शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

३४ रेतीघाटांची होणार जनसुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2021 05:00 IST

या जनसुनावणीमध्ये संबंधित गावातील नागरिकांना आक्षेप नोंदविता येणार आहेत. रेतीघाटा संदर्भातील प्रश्नावर बाेलता येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचतभवनात ही जनसुनावणी १० नोव्हेंबरला पार पडणार आहे.  जिल्ह्यातील २०० रेती घाटांपैकी ३४ रेतीघाटाच्या लिलावाकरीता ग्रामसभेने ठराव दिले आहेत. ठराव दिलेल्या घाटाबाबत  प्रथम  जनसुनावणी त्यानंतर पर्यावरण विभागाच्या दोन कमिटीकडे हे प्रकरण जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : केंद्र शासनाने रेतीघाटाचा लिलाव करण्यापूर्वी काही फेेरबदल सूचविले आहेत. यामध्ये ग्रामसभेने रेतीघाटाच्या हर्रासास परवानगी दिल्या नंतर अशा रेतीघाटाची जनसुनावणी होणार आहे. जिल्ह्यात अशा ३४ रेतीघाटांची १० नोव्हेंबरला जनसुनावणी होणार आहे. या  सुनावणीनंतर संपूर्ण अहवाल पर्यावरण विभागाकडे जाणार आहे. यानंतर लिलावाची प्रक्रिया होणार आहे. यामुळे तूर्त रेतीघाटाच्या लिलावाकरीता प्रतिक्षा करावी लागणार आहे. या जनसुनावणीमध्ये संबंधित गावातील नागरिकांना आक्षेप नोंदविता येणार आहेत. रेतीघाटा संदर्भातील प्रश्नावर बाेलता येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचतभवनात ही जनसुनावणी १० नोव्हेंबरला पार पडणार आहे.  जिल्ह्यातील २०० रेती घाटांपैकी ३४ रेतीघाटाच्या लिलावाकरीता ग्रामसभेने ठराव दिले आहेत. ठराव दिलेल्या घाटाबाबत  प्रथम  जनसुनावणी त्यानंतर पर्यावरण विभागाच्या दोन कमिटीकडे हे प्रकरण जाणार आहे. पर्यावरण विभाग पाहणी करून याबाबत  निर्णय घेणार आहे. ही बैठक मुंबईत पार पडते. तूर्त यासंदर्भातील संपूर्ण प्रक्रिया रखडली असल्याने लिलावाला ब्रेक लागला आहे.  रेती घाट बंद असल्याने याचा परिणाम बांधकामावर होत आहे. वाढीव भावात खरेदीची तयारी असतानाही रेती मिळत नसल्याचे चित्र आहे. 

१६ रेतीघाटातून २२ कोटींचा महसूल- गतवर्षी जिल्ह्यातील १६ रेतीघाटांचाच लिलाव पार पडला. ८९ हजार ९५२ ब्रास रेेेेतीचा उपसा करण्याला परवागनी देण्यात आली. त्याकरीता बोली लावण्यात आली. यामधून २२ कोटी रूपयांचा महसूल प्रशासनाला मिळाला होता. यावर्षी ३४ रेतीघाटातून यापेक्षा अधिक महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.घर बांधकामातील अडचणी वाढल्यारेतीघाटाचा लिलाव न झाल्याने घराचे बांधकाम रखडले आहे. लिलाव प्रक्रियाच नसल्याने रेतीघाटांवर रेती माफीया सक्रीय आहेत. ते मनमानी दराने रेती विकत आहेत. हे दर खरेदीदारांनाही परवडणारे नाहीत. यातून सर्वसामान्य ग्राहकांची लुट सूरू झाली आहे. त्यामुळे पर्यावरण विभागाच्या निर्णयाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :sandवाळू