना घेराव घातला. प्रशासनाच्या ठोस आश्वासनानंतरच हे आंदोलन मागे घेण्यात आले.पेटुर येथील महिलांना दरवर्षी उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याबाबत अनेकदा महिलांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र त्याकडे लक्ष देण्यात न आल्याने अखेर महिलांनी पंचायत समितीवरच धडक दिली. तालुक्यातील मानकी येथील शाळेजवळ बोअरवेल खोदण्यात आला असून तेथे मोठ्या प्रमाणात पाणी आहे. या गावचे अंतर केवळ तीन किलोमीटर असून तेथून पाईपलाईन टाकून पेटुरला पाणी आणावे, अशी मागणी महिलांनी २ फेब्रुवारी रोजी प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून केली होती. मात्र तेव्हापासून या निवेदनावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्याने अखेर त्रस्त झालेल्या महिलांनी पंचायात समितीत ठिय्या आंदोलन केले.यावेळी ५० ते ६० महिलांनी गटविकास अधिकारी राजेश गायनार यांना घेराव घातला. यावेळी गायनार यांनीही महिलांना उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे महिला पुन्हा संतप्त झाल्या. अखेर दोन तासानंतर उपसभापती संजय पिंपळशेंडे यांनी मध्यस्थी करून महिलांची समजूत काढली. तसेच गावात टँकरद्वारे पाणी पुरवठा करू, असे ठोस आश्वासन दिल्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले. तसेच पाईपलाईन टाकण्याचेही आश्वासन यावेळी देण्यात आले.