शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

वर्धा-नांदेड रेल्वेसाठी यवतमाळात जनसुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 23:59 IST

बहुप्रतिक्षित वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गासाठी भूसंपादन सुरू आहे.

ठळक मुद्देमहसूल राज्यमंत्र्यांचा पुढाकार : वनसचिव, आयुक्त उपस्थित राहणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बहुप्रतिक्षित वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गासाठी भूसंपादन सुरू आहे. परंतु त्याचा योग्य मोबदला मिळत नसल्याच्या शेतकºयांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहे. या तक्रारींचा जागीच निपटारा करण्यासाठी आता २४ सप्टेंबर रोजी प्रधान वन सचिव विकास खारगे यांच्या उपस्थितीत जनसुनावणी घेतली जाणार आहे. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचा पुढाकार त्यासाठी महत्वपूर्ण ठरला आहे.माजी खासदार विजय दर्डा यांच्या विशेष प्रयत्नांनी वर्धा-यवतमाळ-नांदेड हा रेल्वे प्रकल्प मंजूर झाला. २०१९ मध्ये वर्धा ते यवतमाळपर्यंत ही रेल्वे ट्रॅकवर आणण्याचे नियोजन असल्याने वेगाने कामे हाती घेण्यात आली आहे. या मार्गासाठी भूसंपादन केले जात आहे. शेकडो हेक्टर जमीन त्यासाठी संपादित केली जाणार आहे. वर्धा जिल्ह्यातील बहुतांश भूसंपादन झाले आहे. यवतमाळ व कळंब तालुक्यातील भूसंपादनसुद्धा तत्कालीन उपजिल्हाधिकारी (रस्ते प्रकल्प) विजय भाकरे यांच्या कार्यकाळात पूर्णत्वास गेले होते. अन्य उपविभागीय महसूल अधिकाºयांनासुद्धा वेळेत भूसंपादन पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी अल्टीमेटम दिला होता. हे भूसंपादन वेगाने होत असताना त्याचा योग्य मोबदला मिळाला नसल्याची सर्वच जिल्ह्यातून ओरड सुरू आहे. म्हणून महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी त्यासाठी पुढाकार घेत आधी या संबंधीच्या तक्रारी आपल्या जनसंपर्क कार्यालयात बोलविल्या होत्या. २५ आॅगस्टपर्यंत दीडशे पेक्षा अधिक तक्रारी शिवसेनेकडे प्राप्त झाल्या. या तक्रारींवर मुंबईतच जाऊन तोडगा काढण्याऐवजी प्रशासनच यवतमाळात बोलविण्याचा निर्णय ना. राठोड यांनी घेतला. त्यानुसार आता २४ सप्टेंबर रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात उपरोक्त तक्रारींवर जनसुनावणी घेतली जाणार आहे. त्यासाठी खास प्रधान सचिव (वने) विकास खारगे स्वत: उपस्थित राहणार आहे.याशिवाय अमरावतीचे विभागीय महसूल आयुक्त पीयूष सिंग, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, वाशिमचे जिल्हाधिकारी, भूसंपादन अधिकारी व रेल्वे प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाºयांनासुद्धा बोलाविण्यात आले आहे. तक्रारी ऐकून घेऊन त्याचा जागीच निपटारा करण्याचा प्रयत्न या जनसुनावणीत होणार आहे.नेत्यांमधील श्रेयाच्या लढाईची चर्चायवतमाळ-वाशिमच्या शिवसेनेच्या खासदार भावनाताई गवळी यांनी रेल्वे प्रकल्पातील या भूसंपादनाच्या विषयावर नुकतीच राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची मुंबईत प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली होती. या भेटीचे वृत्तही प्रसार माध्यमांमध्ये झळकले. पालकमंत्री मदन येरावार यांनीसुद्धा नुकताच खास आढावा बैठक घेऊन हा विषय लावून धरला. त्यानंतर आता ना. संजय राठोड यांनी या विषयाला हात घातला आहे. जनसुनावणीचा अधिकार महसूल मंत्री, महसूल राज्यमंत्री आणि त्यानंतर थेट मुख्यमंत्र्यांनाच असल्याचे ना. राठोड यांच्या सचिवालयातील यंत्रणेकडून सांगितले जात आहे. तार्इंची मुंबईतील चर्चा आणि त्यानंतर लगेच भाऊंनी जनसुनावणीची तयारी केल्याचे चित्र पाहता ही शिवसेना व भाजपा नेत्यांमधील श्रेयाची व वर्चस्वाची लढाई तर नव्हे ना, असा सूर ऐकायला मिळतो आहे. मात्र केवळ आढावा व चर्चेवर अवलंबून न राहता थेट जनसुनावणीद्वारे मोबदल्याचा हा विषय कायमचा निकाली काढण्याचा महसूल राज्यमंत्र्यांचा प्रयत्न असल्याचे मानले जाते.