शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

कडधान्याचा पेरा दोन लाख हेक्टरने वाढला

By admin | Updated: July 16, 2016 02:37 IST

देशात कडधान्य लागवडीचे प्रमाण दरवर्षी घटत असल्याचे पाहून सरकारने मिशन म्हणून कृषी विभागाला हे प्रमाण वाढविण्याचे उद्दीष्ट दिले होते.

कृषी विभाग समाधानी : कपाशी, सोयाबीनमध्ये घट, तूर वाढली यवतमाळ : देशात कडधान्य लागवडीचे प्रमाण दरवर्षी घटत असल्याचे पाहून सरकारने मिशन म्हणून कृषी विभागाला हे प्रमाण वाढविण्याचे उद्दीष्ट दिले होते. त्यानुसार जिल्ह्यात कृषी विभागाने कडधान्याचा पेरा तब्बल दोन लाख हेक्टरने वाढविण्यात यश मिळविले आहे. कडधान्ये आणि विशेषत: डाळीचा पेरा कमी होत आहे. पर्यायाने डाळींची आयात करावी लागते. त्यामुळे सर्वत्र साठेबाजी होत असल्याने भाव गगनाला भिडत आहे. लागवड क्षेत्र वाढविणे, मुबलक प्रमाणात डाळ उपलब्ध करून देणे, आयात रोखणे, साठेबाजी रोखणे या माध्यमातून डाळींचे भाव नियंत्रणात ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. अडचणीतून मार्ग काढण्यासाठी सरकारने कडधान्याचे लागवड क्षेत्र वाढविण्याचे मिशन हाती घेतले. त्याची जबाबदारी कृषी खात्यावर सोपविण्यात आली. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी यांना उद्दीष्ट दिले गेले. त्याचा कृषी सहसंचालक, कृषी आयुक्त, जिल्हाधिकारी सतत आढावा घेत आहे. कृषी विद्यापीठांनाही शेतकऱ्यांना कडधान्य लागवडीसाठी मार्गदर्शन करण्याच्या सूचना दिल्या गेल्या. जिल्ह्यात खरिपाचे नऊ लाख पाच हजार हेक्टर लागवड क्षेत्र आहे. त्यात दरवर्षी सर्वाधिक कापूस पावणे पाच लाख तर सोयाबीनचे क्षेत्र अडीच लाख हेक्टरचे आहे. परंतु यावर्षी त्यात अनुक्रमे ७३ हजार व ३० हजार हेक्टरने घट झाली आहे. त्याऐवजी कडधान्याचे क्षेत्र सध्याच एक लाख ६२ हजार हेक्टरने वाढले आहे. कडधान्याची प्रत्यक्ष लागवड एक लाख ८१ हजार हेक्टरवर झाली आहे. पुढील काही दिवसात त्यात आणखी भर पडून हे क्षेत्र दोन लाख हेक्टरपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यात सर्वाधिक ५० हजार हेक्टर क्षेत्र तूर पिकाचे वाढले आहे. (प्रतिनिधी)