शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

ग्रामीण महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकामे अर्धवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 14:02 IST

लॉकडाऊनमुळे महामार्गच नव्हे तर ग्रामीण महाराष्ट्रातील रस्ते, पूल, इमारतींची कामे अर्धवट आहेत. आत्ताच शासनाने ही कामे सुस्थितीत आणण्याचे नियोजन न केल्यास पावसाळ्यात शेकडो गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटण्याची स्थिती निर्माण होणार आहे.

ठळक मुद्देपावसाळ्यात गावांचा संपर्क तुटणार, शासनाचे अद्यापही नियोजन नाही

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लॉकडाऊनमुळे महामार्गच नव्हे तर ग्रामीण महाराष्ट्रातील रस्ते, पूल, इमारतींची कामे अर्धवट आहेत. आत्ताच शासनाने ही कामे सुस्थितीत आणण्याचे नियोजन न केल्यास पावसाळ्यात शेकडो गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटण्याची स्थिती निर्माण होणार आहे.कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन असल्याने दोन महिन्यांपासून सर्वकाही ठप्प आहे. सार्वजनिक बांधकामे जानेवारी ते जून या काळात केली जातात. परंतु यावर्षी फेब्रुवारीपासूनच कोरोनाचे संकट घोंगावत असल्याने शासनाचे या कामांकडे दुर्लक्ष झाले. लॉकडाऊनमुळे ही कामे अर्धवट स्थितीत आहेत. नवा पूल बांधायचा म्हणून जुना पूल तोडला गेला, बांधकामासाठी रस्ता उखडून ठेवण्यात आला, अनेक इमारतींची कामे अर्धवट आहेत. पावसाळा महिनाभरावर आला तरीही अर्धवट बांधकामे पूर्ण करण्याबाबत किंवा किमान सुस्थितीत आणून ठेवण्याबाबत शासनाचे कोणतेही नियोजन नाही. ही कामे आहे त्याच अवस्थेत राहिल्यास ग्रामीण जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागेल, त्यात पावसाळ्यात जीवित हानी होण्याची, गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे.

शासनाने शेकडो कोटी परत घेतले२५ मार्चला शासनाने बांधकाम खात्याला निधी दिला. परंतु बीडीएस प्रणाली बंद करून शासनाने ३१ मार्चला शेकडो कोटी रुपये बांधकाम खात्याकडून परत घेतले. शिवाय भविष्यात निधी केव्हा उपलब्ध होणार याबाबतचे कोणतेही सूतोवाच करण्यात आलेले नाही. त्यामुळे कामे सुरू करण्यास कंत्राटदार तयार नाहीत.कंत्राटदारांची शेकडो कोटींची देयके थकीतआधीच कंत्राटदारांची शेकडो कोटींची देयके थकीत आहे. शासनाचा पैसा घेऊनही ही देयके मिळालेली नाहीत. निधी केव्हा उपलब्ध होणार याबाबत शासनाने आठवडाभरात स्पष्ट धोरण जाहीर करणे अपेक्षित आहे. एकूणच सार्वजनिक बांधकाम खात्यात अभियंते व कंत्राटदारांमध्येसुद्धा संभ्रमाची स्थिती आहे.

पावसाळ्यात डांबर-काँक्रीटीकरण अशक्यशासनाने जूनच्या तोंडावर निधी दिल्यास पावसाळ्यात डांबरीकरण, काँक्रीटीकरण किंवा अन्य बांधकामे करणे अशक्य आहे. त्यामुळे ग्रामीण जनतेला या अपूर्ण बांधकामांचा त्रास सहन करावा लागेल. शासन प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या अभियंत्यांना विश्वासात घेत नाहीत, त्यामुळे ग्रामीण समस्या कायम राहतात, असा सूर बांधकाम खात्यातून ऐकायला मिळतो.‘पीएमजीएसवाय’ला निधीचे ग्रहणप्रत्येक जिल्ह्यात ‘पीएमजीएसवाय’ची २५ ते ३० कोटींची देयके प्रलंबित आहेत. शासनाने समृद्धी महामार्ग, हायब्रीड अ‍ॅन्युईटी, केंद्रीय रस्ते निधी ही कामे तूर्त बाजूला ठेवून आधी ग्रामीण बांधकामांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Governmentसरकार