शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

कडधान्याचा पेरा दोन लाख हेक्टरने वाढला

By admin | Updated: July 16, 2016 02:37 IST

देशात कडधान्य लागवडीचे प्रमाण दरवर्षी घटत असल्याचे पाहून सरकारने मिशन म्हणून कृषी विभागाला हे प्रमाण वाढविण्याचे उद्दीष्ट दिले होते.

कृषी विभाग समाधानी : कपाशी, सोयाबीनमध्ये घट, तूर वाढली यवतमाळ : देशात कडधान्य लागवडीचे प्रमाण दरवर्षी घटत असल्याचे पाहून सरकारने मिशन म्हणून कृषी विभागाला हे प्रमाण वाढविण्याचे उद्दीष्ट दिले होते. त्यानुसार जिल्ह्यात कृषी विभागाने कडधान्याचा पेरा तब्बल दोन लाख हेक्टरने वाढविण्यात यश मिळविले आहे. कडधान्ये आणि विशेषत: डाळीचा पेरा कमी होत आहे. पर्यायाने डाळींची आयात करावी लागते. त्यामुळे सर्वत्र साठेबाजी होत असल्याने भाव गगनाला भिडत आहे. लागवड क्षेत्र वाढविणे, मुबलक प्रमाणात डाळ उपलब्ध करून देणे, आयात रोखणे, साठेबाजी रोखणे या माध्यमातून डाळींचे भाव नियंत्रणात ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. अडचणीतून मार्ग काढण्यासाठी सरकारने कडधान्याचे लागवड क्षेत्र वाढविण्याचे मिशन हाती घेतले. त्याची जबाबदारी कृषी खात्यावर सोपविण्यात आली. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी यांना उद्दीष्ट दिले गेले. त्याचा कृषी सहसंचालक, कृषी आयुक्त, जिल्हाधिकारी सतत आढावा घेत आहे. कृषी विद्यापीठांनाही शेतकऱ्यांना कडधान्य लागवडीसाठी मार्गदर्शन करण्याच्या सूचना दिल्या गेल्या. जिल्ह्यात खरिपाचे नऊ लाख पाच हजार हेक्टर लागवड क्षेत्र आहे. त्यात दरवर्षी सर्वाधिक कापूस पावणे पाच लाख तर सोयाबीनचे क्षेत्र अडीच लाख हेक्टरचे आहे. परंतु यावर्षी त्यात अनुक्रमे ७३ हजार व ३० हजार हेक्टरने घट झाली आहे. त्याऐवजी कडधान्याचे क्षेत्र सध्याच एक लाख ६२ हजार हेक्टरने वाढले आहे. कडधान्याची प्रत्यक्ष लागवड एक लाख ८१ हजार हेक्टरवर झाली आहे. पुढील काही दिवसात त्यात आणखी भर पडून हे क्षेत्र दोन लाख हेक्टरपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यात सर्वाधिक ५० हजार हेक्टर क्षेत्र तूर पिकाचे वाढले आहे. (प्रतिनिधी)