शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

जिल्ह्यातील साडेचार लाख शेतकऱ्यांना पीक विमा त्वरित द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:41 IST

महागाव : जिल्ह्यातील साडेचार लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. यात दारव्हा मतदारसंघातील दिग्रस व दारव्हा तालुक्यातील आठ हजार ...

महागाव : जिल्ह्यातील साडेचार लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. यात दारव्हा मतदारसंघातील दिग्रस व दारव्हा तालुक्यातील आठ हजार ४०० शेतकऱ्यांना पात्र ठरवून लाभ देण्यात आला. मात्र, उर्वरित शेतकरी अद्याप वंचित आहे. त्यांना तत्काळ लाभ् द्यावा, अशी मागणी विदर्भ जनआंदोलन समितीने केली, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

दारव्हा विधानसभा मतदारसंघ वगळता इतर शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळालेला नाही. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. वंचित शेतकर्‍यांना त्वरित पीक विम्याचा लाभ देण्यात यावा, अन्यथा विदर्भ जनआंदोलन संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन उभारण्यात येईल, असे अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत विमा कंपन्यांची तत्काळ बैठक बोलावणार असल्याचे सांगण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे वंचित साडेचार लाख शेतकऱ्यांना विमा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. गतवर्षी शासनाने आवाहन केल्यानुसार, साडेचार लाख शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला होता. यातून विमा कंपन्यांनी कोट्यवधींची माया गोळा केली. त्या तुलनेमध्ये शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही. जिल्ह्यातील विशिष्ट तालुक्याला विमा कंपन्यांनी लाभ दिला. हा इतर शेतकऱ्यांवर अन्याय आहे, असे समितीने म्हटले आहे. समितीने विमा कंपन्यांविरुद्ध तत्काळ कार्यवाही करण्याचे निवेदन दिले, अन्यथा ही बाब न्यायालयात नेण्याचा इशारा दिला.