शहरं
Join us  
Trending Stories
1
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
2
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
3
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
4
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
5
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

दलित वस्तीसाठी तीन नवीन टाक्या प्रस्तावित

By admin | Updated: May 30, 2016 00:04 IST

शहरातील जुन्या वस्तीला पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे राजारामनगर, पाटीपुरा, गौतमनगर परिसरातील नागरिकांना बारमाही पाणी टंचाई सोसावी लागते.

 ७० लाखांचा निधी : राजारामनगर, गौतमनगर, पाटीपुराचा प्रश्न सुटणारयवतमाळ : शहरातील जुन्या वस्तीला पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे राजारामनगर, पाटीपुरा, गौतमनगर परिसरातील नागरिकांना बारमाही पाणी टंचाई सोसावी लागते. या भागाला योग्य दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी दलित वस्तीच्या निधीतून तीन टाक्या बांधण्याच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली आहे. त्यावर ७० लाख ८५ हजार रुपये खर्च केले जाणार आहे. राजारामनगर, अंबिकानगर या परिसरासाठी कपिल वस्तूनगरातील खुल्या जागेत २३ लाख रुपये खर्चून टाकी बांधण्यात येणार आहे. याचप्रमाणे गौतमनगर, तलावफैल भागासाठी वंजारी फैलामध्ये खुल्या जागेत २३ लाखांची पाण्याची टाकी बांधली जाणार आहे. पाटीपुरा, सेवानगर परिसरासाठी नागपूर मार्गावर असलेल्या जीवन प्राधिकरणाच्या जागेत पाण्याची टाकी बांधण्यात येणार आहे. त्यासाठी २६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मागास वस्त्यांमधील पाणी समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी माजी बांधकाम सभापती प्रणिता खडसे आणि भाजपाचे शहराध्यक्ष विजय खडसे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर या प्रस्तावाला नगरपरिषदेच्या ८ आॅगस्ट २०१४ मध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूरी देण्यात आली. हा प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांसमोर ठेवण्यात आला. पाणीपुरवठा टाकीची आवश्यकता लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. पुढील कार्यवाहीसाठी हा विषय १८ मे रोजी नगरपरिषदेकडे सुपूर्द करण्यात आला आहे. आता तिन्ही टाक्याचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी प्रणिता खडसे यांच्याकडून पाठपुरावा केला जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)