शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा करा

By admin | Updated: March 17, 2017 02:44 IST

शहरासाठी आतापर्यंत लाखो रुपये खर्च करून पाणीपुरवठा योजनेची चार मोठी कामे करण्यात आली.

संजय राठोड : दारव्हा पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा प्रारंभ दारव्हा : शहरासाठी आतापर्यंत लाखो रुपये खर्च करून पाणीपुरवठा योजनेची चार मोठी कामे करण्यात आली. तरीसुद्धा पाण्याची समस्या कायम आहे. नवीन योजना कार्यान्वित झाल्यानंतर मात्र सर्व नागरिकांना स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा झाला पाहिजे, अशी सूचना महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी नगरपरिषदेला दिली. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान (राज्यस्तर) योजनेंतर्गत दारव्हा शहरातील कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेकरिता ३४ कोटी ३४ लाख रुपये मंजूर झाले. या योजनेच्या कामाचा शुभारंभ संजय राठोड यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. विकास कामांकरिता शासन कोट्यवधी रुपये खर्च करते. परंतु कामाचा दर्जा व तांत्रिक बाजू योग्य नसल्यास नागरिकांना त्याचा पाहिजे तसा लाभ मिळत नाही. त्यामुळे या योजनेचे तसे होता कामा नये, असे ते म्हणाले. पाणीपुरवठा योजनेसोबतच शहर स्वच्छता, भुयारी गटार, खुल्या जागांचा विकास, रस्ते बांधकाम, पथदिवे आदी कामांसाठी नगरपरिषदेचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, आवश्यक तो निधी मिळवून देवू, असे आश्वासनही त्यांनी दिले. कार्यक्रमाला नगराध्यक्ष बबनराव इरवे, उपाध्यक्ष प्रीती बलखंडे, सभापती आरिफ काजी, प्रकाश दुधे, वैशाली खाटिक, गजेंद्र चव्हाण, रवी तरटे, नगरसेवक प्रकाश गोकुळे, अरविंद निंबर्ते, दीपा सिंगी, सीमा चिरडे, शरद गुल्हाने, जयश्री खरोडे, मीरा कराळे, सुनीता ठाकरे, शुभम गवई, जिल्हा परिषद सदस्य श्रीधर मोहोड, कालिंदा पवार, राधा थरकडे, अश्विनी कुरसिंगे, पंचायत समिती सभापती उषा चव्हाण, उपसभापती पंडित राठोड, सदस्य नामदेव जाधव, साहेबराव कराळे, सुनीता राऊत, सिंधुताई राठोड, सविता जाधव, शारदा दुधे, शारदा मडावी आदी उपस्थित होते. संचालन पोटदुखे, प्रास्ताविक मुख्याधिकारी जी.एस. पवार यांनी केले. आभार पाणीपुरवठा विभाग प्रमुख हिरासिंग राठोड यांनी मानले. जीवन प्राधिकरण, नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार नागरगोजे, प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)