शहरं
Join us  
Trending Stories
1
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
2
तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
3
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
4
बारामतीतील मुलीवर अंबाजोगाईमध्ये सामूहिक बलात्कार, बदामबाईने आधी कला केंद्रावर नेलं, नंतर लॉजवर...
5
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
6
निवृत्तीनंतर हातात येणार रग्गड पैसा! NPS चे नवीन नियम लागू; ५ वर्षांचा 'लॉक-इन' कालावधी संपला
7
माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार? आज अजित पवार यांची भेट घेणार, मोठ्या निर्णयाची शक्यता
8
शिंदेसेना ही अमित शाहांची 'टेस्ट ट्यूब बेबी', त्यांचा नैसर्गिक जन्म नाही; राऊतांची बोचरी टीका
9
Video - बापमाणूस! ६० फूट खोल बोरवेलमध्ये पडलेल्या लेकीसाठी वडिलांनी लावली जिवाची बाजी
10
विमा क्षेत्रात आता १००% परकीय गुंतवणुकीला मंजुरी; सर्वसामान्यांना स्वस्त पॉलिसी आणि चांगले पर्याय मिळणार?
11
'इस्लामिक दहशतवादाविरोधात उभे राहण्याची गरज', व्हाइट हाऊसमधून ट्रम्प यांचं आवाहन; केली मोठी घोषणा
12
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
13
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
14
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
15
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
16
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
17
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
18
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
19
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
20
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

वणीत धान्य खरेदीवर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 23:48 IST

बाजार समितीच्या यार्डाच्या बाहेर अवैधपणे धान्य खरेदी करणाऱ्या तीन प्रतिष्ठानावर बाजार समितीने धाडी टाकून सात लाख रूपयांचे धान्य जप्त केले. शुक्रवारी दुपारी बाजार समितीच्या पथकाने ही कारवाई केली.

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : बाजार समितीच्या यार्डाच्या बाहेर अवैधपणे धान्य खरेदी करणाऱ्या तीन प्रतिष्ठानावर बाजार समितीने धाडी टाकून सात लाख रूपयांचे धान्य जप्त केले. शुक्रवारी दुपारी बाजार समितीच्या पथकाने ही कारवाई केली.सध्या सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांच्या हाती आल्याने बाजारपेठेत सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात येत आहे. कृषी पणन नियमानुसार शेतकºयांना आपला माल बाजार समितीच्यामार्फतच विकावा लागतो. बाजार समितीला व शासनाला त्यामधून सेस प्राप्त होतो. मात्र मागील आठवड्यापासून शहरात विविध ठिकाणी बाजार समितीला डावलून काही व्यापारी अवैधपणे धान्य खरेदी करीत आहे. ही माहिती बाजार समितीला मिळाल्यावरून बाजार समितीच्या पथकाने शहरातील काही प्रतिष्ठानांवर धाड टाकली. त्यामध्ये अवैधपणे धान्य खरेदी करताना आढळल्याने बाजार समितीने नियमानुसार कारवाई केली. पहिली धाड लालगुडा परिसरातील रामदेव ट्रेडर्सवर टाकण्यात आली. तेथे अवैधपणे खरेदी केलेले ५० लाख रूपयांचे एक हजार ५०० क्विंटल सोयाबीन पथकाच्या हाती लागले. त्यानंतर आंबेडकर चौकामधील राजू निंबाळकर यांच्या दुकानातून ३० क्विंटल सोयाबीन व तीन क्विंटल तूर पथकाला मिळाली, तर नांदेपेरा मार्गावरील एका मंगल कार्यालयासमोर असलेल्या प्रतिष्ठानात १७ क्विंटल सोयाबीन दुकानाच्या बाहेर ठेवलेले आढळून आले. दुकानदाराला धाडीची कुणकुण लागताच त्याने दुकानातील शटर बंद करून तेथून पोबारा केला. वृत्त लिहीपर्यंत धान्य जप्तीची कारवाई सुरूच होती. भरारी पथकांमध्ये सचिव अशोक झाडे, रमेश पुरी, अशोक घुगुल, कैलास कारगीरवार, सुनील निमजे, परशुराम अहीरकर, आरिफ खान, मनोज वैद्य यांचा समावेश होता. या तिनही व्यापाऱ्यांना बाजार समितीच्या नोटीस देऊन सेस, बाजार फी व दंड भरण्यास सांगण्यात येणार आहे. तो न भरल्यास पुढील कारवाई करण्यात येईल, असे सचिव अशोक झाडे यांनी सांगितले.शेतकऱ्यांनी माल बाजार समितीतर्फेच विकावा - संतोष कुचनकारशेतकऱ्यांनी आपला शेतमाल अवैधपणे कोणत्याही व्यापाºयाला न विकता तो बाजार समितीतर्फेच विकावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती संतोष कुचनकार यांनी शेतकºयांना केले आहे. पुढे शासनाने कोणत्याही दिलेल्या योजनेपासून शेतकरी वंचित राहू शकतो. त्यामुळे शेतकºयांनी स्वत:चे नुकसान करून घेऊ नये, असेही त्यांनी सांगितले.