शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

एसीबी ट्रॅपमध्ये शिक्षेचे प्रमाण नगण्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 20:18 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकल्यानंतर शिक्षा हमखास होते, असा समज सर्वश्रृत आहे. मात्र आता या समजाला छेद बसला असून यवतमाळ एसीबीने दाखल केलेल्या प्रकरणात वर्षभरात केवळ एका गुन्ह्यात दोषसिद्ध झाला तर तीन आरोपींना निर्दोष सोडण्यात आले. यावरून एसीबीच्या दोषसिद्धीचे प्रमाण नगण्य असल्याचे स्पष्ट होते.

ठळक मुद्देवर्षभरात एकच शिक्षा : एकूण १४४ प्रकरणे न्यायालयात

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकल्यानंतर शिक्षा हमखास होते, असा समज सर्वश्रृत आहे. मात्र आता या समजाला छेद बसला असून यवतमाळ एसीबीने दाखल केलेल्या प्रकरणात वर्षभरात केवळ एका गुन्ह्यात दोषसिद्ध झाला तर तीन आरोपींना निर्दोष सोडण्यात आले. यावरून एसीबीच्या दोषसिद्धीचे प्रमाण नगण्य असल्याचे स्पष्ट होते.एसीबीच्या सापळा कारवाईत अनेक तांत्रिक बाबींचा वापर केला जातो. पूर्वी पंच न्यायालयात होस्टाईल (फितूर) होत असल्याने आता प्रत्येक कारवाईदरम्यान शासकीय कर्मचाऱ्यांनाच पंच म्हणून ठेवण्यात येते. याचा फायदा सुरुवातीला मिळाला. दोषसिद्धीचे प्रमाण वाढले. मात्र आता पुन्हा उतरतीकळा लागली आहे. ट्रॅप झाल्यानंतर एसीबीकडून दोषारोपपत्र सादर करण्यासाठी आरोपी लोकसेवकाच्या सक्षम अधिकाºयाकडे परवानगी मागितली जाते. ही परवानगी मिळताच न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले जाते. ही प्रकरणे अनेक दिवस रेंगाळत असल्याने साक्ष-पुराव्याच्या वेळी फिर्यादीच्या बयानात बरीच तफावत राहते. याचा फायदा बचाव पक्षाचे वकील घेतात. तसेच दोषारोपपत्रातही उणिवा राहत असल्याने सरळ लाभ आरोपीला मिळतो. त्यामुळेच मागील काही दिवसांपासून एसीबीच्या प्रकरणांमध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.गुन्हेसिद्धीचे प्रमाण वाढविण्यासाठी वरिष्ठांकडून सातत्याने निर्देश दिले जातात. मात्र वर्षभरातील ट्रॅपची संख्या व आरोपी हीच आपली कामगिरी समजून गुन्हे सिद्ध करण्याकडे काहीसे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. लाच घेणे किंंवा लाचेची मागणी करणे यावरूनही गुन्हा दाखल होतो. तत्काळ तपासही केला जातो. पुढे मात्र त्याचा योग्य पाठपुरावा होत नसल्याने बहुतांश प्रकरणात आरोपींना न्यायालयात फायदा मिळत आहे.सापळ्यासाठी तांत्रिक साधनानंतरही अपयशएसीबीकडून सापळा रचताना तांत्रिक साधनांचाही वापर केला जातो. प्रामुख्याने लाचेची मागणी किंवा स्वीकारताना होत असल्याच्या प्रकरणांमध्ये फिर्यादीला कॉल रेकॉर्ड करणे, व्हीडीओ चित्रीकरणाचीही सुविधा उपलब्ध आहे. त्यानंतरही दोषसिद्धी मात्र कमी आहे.