शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत प्रोटोकॉलची वाट

By admin | Updated: July 24, 2015 02:05 IST

जिल्हा परिषद ही मिनीमंत्रालय म्हणून ओळखली जाते. या मंत्रालयातील पदाधिकाऱ्यांचा प्रशासनावर वचक अपेक्षित आहे.

वर्चस्वच नाही : पदाधिकारीच फिरतात फाईली घेऊन अधिकाऱ्यांमागे यवतमाळ : जिल्हा परिषद ही मिनीमंत्रालय म्हणून ओळखली जाते. या मंत्रालयातील पदाधिकाऱ्यांचा प्रशासनावर वचक अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात येथे पदाधिकारीच आपल्या कामांच्या फाईली घेऊन अधिकाऱ्यांच्या कक्षात येरझारा मारत असल्याचा धक्कादायक प्रकार आहे. जिल्हा परिषदेतील या प्रोटोकॉलच्या ऐसीतैसीची राजकीय गोटात चर्चा आहे. जिल्हा परिषदेमध्ये प्रमुख सहा पदाधिकारी आहेत. त्यातील तीन महिला आहेत. या पदाधिकाऱ्यांनी कोणत्याही कामासाठी सीईओ वगळता इतर कनिष्ठ अधिकाऱ्यांना आपल्या कक्षात बोलविणे क्रमप्राप्त आहे. मात्र प्रत्यक्षात जिल्हा परिषदेत अनेक ठिकाणी उलटी गंगा वाहत असल्याचे चित्र आहे. आपल्या सोईची कामे काढून घेण्यासाठी पदाधिकारी स्वत: फाईल घेऊन अधिकाऱ्यांच्या कक्षात वारंवार जात असल्याचे व त्यांच्या मागे फिरत असल्याचे सांगण्यात येते. काही प्रकरणात तर ‘नवरोजी’चाच हस्तक्षेप अधिक असल्याचे पहायला मिळते. वास्तविक सदस्यांची कामे पदाधिकाऱ्यांच्या कक्षात होणे अपेक्षित आहे. परंतु खुद्द पदाधिकारीच अधिकाऱ्यांच्या कक्षात फाईली घेऊन जात असल्याने त्यांच्या पक्षाच्या सदस्यांवरही अधिकाऱ्यांकडे क्षुल्लक कामांसाठी येरझारा मारण्याची वेळ येते. खुद्द पदाधिकाऱ्यांना प्रोटोकॉल समजत नसल्याने अधिकारीही त्यांना तेवढे गांभीर्याने घेत नाही. एखाद-दोन पदाधिकारी मात्र त्याला अपवाद आहे. मुळात जिल्हा परिषदेमध्ये पदाधिकाऱ्यांचा अधिकाऱ्यांवर अंकुश नाही. प्रशासकीय कामाचा अनुभव नसणे, तांत्रिक ज्ञान नसणे, अभ्यास नसणे, कायदे-नियम न समजणे आदी बाबी त्यासाठी कारणीभूत मानल्या जातात. (जिल्हा प्रतिनिधी) २८ जुलैला विशेष सर्वसाधारण सभा दुष्काळ व शेतकऱ्यांच्या अडचणींवर चर्चा करण्यासाठी २८ जुलै रोजी जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा बोलविण्यात आली आहे. या सभेचे श्रेय कुणाचे यावरुन काँग्रेस व राष्ट्रवादीत वाद सुरु आहे. काँग्रेसने नोटीस दिल्याची कुणकुण लागताच राष्ट्रवादीने वेगाने चक्रे फिरवून पत्रपरिषदेद्वारे हे श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काँग्रेसच्या गोटातून होऊ लागला आहे. जिल्हा परिषदेमध्ये अनेक पदाधिकाऱ्यांना पुरेसे ज्ञान नसल्याचा गैरफायदा अधिकाऱ्यांकडून उठविला जात आहे. बहुतांश फाईली पदाधिकाऱ्यांकडे न पाठविता परस्परच प्रशासनाच्या स्वाक्षरीसाठी जात आहेत. शासकीय अनुदानावरील विविध साहित्य अधिकाऱ्यांनी परस्परच पंचायत समिती स्तरावर रवाना केले. त्याचे लाभार्थ्यांना वाटपही सुरू झाले. मात्र त्याबाबत पदाधिकाऱ्यांना अंधारात ठेवले गेले. यावरून नेमकी कुणाची पकड किती हे दिसते?.जिल्हा परिषदेतील काही पदाधिकारी आपल्या पक्षाच्या नेत्यांना ‘सरेन्डर’ झाले की काय अशी शंका त्यांच्या कामकाजाच्या पद्धतींवरून यायला लागली आहे. त्यांचा विभाग नेतेच बांधून चालवित असल्याचे चित्र अनेकदा पहायला मिळते. जिल्हा परिषदेत चांगले शिक्षण, उत्तम आरोग्य व उजळ प्रतिमा असलेले हुशार पदाधिकारीही आहेत. मात्र त्यांच्यात आक्रमकता नाही. त्यांच्या शांत स्वभावाचा अधिकाऱ्यांकडून गैरफायदा घेतला जात आहे. त्यांची दिशाभूल केली जाते. सध्या जिल्ह्यात कलेक्टरचा बोलबाला आहे. जवळपास त्यांच्या एवढेच अधिकार जिल्हा परिषदेत सीईओंना आहे. मात्र तेथे प्रशासनाचा रिझल्ट दिसत नसल्याचा राजकीय सूर ऐकायला मिळत आहे. सीईओंनी चाबूक हातात घेतल्यास जिल्हा परिषदेच्या यंत्रणेला वठणीवर आणायला वेळ लागणार नाही, असा विश्वास प्रामाणिक कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. मात्र सध्या त्यांच्या अधिनस्त यंत्रणेतील अनेक जण मुजोर, कामचुकार व बेजाबदार झाल्याचे दिसते. कर्मचारी संघटना पदाधिकारी व प्रशासनावर हावी झाल्याचे विदारक चित्र पहायला मिळते. जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असली तरी त्यांच्यात श्रेय लाटण्यावरून धुसफूस ऐकायला मिळते. राष्ट्रवादीच्या सदस्यांचा रिमोट नेत्यांकडे असला तरी काँग्रेस सदस्यांबाबत ही स्थिती नाही. काँग्रेसच्या नेत्यांचे झेडपीवर लक्षच नसल्याचे गोंधळलेल्या कारभारावरून दिसते.