शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्राला पाकिस्तानने या तीन टास्क दिलेल्या; भारताविरोधात असे विणले जात होते जाळे...
2
'ऑपरेशन सिंदूर'च्या टीमसाठी ममता बॅनर्जीची सहमती, टीएमसीचे अभिषेक बॅनर्जी परदेश दौऱ्यावर जाणार
3
ज्योती मल्होत्रा ​​बिहारच्या या हॉटेलमध्ये २ दिवस राहिली; पुढे कुठे गेली? आणखी धक्कादायक माहिती समोर आली
4
IPL 2025: Mumbai Indians ने 'करो वा मरो' सामन्याआधी ३ नव्या स्टार खेळाडूंना घेतलं संघात, पाहा कोण?
5
Jyoti Malhotra : आधी घेतली मुलीची बाजू, आता मात्र युटर्न! ज्योती मल्होत्राचे वडील म्हणतात, "मला माहीत नाही..." 
6
Navi Mumbai Murder: नवी मुंबईत महिलेचा राहत्या घरात मृतदेह आढळल्याने खळबळ
7
आता फ्रॉडचं नो टेन्शन! पेमेंट करण्यापूर्वी फॉलो करा 'ही' सरकारी ट्रिक; कोणीही घालणार नाही गंडा
8
एमबीए असल्याचं सांगून लावलं लग्न, पती निघाला आठवी पास, काँग्रेस नेत्याच्या कुटुंबावर सुनेचे गंभीर आरोप  
9
शेतकऱ्यांना सिबिलची अट न घालता कर्ज द्या, मुख्यमंत्री फडणवीस यांचा बँकांना सज्जड दम
10
पाक लष्करप्रमुख आसिम मुनीरसोबत राहुल गांधींचा फोटो; BJP नेत्याने केली मीर जाफरशी तुलना
11
“उन्होंने गोली चलाई, पर धमाका हमने किया”; ‘ऑपरेशन सिंदूर’मधील मेजरने सांगितली Inside Story
12
पाकिस्तानवर काय दिवस आले! स्वतःचा अर्थसंकल्पही तयार करता येणार नाही; IMF टीम पाठविणार...
13
बापरे! अवघ्या ७ महिन्यात २३ वर्षीय युवतीनं २५ युवकांचं आयुष्य केले बर्बाद, काय आहे प्रकार?
14
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
15
कोविडचे रुग्ण वाढताहेत, भारताला कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका? ICMR च्या माजी तज्ज्ञांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती 
16
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
17
सासू असावी तर अशी! लग्नानंतर सुनेने शिकण्याची इच्छा व्यक्त करताच हात धरून नेलं शाळेत
18
गुगल क्रोममध्ये आढळल्या गंभीर त्रुटी! तुमचा कॉम्प्युटर कधीही होऊ शकतो हॅक; सरकारकडून अलर्ट
19
मुंबईत कोरोनाचे ५३ रुग्ण, महापालिका सतर्क; आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णालये सज्ज 
20
भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये TRF विरुद्ध पुरावे दिले; पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतली होती

पुनर्वसनाचा प्रस्ताव मंत्रालयात धूळ खात

By admin | Updated: July 11, 2015 00:13 IST

भीमकुंडच्या पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रस्ताव दोन वर्षांपासून मंत्रालयात धूळखात पडून आहे.

‘विजस’ची माहिती : प्रधान सचिवाला राज्य मानवाधिकार आयोगाची नोटीस यवतमाळ : भीमकुंडच्या पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रस्ताव दोन वर्षांपासून मंत्रालयात धूळखात पडून आहे. या संदर्भात राज्य मानवाधिकार आयोगाने प्रधानसचिवाला नोटीस बजावल्याची माहिती विदर्भ जनआंदोलन समितीचे संयोजक किशोर तिवारी यांनी दिली आहे. दोन वर्षापूर्वी २०१३च्या आॅगस्ट महिन्यात आलेल्या पुरामुळे संपूर्ण भीमकुंडचे शेतकरी व शेतमजूर अभयारण्याच्या पायथ्याशी असलेल्या शासकीय जमिनीवर राहण्यासाठी गेल्यावर सरकारने सर्व कुटुंबांना पट्टे , वीज व पाणी देण्याचे आश्वासन २४ महिन्यांपूर्वी दिले होते. मात्र सतत पाठपुरावा करूनही सरकारने पुनर्वसन न केल्यामुळे भीमकुंड पुरग्रस्तांनी १२ मार्चला २०१४ रोजी विदर्भ जनांदोलन समितीचे किशोर तिवारी यांच्यामार्फत राज्य मानवाधिकार आयोगाकडे सरकारविरुद्ध दाद मागितली होती व या याचिकेची सुनावणी सोमवारी ७ जुलै रोजी राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती बुन्नरमठ यांचे समोर अमरावती येथे घेण्यात आली. यवतमाळचे जिल्हाधिकारी एस पी सिंग यांनी सरकारतर्फे शपथपत्र सादर करून जिल्हास्तरांवरील समस्या पाणी व वीज पुरवठा देण्याचे काम अंतिम टप्प्यात असून मागील दोन वर्षांपासून पूरग्रस्तांना महसूल जमिनीचे पट्टे देऊन त्यांचे सर्व सुविधांसह पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव मंत्रालयात पुनर्वसन खात्याचे प्रधान सचिव यांच्याकडे धूळखात पडला असल्याची माहिती दिली. त्यानंतर राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती बुन्नरमठ यांनी याची गंभीर दखल घेत प्रधान सचिव (पुनर्वसन) यांना नोटीस बजावून जातीने हजर राहून तत्काळ शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिले व पुढची सुनावणी मुंबई येथे ठेवण्यात आली आहे . यावेळी जिल्हाधिकारी एस पी सिंग यांच्या चमूने विषेश प्रयन्त करून पिण्याच्या पाण्याची व वीज पुरवठा देण्यासाठी वेगळा ट्रान्सफार्मर लावल्याबद्दल राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती बुन्नरमठ यांना माहिती दिली. राज्य मानवाधिकार आयोगाच्या समोर भीमकुंडवासी किरण कोलवते, गजानन मामीडवार, नारायण रेड्डीवार, विठ्ठल गावंडे, गणपतराव कन्नलवार, बालू प्रतापवार, बाळासाहेब कन्नलवार, रमेश पाटील, अतुल नगराळे, नाना नगराळे, नाना अगरुलवार, कृष्णा मारपवार, किष्टन्ना मॅकलवार, अशोक मॅकलवार, दत्ता गेडाम, कमलाबाई नैताम, किष्टाबाई गोपावार, गंगाबाई शलार्वार, वासुदेव नैताम, समितीचे सचिव मोहन जाधव, अंकीत नैताम, सुरेश बोलेनवार, नितीन कांबळे, नंदू जयस्वाल, संतोष नैताम, भीमराव नैताम आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)