शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

नेरमध्ये वांझ बियाण्यांचे पंचनामे कासवगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 05:00 IST

नेर तालुक्यात शेकडो तक्रारी दाखल झाल्या. मात्र पंचनामे अतिशय संथगतीने सुरू आहे. काही शेतकऱ्यांनी पुन्हा पेरणीची तयारी सुरू केली आहे. मात्र उगवले नसलेल्या बियाण्यांचे पंचनामे व्हायचे असल्याने त्यांच्यापुढे अडचण निर्माण झाली आहे. तालुक्यात १८० तक्रारी दाखल झाल्या. त्यातील केवळ ५० निकाली काढण्यात आल्या.

ठळक मुद्दे१८० तक्रारी दाखल : पुन्हा पेरणीसाठी शेतकऱ्यांपुढे मोठ्या अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : उधार-उसणवार करून, दागदागिने गहाण ठेवून, खासगी सावकारांकडून कर्ज घेवून पेरलेले बियाणे वांझ निघाल्याने शेतकऱ्यांचे अवसान गळाले. आता सरकारी खाक्याचा जाच त्यांना सहन करावा लागत आहे. नेर तालुक्यात शेकडो तक्रारी दाखल झाल्या. मात्र पंचनामे अतिशय संथगतीने सुरू आहे. काही शेतकऱ्यांनी पुन्हा पेरणीची तयारी सुरू केली आहे. मात्र उगवले नसलेल्या बियाण्यांचे पंचनामे व्हायचे असल्याने त्यांच्यापुढे अडचण निर्माण झाली आहे. तालुक्यात १८० तक्रारी दाखल झाल्या. त्यातील केवळ ५० निकाली काढण्यात आल्या.कापूस घरातच पडून असल्याने खरिपाच्या पेरणीसाठी पैसा उभा होऊ शकला नाही. बँकांनी कर्ज उपलब्ध करून देण्याचे सौजन्य दाखविले नाही. मान्सूनचा पाऊस सुरू झाला. पण पैशांची सोय नसल्याने आडाचेदीड करण्यात आले. कसातरी पैसा उभा होवून बी-बियाणे, रासायनिक खते शेतकऱ्यांनी आणली. मजूर टंचाई, पेरणीच्या साहित्याचा अभाव यातून मार्ग काढत बळीराजाने टोबणी, पेरणी केली. आठ-दहा दिवसांचा कालावधी लोटला, पाऊसही झाला, मात्र बियाणे अंकुरले नाही. याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. अखेर झालेही तसेच. शेतात टाकलेले अर्धेअधिक बियाणे उगवले नाही.निकृष्ट बियाणे विक्रेत्यांनी माथी मारल्याच्या निर्णयाप्रत शेतकरी पोहोचले. तक्रार करूनही विक्रेते मानले नाही. ‘आम्ही विक्रेता आहो, उत्पादक नाही’ असा प्रबोधनाचा डोज पाजून शेतकऱ्यांना परत पाठविले. अखेरचा पर्याय म्हणून कृषी विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या. या विभागाचे अधिकारी, कर्मचारी येतील, पंचनामे करून जातील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी शेतामध्ये नवीन पेरणीच्यादृष्टीने काहीही केले नाही. खूप दिवसांचा कालावधी लोटला जात असतानाही कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची पावलं नुकसानग्रस्त काही शेतांकडे वळली नाही.नवीन तक्रारी केव्हा निकाली निघणार ?पेरणीला उशीर झाल्यास उत्पादनात घट येते, याचे भान संबंधितांना राहिले नसल्याचे दिसून येते. अजूनही तक्रारींचे प्रमाण वाढत आहे. आधीच्या तक्रारींनाच हात लागला नाही, तर नवीन तक्रारी केव्हा निकाली निघणार हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. हाच विषय घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील खाडे यांच्या पुढाकारात किशोर खोब्रागडे, महेश काळे, श्याम काळे आदींनी तक्रारी नोंदविल्या. पंचनामे तात्काळ करण्याची मागणी त्यांनी केली. तालुक्यातील अनेक गावात बियाणे वांझ निघाल्याचे सांगितले जाते.कर्मचाºयांच्या तुटवड्याने अडचणी येत आहेत. शेतात जावून पंचनामे त्वरित व्हावे, हा प्रयत्न आहे. १२२ गावांसाठी केवळ १८ कृषी सहायक आहेत. तरीही अधिकाधिक प्रकरणे निकाली काढली जाईल.- नामदेव कुमरे,तालुका कृषी अधिकारी, नेर

टॅग्स :agricultureशेती