शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

टिपेश्वर अभयारण्यासाठी निधीची तरतूद करणार

By admin | Updated: August 1, 2016 01:11 IST

जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्य नैसर्गिक संपदेने नटलेले एक उत्कृष्ट पर्यटनस्थळ आहे.

पालकमंत्री : उत्कृष्ट सुविधांवर भर, अभयारण्यात राहण्याच्या व्यवस्थेसाठी प्रयत्न यवतमाळ : जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्य नैसर्गिक संपदेने नटलेले एक उत्कृष्ट पर्यटनस्थळ आहे. या ठिकाणी चांगल्या दर्जाच्या सुविधा निर्माण करून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. यासाठी वन विभागाने पुढाकार घेऊन विकास आराखडा तयार करावा, यासाठी संपूर्ण मदत देण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली. येथील विश्रामगृह येथे टिपेश्वर अभयारण्यातील पर्यटन विकासाबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी पांढरकवडा येथील उपविभागीय अधिकारी दीपककुमार मिना, उपवनसंरक्षक गुरूप्रसाद आदी उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले, जंगल सफारी आणि व्याघ्र पर्यटनासाठी राज्यभरातील नागरिक आता टिपेश्वरचे नाव घेऊ लागले आहे. राष्ट्रीय महामार्गालगत हे अभयारण्य आहे. त्यामुळे याठिकाणी पोहोचण्याचा प्रश्न नाही. मात्र याठिकाणी पर्यटकांना राहण्याची चांगली व्यवस्था नाही. परिणामी केवळ दिवसा पर्यटन करण्यावर पर्यटक भर देत आहे. याठिकाणी चांगल्या दर्जाची राहण्याची व्यवस्था झाल्यास अनेक पर्यटक याकडे आकृष्ट होतील. टिपेश्वर लगतच्या परिसराचा विकास करण्यासाठी खासगी व्यक्तींनी पुढाकार घेतला असताना शासनाने आता मागे राहू नये. प्रामुख्याने पावसाळ्यात वनवैभव चांगल्या स्थितीत असते. मात्र या काळात जंगल सफारी करणे दुरापास्त असल्याने येत्या काळात सफारीसाठी चांगल्या दर्जाचे रस्ते उभारावे लागतील. यासाठी वन विभागाने विकास आराखडा तयार करावा. त्यासाठी जिल्हा नियोजन निधी उपलब्ध करून देण्यात येईल. व्याघ्र दर्शनासाठी टिपेश्वर हे एक चांगले ठिकाण आहे. गेल्या फेब्रुवारी ते जून महिन्याच्या दरम्यान आलेल्या सुमारे ९० टक्के पर्यटकांना वाघाचे दर्शन झाले आहे. राज्यातील इतर अभयारण्यापेक्षा याठिकाणी सुलभरित्या वाघाचे दर्शन होत असल्यामुळे पर्यटकांची गर्दी होऊ घातली आहे. त्यांच्यासाठी सोयी-सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे. यासाठी वन विभागाने विकास आराखडा तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी पूर्ण मदत करण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. टिपेश्वर अभयारण्यामुळे केवळ एका तालुक्याचा विकास होणार नसून संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याच्या विकासात या अभयारण्याचे मोठे योगदान राहणार आहे. कोणतीही सुविधा न देता याठिकाणी पर्यटकांचा ओढा कायम आहे. पर्यटक याठिकाणी यावेत, यासाठी सुविधा निर्माण झाल्यास जिल्ह्याच्या विकासास हातभार लागण्यास निश्चितच मदत होणा आहे. त्यामुळे वेळ पडल्यास टिपेश्वरच्या विकासासाठी जिल्हा नियोजन निधीमध्ये विशेष तरतूद करण्यात येईल, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)