शहरं
Join us  
Trending Stories
1
मनधरणी, तणाव अन् खून...! मुंबईत भाजप-शिंदेसेनेची ठाकरे बंधूंशी थेट लढत, ठाण्यात ७, कल्याण-डोंबिवलीत २०, भिवंडीत ६ उमेदवार बिनविरोध
2
सोलापूर हादरले : ‘बिनविरोध’साठी झालेल्या वादातून मनसे विद्यार्थी शहराध्यक्षाचा भरदिवसा खून
3
राज्यात फक्त अन् फक्त मराठीच सक्तीची! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी स्पष्टोक्ती  
4
धक्कादायक! नागपुरात १२ वर्षीय मुलाला आई-वडिलांनीच साखळी कुलपाने बांधून ठेवले 
5
मराठी दलित साहित्य हा भारतीय साहित्यविश्वाचा आधारस्तंभ - मृदुला गर्ग  
6
मराठी शाळा टिकव्यात, इथेच ज्ञानेश्वर-तुकोबा घडतील; विश्वास पाटील यांचे प्रशासकीय उदासीनतेवर बोट
7
कृतिशील, निर्मितीशील असणे हेच जीवनाचे इतिवृत्त - तारा भवाळकर
8
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
9
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
10
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
11
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
12
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
13
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
14
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
15
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
16
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
17
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
18
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
19
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
20
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक बांधकाम; अर्धवट बांधकामे सुस्थितीत आणून बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 19:07 IST

पावसाळा महिनाभरावर आल्याने राज्यात अर्धवट स्थितीत असलेली रस्ते, पूल व इमारतींची बांधकामे सुस्थितीत आणून बंद करावी, असे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाने सोमवारी जारी केले.

ठळक मुद्देनव्या कामांना ब्रेककर्जावरील बिगबजेट कामे मात्र सुरूच राहणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पावसाळा महिनाभरावर आल्याने राज्यात अर्धवट स्थितीत असलेली रस्ते, पूल व इमारतींची बांधकामे सुस्थितीत आणून बंद करावी, असे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाने सोमवारी जारी केले.मार्च २०१९ पूर्वी जी कामे मंजूर झाली, परंतु अद्याप सुरू झाली नाही ती सुरू केली जाऊ नये. जी कामे प्रगतीत आहेत त्यांना सुस्थितीत आणून ठेवावे व नंतर ती बंद करावी, असे आदेश आहे. परंतु हायब्रीड अ‍ॅन्युईटी, केंद्रीय मार्ग निधी, आशियाई विकास बँक अर्थसहाय्यीत प्रकल्प, रेल्वे सुरक्षा, नाबार्ड या योजनेअंतर्गत सुरू असलेली कामे पुढेही सुरू ठेवण्यास मंजुरी देण्यात आली. ही कामे कर्जातील निधीतून सुरू असल्याने व्याज वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्याला ग्रीन सिग्नल दिला गेला.राज्यमार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गांची कामे राज्यात मोठ्या प्रमाणात हाती घेतली गेली. मात्र सुरू न झालेली आणि कार्यारंभ आदेश जारी न झालेली कामे सुरू करू नये, ती अर्थसंकल्पातून वगळण्याचे प्रस्ताव सादर करावे, असे निर्देशित करण्यात आले. योजनेत्तर कामांबाबतही हेच आदेश लागू आहेत. कामांचे जॉब क्रमांक रद्द करण्याच्या सूचना आहेत. विशेष दुरुस्ती, पूरहानी, द्विवार्षिक देखभाल-दुरुस्ती या कामांचा यात समावेश आहे. जलनिस्सारण, मोऱ्या, पुलांची कामे यातून वगळण्यात आली आहेत.अत्यावश्यक दुरुस्तीचे काय ?राज्यात अनेक ठिकाणी पूल, इमारत, रस्त्यांची दुरुस्ती अत्यावश्यक आहे. ती न केल्यास अपघात वाढण्याचा, जीवित हानी होण्याचा धोका निर्माण होतो. शिवाय वेळीच दुरुस्ती न झाल्यास भविष्यात त्या कामाचा खर्च वाढतो. अनेकदा दुरुस्तीने व्यवस्थित होणारी ही कामे संपूर्ण नव्यानेच करण्याची वेळ येते. याबाबी लक्षात घेता अत्यावश्यक दुरुस्तीच्या कामांना शासनाने परवानगी द्यायला हवी, असा सार्वजनिक बांधकाम अभियंत्यांचा सूर आहे.पैशाचे कुणीच काही बोलेना !मार्चच्या अखेरीस शासनाने सार्वजनिक बांधकाम खात्याला निधी दिला. परंतु तांत्रिक अडचण निर्माण करून लगेच शेकडो कोटींचा हा निधी ३१ मार्चला परत घेतला गेला. कोरोनामुळे बांधकाम खात्यात निधी नाही, आहे तो परत घेतला गेला, आता पुढे निधी केव्हा मिळणार याचे सूतोवाच कुणीही करण्यास तयार नाही. निधी येण्याची कोणतीही चिन्हे नसल्याने कुणीही कंत्राटदार काम करण्यास तयार नाही. शासनाने प्रगतीवरील कामे सुस्थितीत आणण्याचे आदेश दिले असले तरी या कामांचे पैसे केव्हा मिळणार हे स्पष्ट नाही. त्यामुळे अर्धवट बांधकामे सुस्थितीत आणण्याचे आदेशही कंत्राटदारांकडून थंडबस्त्यात टाकले जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग