शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

एसीबी ट्रॅपमध्ये शिक्षेचे प्रमाण नगण्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 20:18 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकल्यानंतर शिक्षा हमखास होते, असा समज सर्वश्रृत आहे. मात्र आता या समजाला छेद बसला असून यवतमाळ एसीबीने दाखल केलेल्या प्रकरणात वर्षभरात केवळ एका गुन्ह्यात दोषसिद्ध झाला तर तीन आरोपींना निर्दोष सोडण्यात आले. यावरून एसीबीच्या दोषसिद्धीचे प्रमाण नगण्य असल्याचे स्पष्ट होते.

ठळक मुद्देवर्षभरात एकच शिक्षा : एकूण १४४ प्रकरणे न्यायालयात

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकल्यानंतर शिक्षा हमखास होते, असा समज सर्वश्रृत आहे. मात्र आता या समजाला छेद बसला असून यवतमाळ एसीबीने दाखल केलेल्या प्रकरणात वर्षभरात केवळ एका गुन्ह्यात दोषसिद्ध झाला तर तीन आरोपींना निर्दोष सोडण्यात आले. यावरून एसीबीच्या दोषसिद्धीचे प्रमाण नगण्य असल्याचे स्पष्ट होते.एसीबीच्या सापळा कारवाईत अनेक तांत्रिक बाबींचा वापर केला जातो. पूर्वी पंच न्यायालयात होस्टाईल (फितूर) होत असल्याने आता प्रत्येक कारवाईदरम्यान शासकीय कर्मचाऱ्यांनाच पंच म्हणून ठेवण्यात येते. याचा फायदा सुरुवातीला मिळाला. दोषसिद्धीचे प्रमाण वाढले. मात्र आता पुन्हा उतरतीकळा लागली आहे. ट्रॅप झाल्यानंतर एसीबीकडून दोषारोपपत्र सादर करण्यासाठी आरोपी लोकसेवकाच्या सक्षम अधिकाºयाकडे परवानगी मागितली जाते. ही परवानगी मिळताच न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले जाते. ही प्रकरणे अनेक दिवस रेंगाळत असल्याने साक्ष-पुराव्याच्या वेळी फिर्यादीच्या बयानात बरीच तफावत राहते. याचा फायदा बचाव पक्षाचे वकील घेतात. तसेच दोषारोपपत्रातही उणिवा राहत असल्याने सरळ लाभ आरोपीला मिळतो. त्यामुळेच मागील काही दिवसांपासून एसीबीच्या प्रकरणांमध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.गुन्हेसिद्धीचे प्रमाण वाढविण्यासाठी वरिष्ठांकडून सातत्याने निर्देश दिले जातात. मात्र वर्षभरातील ट्रॅपची संख्या व आरोपी हीच आपली कामगिरी समजून गुन्हे सिद्ध करण्याकडे काहीसे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. लाच घेणे किंंवा लाचेची मागणी करणे यावरूनही गुन्हा दाखल होतो. तत्काळ तपासही केला जातो. पुढे मात्र त्याचा योग्य पाठपुरावा होत नसल्याने बहुतांश प्रकरणात आरोपींना न्यायालयात फायदा मिळत आहे.सापळ्यासाठी तांत्रिक साधनानंतरही अपयशएसीबीकडून सापळा रचताना तांत्रिक साधनांचाही वापर केला जातो. प्रामुख्याने लाचेची मागणी किंवा स्वीकारताना होत असल्याच्या प्रकरणांमध्ये फिर्यादीला कॉल रेकॉर्ड करणे, व्हीडीओ चित्रीकरणाचीही सुविधा उपलब्ध आहे. त्यानंतरही दोषसिद्धी मात्र कमी आहे.