शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेपूर्वीच वाढले प्रचार फंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 06:00 IST

मतदार संघातील प्रत्येक तालुका मुख्यालय, गावखेड्यात बॅनर, पोस्टर्स आदींवर हे इच्छुक उमेदवार झळकत आहे. सणांच्या शुभेच्छांसह कोणत्याही कार्यक्रमाच्या निमित्याने मतदारांना उपकृत करण्याची एकही संधी सोडण्यास हे उमेदवार विसरत नाही.

ठळक मुद्देराळेगाव तालुका : अपवाद वगळता विकास कामांचे भूमिपूजन, उद्घाटनास फाटा

के.एस. वर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागण्याची शक्यता आहे. ते पाहता, इच्छुक संभाव्य उमेदवारांकडून मतदारांना प्रभावित करण्यासाठी विविध तंत्राचा जोरदार वापर सुरू झाला आहे. गेल्या दोन-तीन महिन्यापासून हा प्रकार सुरू असून आता शेवटच्या टप्प्यात कमालीची गती आली आहे.मतदार संघातील प्रत्येक तालुका मुख्यालय, गावखेड्यात बॅनर, पोस्टर्स आदींवर हे इच्छुक उमेदवार झळकत आहे. सणांच्या शुभेच्छांसह कोणत्याही कार्यक्रमाच्या निमित्याने मतदारांना उपकृत करण्याची एकही संधी सोडण्यास हे उमेदवार विसरत नाही. मतदारांच्या वैयक्तीक सुख-दुखात सामिल होण्यासोबतच काय हवे नको याबाबतही आपुलकी दाखवून जवळीक साधण्याचा प्रयत्न होत आहे. पोळ्यात शेतकऱ्यांचा सन्मान होवू लागला आहे. तर शिक्षक दिनी शिक्षक पुरस्कृत होवू लागले आहे. गणपतीच्या शुभेच्छा बॅनरसह सोशल मीडियातून दिल्या जात आहे.उद्घाटन व भूमिपूजनाच्या माध्यमातून परिसराच्या विकासाची दिशा कळू शकते. पण यावेळी प्रथमच एकाद दुसरा अपवाद वगळता महत्वाच्या राजकीय पक्षांनी याबाबींना फाटा दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दुसरीकडे मतदार संघात अनेक ज्वलंत प्रश्न कायम असताना विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही आवाज उठविला नाही. एकाही प्रकरणात गंभीरतेने जनआंदोलन केले नाही. याबाबतही मतदारात चर्चा सुरू आहे. एकीकडे मतदारसंघात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. विकास कामांची सर्वांनाच आस आहे. मात्र या बाबींकडे सत्ताधारी आणि विरोधक दुर्लक्ष करीत असून केवळ विविध फंडे वापरून प्रचार करीत आहेत.मोबाईलवर येत आहे ढिगभर संदेशगेल्या तीन-चार दिवसापासून या मतदार संघातील नागरिकांच्या मोबाईलवर टेप केलेल्या संदेशाचे प्रसारण सुरू झाले आहे. ‘आगामी विधानसभा निवडणुकीकरिता उमेदवारीच्या प्रयत्नात आहे. आपणाकडून सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा बाळगतो’ अशा आशयाचा संदेश फिरू लागला आहे. एका-एका मोबाईलवर हा संदेश दिवसातून अनेकदा धडकत आहे. त्यामुळे मतदारही त्रस्त होत आहे. आचारसंहिता लागल्यावर सोशल मीडियावर येणारी बंधने आणि प्रचार खर्चाचा द्यावा लागणार हिशेब यातून सुटण्यासाठी आतापासूनच प्रचाराचा हा फंडा वापरला जात आहे.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभा