शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

नेरमध्ये वांझ बियाण्यांचे पंचनामे कासवगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 05:00 IST

नेर तालुक्यात शेकडो तक्रारी दाखल झाल्या. मात्र पंचनामे अतिशय संथगतीने सुरू आहे. काही शेतकऱ्यांनी पुन्हा पेरणीची तयारी सुरू केली आहे. मात्र उगवले नसलेल्या बियाण्यांचे पंचनामे व्हायचे असल्याने त्यांच्यापुढे अडचण निर्माण झाली आहे. तालुक्यात १८० तक्रारी दाखल झाल्या. त्यातील केवळ ५० निकाली काढण्यात आल्या.

ठळक मुद्दे१८० तक्रारी दाखल : पुन्हा पेरणीसाठी शेतकऱ्यांपुढे मोठ्या अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : उधार-उसणवार करून, दागदागिने गहाण ठेवून, खासगी सावकारांकडून कर्ज घेवून पेरलेले बियाणे वांझ निघाल्याने शेतकऱ्यांचे अवसान गळाले. आता सरकारी खाक्याचा जाच त्यांना सहन करावा लागत आहे. नेर तालुक्यात शेकडो तक्रारी दाखल झाल्या. मात्र पंचनामे अतिशय संथगतीने सुरू आहे. काही शेतकऱ्यांनी पुन्हा पेरणीची तयारी सुरू केली आहे. मात्र उगवले नसलेल्या बियाण्यांचे पंचनामे व्हायचे असल्याने त्यांच्यापुढे अडचण निर्माण झाली आहे. तालुक्यात १८० तक्रारी दाखल झाल्या. त्यातील केवळ ५० निकाली काढण्यात आल्या.कापूस घरातच पडून असल्याने खरिपाच्या पेरणीसाठी पैसा उभा होऊ शकला नाही. बँकांनी कर्ज उपलब्ध करून देण्याचे सौजन्य दाखविले नाही. मान्सूनचा पाऊस सुरू झाला. पण पैशांची सोय नसल्याने आडाचेदीड करण्यात आले. कसातरी पैसा उभा होवून बी-बियाणे, रासायनिक खते शेतकऱ्यांनी आणली. मजूर टंचाई, पेरणीच्या साहित्याचा अभाव यातून मार्ग काढत बळीराजाने टोबणी, पेरणी केली. आठ-दहा दिवसांचा कालावधी लोटला, पाऊसही झाला, मात्र बियाणे अंकुरले नाही. याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. अखेर झालेही तसेच. शेतात टाकलेले अर्धेअधिक बियाणे उगवले नाही.निकृष्ट बियाणे विक्रेत्यांनी माथी मारल्याच्या निर्णयाप्रत शेतकरी पोहोचले. तक्रार करूनही विक्रेते मानले नाही. ‘आम्ही विक्रेता आहो, उत्पादक नाही’ असा प्रबोधनाचा डोज पाजून शेतकऱ्यांना परत पाठविले. अखेरचा पर्याय म्हणून कृषी विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या. या विभागाचे अधिकारी, कर्मचारी येतील, पंचनामे करून जातील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी शेतामध्ये नवीन पेरणीच्यादृष्टीने काहीही केले नाही. खूप दिवसांचा कालावधी लोटला जात असतानाही कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची पावलं नुकसानग्रस्त काही शेतांकडे वळली नाही.नवीन तक्रारी केव्हा निकाली निघणार ?पेरणीला उशीर झाल्यास उत्पादनात घट येते, याचे भान संबंधितांना राहिले नसल्याचे दिसून येते. अजूनही तक्रारींचे प्रमाण वाढत आहे. आधीच्या तक्रारींनाच हात लागला नाही, तर नवीन तक्रारी केव्हा निकाली निघणार हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. हाच विषय घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील खाडे यांच्या पुढाकारात किशोर खोब्रागडे, महेश काळे, श्याम काळे आदींनी तक्रारी नोंदविल्या. पंचनामे तात्काळ करण्याची मागणी त्यांनी केली. तालुक्यातील अनेक गावात बियाणे वांझ निघाल्याचे सांगितले जाते.कर्मचाºयांच्या तुटवड्याने अडचणी येत आहेत. शेतात जावून पंचनामे त्वरित व्हावे, हा प्रयत्न आहे. १२२ गावांसाठी केवळ १८ कृषी सहायक आहेत. तरीही अधिकाधिक प्रकरणे निकाली काढली जाईल.- नामदेव कुमरे,तालुका कृषी अधिकारी, नेर

टॅग्स :agricultureशेती