शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

नेरमध्ये वांझ बियाण्यांचे पंचनामे कासवगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 05:00 IST

नेर तालुक्यात शेकडो तक्रारी दाखल झाल्या. मात्र पंचनामे अतिशय संथगतीने सुरू आहे. काही शेतकऱ्यांनी पुन्हा पेरणीची तयारी सुरू केली आहे. मात्र उगवले नसलेल्या बियाण्यांचे पंचनामे व्हायचे असल्याने त्यांच्यापुढे अडचण निर्माण झाली आहे. तालुक्यात १८० तक्रारी दाखल झाल्या. त्यातील केवळ ५० निकाली काढण्यात आल्या.

ठळक मुद्दे१८० तक्रारी दाखल : पुन्हा पेरणीसाठी शेतकऱ्यांपुढे मोठ्या अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : उधार-उसणवार करून, दागदागिने गहाण ठेवून, खासगी सावकारांकडून कर्ज घेवून पेरलेले बियाणे वांझ निघाल्याने शेतकऱ्यांचे अवसान गळाले. आता सरकारी खाक्याचा जाच त्यांना सहन करावा लागत आहे. नेर तालुक्यात शेकडो तक्रारी दाखल झाल्या. मात्र पंचनामे अतिशय संथगतीने सुरू आहे. काही शेतकऱ्यांनी पुन्हा पेरणीची तयारी सुरू केली आहे. मात्र उगवले नसलेल्या बियाण्यांचे पंचनामे व्हायचे असल्याने त्यांच्यापुढे अडचण निर्माण झाली आहे. तालुक्यात १८० तक्रारी दाखल झाल्या. त्यातील केवळ ५० निकाली काढण्यात आल्या.कापूस घरातच पडून असल्याने खरिपाच्या पेरणीसाठी पैसा उभा होऊ शकला नाही. बँकांनी कर्ज उपलब्ध करून देण्याचे सौजन्य दाखविले नाही. मान्सूनचा पाऊस सुरू झाला. पण पैशांची सोय नसल्याने आडाचेदीड करण्यात आले. कसातरी पैसा उभा होवून बी-बियाणे, रासायनिक खते शेतकऱ्यांनी आणली. मजूर टंचाई, पेरणीच्या साहित्याचा अभाव यातून मार्ग काढत बळीराजाने टोबणी, पेरणी केली. आठ-दहा दिवसांचा कालावधी लोटला, पाऊसही झाला, मात्र बियाणे अंकुरले नाही. याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. अखेर झालेही तसेच. शेतात टाकलेले अर्धेअधिक बियाणे उगवले नाही.निकृष्ट बियाणे विक्रेत्यांनी माथी मारल्याच्या निर्णयाप्रत शेतकरी पोहोचले. तक्रार करूनही विक्रेते मानले नाही. ‘आम्ही विक्रेता आहो, उत्पादक नाही’ असा प्रबोधनाचा डोज पाजून शेतकऱ्यांना परत पाठविले. अखेरचा पर्याय म्हणून कृषी विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या. या विभागाचे अधिकारी, कर्मचारी येतील, पंचनामे करून जातील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी शेतामध्ये नवीन पेरणीच्यादृष्टीने काहीही केले नाही. खूप दिवसांचा कालावधी लोटला जात असतानाही कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची पावलं नुकसानग्रस्त काही शेतांकडे वळली नाही.नवीन तक्रारी केव्हा निकाली निघणार ?पेरणीला उशीर झाल्यास उत्पादनात घट येते, याचे भान संबंधितांना राहिले नसल्याचे दिसून येते. अजूनही तक्रारींचे प्रमाण वाढत आहे. आधीच्या तक्रारींनाच हात लागला नाही, तर नवीन तक्रारी केव्हा निकाली निघणार हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. हाच विषय घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील खाडे यांच्या पुढाकारात किशोर खोब्रागडे, महेश काळे, श्याम काळे आदींनी तक्रारी नोंदविल्या. पंचनामे तात्काळ करण्याची मागणी त्यांनी केली. तालुक्यातील अनेक गावात बियाणे वांझ निघाल्याचे सांगितले जाते.कर्मचाºयांच्या तुटवड्याने अडचणी येत आहेत. शेतात जावून पंचनामे त्वरित व्हावे, हा प्रयत्न आहे. १२२ गावांसाठी केवळ १८ कृषी सहायक आहेत. तरीही अधिकाधिक प्रकरणे निकाली काढली जाईल.- नामदेव कुमरे,तालुका कृषी अधिकारी, नेर

टॅग्स :agricultureशेती