शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

सार्वजनिक ठिकाणी पाण्याचा दुष्काळ

By admin | Updated: May 15, 2016 02:03 IST

पांढरकवडा ही तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असून येथे सर्वच विभागांचे कार्यालय आहे. त्यामुळे बाराही महिने येथे नागरिकांची गर्दी असते.

गंभीर समस्या : पांढरकवडा शहरात पाणपोर्इंची संख्या कमीच, पाण्यासाठी वणवण सुरूचपांढरकवडा : पांढरकवडा ही तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असून येथे सर्वच विभागांचे कार्यालय आहे. त्यामुळे बाराही महिने येथे नागरिकांची गर्दी असते. मात्र ऐन उन्हाळ्याच्या दिवसातही शहरातील सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने सर्वत्र पाण्याचा दुष्काळ जाणवत आहे.येथील बसस्थानक, शासकीय कार्यालये, विविध बँकेच्या शाखा, आदी ठिकाणी दररोज नागरिकांची प्रचंड गर्दी असते. मात्र उन्हाळ्याच्या दिवसातही या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची थातुरमातूर व्यवस्था केलेली दिसते. मात्र तेथे घाणीमुळे पाणी कुणीच प्राशन करू शकत नाही. पाण्याचा वापर केवळ हात-पाय धुण्यासाठी केला जात आहे. सध्या बसस्थानकात थंड पिण्याच्या पाण्याची कुठलीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. शहरात काही ठिकाणी केवळ एक-दोन माठ ठेवून काही सामाजिक कार्यकर्ते व संघटना आपले कर्तव्य पूर्ण झाल्याचे समाधान मानत आहे. येथील सार्वजनिक बांधकाम विभागातही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. पंचायत समिती कार्यालयात मात्र बाराही महिने मुबलक व थंड पाणी उपलब्ध असते. तसेच दरवर्षी केळापूर येथील जगदंबा संस्थानतर्फे पाणपोईची व्यवस्था केली जाते. त्यासाठी येथील नगरपरिषद पाणी पुरवठा करीत आहे. हे एकमात्र उदाहरण सोडले, तर शहरात कुठेही पाणपोईची सुरूवात झालेली नसल्याचे दिसते. शहरात तहसील, पंचायत समिती, उपविभागीय अधिकारी कार्यालय, न्यायालय आदी महत्त्वाची कार्यालये आहे. तेथे तालुक्यातील नागरिक आपापल्या कामानिमित्त दररोज येत असतात. मात्र त्यांची तहान भागविण्यासाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे दुरापास्त झाले आहे. अधिकारी व सामाजिक संस्थांमार्फत पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाळ्यात काही परिसरात पाणपोई सुरू करण्याची योजना अद्याप कार्यान्वित होऊ शकलेली नाही. बसस्थानकात पेयजलसाठी जलकुंभही उभारण्यात आलेले नाही. दरवर्षी प्रवाशांना टाकीमधूनच नळाद्वारे येणारे गरम पाणीच प्राशन करावे लागत आहे. (शहर प्रतिनिधी)मे चा उत्तरार्ध आणि जूनमध्ये होणार भयावह अवस्थागेले १५ दिवस सतत पावसाने हजेरी लावल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला नाही. मात्र आता मे महिन्यात सूर्य आग ओकत असल्याने पाण्याची समस्या तीव्र होण्याची शक्यता आहे तसेच जूनमध्येही पाणी प्रश्न निर्माण गंभीर रूप धारण करण्याची शक्यता आहे. परिणामी नागरिकांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही पाण्यासाठी दाहीदिशा पालथ्या घालाव्या लागण्याची शक्यता आहे. बाटली बंद पाणी त्यांना आधार देईल. मात्र सामान्य नागरिकांना बाटली बंद पाणी घेणे परवडणारे नाही. त्यामुळे त्यांची फरफट होण्याची शक्यता बळावली आहे.