शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
3
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
4
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
5
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
6
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
7
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
8
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
9
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
10
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
11
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
12
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
13
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
14
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
15
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
16
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
17
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
18
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
19
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
20
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक ठिकाणी पाण्याचा दुष्काळ

By admin | Updated: May 15, 2016 02:03 IST

पांढरकवडा ही तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असून येथे सर्वच विभागांचे कार्यालय आहे. त्यामुळे बाराही महिने येथे नागरिकांची गर्दी असते.

गंभीर समस्या : पांढरकवडा शहरात पाणपोर्इंची संख्या कमीच, पाण्यासाठी वणवण सुरूचपांढरकवडा : पांढरकवडा ही तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असून येथे सर्वच विभागांचे कार्यालय आहे. त्यामुळे बाराही महिने येथे नागरिकांची गर्दी असते. मात्र ऐन उन्हाळ्याच्या दिवसातही शहरातील सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने सर्वत्र पाण्याचा दुष्काळ जाणवत आहे.येथील बसस्थानक, शासकीय कार्यालये, विविध बँकेच्या शाखा, आदी ठिकाणी दररोज नागरिकांची प्रचंड गर्दी असते. मात्र उन्हाळ्याच्या दिवसातही या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची थातुरमातूर व्यवस्था केलेली दिसते. मात्र तेथे घाणीमुळे पाणी कुणीच प्राशन करू शकत नाही. पाण्याचा वापर केवळ हात-पाय धुण्यासाठी केला जात आहे. सध्या बसस्थानकात थंड पिण्याच्या पाण्याची कुठलीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. शहरात काही ठिकाणी केवळ एक-दोन माठ ठेवून काही सामाजिक कार्यकर्ते व संघटना आपले कर्तव्य पूर्ण झाल्याचे समाधान मानत आहे. येथील सार्वजनिक बांधकाम विभागातही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. पंचायत समिती कार्यालयात मात्र बाराही महिने मुबलक व थंड पाणी उपलब्ध असते. तसेच दरवर्षी केळापूर येथील जगदंबा संस्थानतर्फे पाणपोईची व्यवस्था केली जाते. त्यासाठी येथील नगरपरिषद पाणी पुरवठा करीत आहे. हे एकमात्र उदाहरण सोडले, तर शहरात कुठेही पाणपोईची सुरूवात झालेली नसल्याचे दिसते. शहरात तहसील, पंचायत समिती, उपविभागीय अधिकारी कार्यालय, न्यायालय आदी महत्त्वाची कार्यालये आहे. तेथे तालुक्यातील नागरिक आपापल्या कामानिमित्त दररोज येत असतात. मात्र त्यांची तहान भागविण्यासाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे दुरापास्त झाले आहे. अधिकारी व सामाजिक संस्थांमार्फत पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाळ्यात काही परिसरात पाणपोई सुरू करण्याची योजना अद्याप कार्यान्वित होऊ शकलेली नाही. बसस्थानकात पेयजलसाठी जलकुंभही उभारण्यात आलेले नाही. दरवर्षी प्रवाशांना टाकीमधूनच नळाद्वारे येणारे गरम पाणीच प्राशन करावे लागत आहे. (शहर प्रतिनिधी)मे चा उत्तरार्ध आणि जूनमध्ये होणार भयावह अवस्थागेले १५ दिवस सतत पावसाने हजेरी लावल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला नाही. मात्र आता मे महिन्यात सूर्य आग ओकत असल्याने पाण्याची समस्या तीव्र होण्याची शक्यता आहे तसेच जूनमध्येही पाणी प्रश्न निर्माण गंभीर रूप धारण करण्याची शक्यता आहे. परिणामी नागरिकांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही पाण्यासाठी दाहीदिशा पालथ्या घालाव्या लागण्याची शक्यता आहे. बाटली बंद पाणी त्यांना आधार देईल. मात्र सामान्य नागरिकांना बाटली बंद पाणी घेणे परवडणारे नाही. त्यामुळे त्यांची फरफट होण्याची शक्यता बळावली आहे.