शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसनाचा प्रस्ताव मंत्रालयात धूळ खात

By admin | Updated: July 11, 2015 00:13 IST

भीमकुंडच्या पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रस्ताव दोन वर्षांपासून मंत्रालयात धूळखात पडून आहे.

‘विजस’ची माहिती : प्रधान सचिवाला राज्य मानवाधिकार आयोगाची नोटीस यवतमाळ : भीमकुंडच्या पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रस्ताव दोन वर्षांपासून मंत्रालयात धूळखात पडून आहे. या संदर्भात राज्य मानवाधिकार आयोगाने प्रधानसचिवाला नोटीस बजावल्याची माहिती विदर्भ जनआंदोलन समितीचे संयोजक किशोर तिवारी यांनी दिली आहे. दोन वर्षापूर्वी २०१३च्या आॅगस्ट महिन्यात आलेल्या पुरामुळे संपूर्ण भीमकुंडचे शेतकरी व शेतमजूर अभयारण्याच्या पायथ्याशी असलेल्या शासकीय जमिनीवर राहण्यासाठी गेल्यावर सरकारने सर्व कुटुंबांना पट्टे , वीज व पाणी देण्याचे आश्वासन २४ महिन्यांपूर्वी दिले होते. मात्र सतत पाठपुरावा करूनही सरकारने पुनर्वसन न केल्यामुळे भीमकुंड पुरग्रस्तांनी १२ मार्चला २०१४ रोजी विदर्भ जनांदोलन समितीचे किशोर तिवारी यांच्यामार्फत राज्य मानवाधिकार आयोगाकडे सरकारविरुद्ध दाद मागितली होती व या याचिकेची सुनावणी सोमवारी ७ जुलै रोजी राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती बुन्नरमठ यांचे समोर अमरावती येथे घेण्यात आली. यवतमाळचे जिल्हाधिकारी एस पी सिंग यांनी सरकारतर्फे शपथपत्र सादर करून जिल्हास्तरांवरील समस्या पाणी व वीज पुरवठा देण्याचे काम अंतिम टप्प्यात असून मागील दोन वर्षांपासून पूरग्रस्तांना महसूल जमिनीचे पट्टे देऊन त्यांचे सर्व सुविधांसह पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव मंत्रालयात पुनर्वसन खात्याचे प्रधान सचिव यांच्याकडे धूळखात पडला असल्याची माहिती दिली. त्यानंतर राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती बुन्नरमठ यांनी याची गंभीर दखल घेत प्रधान सचिव (पुनर्वसन) यांना नोटीस बजावून जातीने हजर राहून तत्काळ शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिले व पुढची सुनावणी मुंबई येथे ठेवण्यात आली आहे . यावेळी जिल्हाधिकारी एस पी सिंग यांच्या चमूने विषेश प्रयन्त करून पिण्याच्या पाण्याची व वीज पुरवठा देण्यासाठी वेगळा ट्रान्सफार्मर लावल्याबद्दल राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती बुन्नरमठ यांना माहिती दिली. राज्य मानवाधिकार आयोगाच्या समोर भीमकुंडवासी किरण कोलवते, गजानन मामीडवार, नारायण रेड्डीवार, विठ्ठल गावंडे, गणपतराव कन्नलवार, बालू प्रतापवार, बाळासाहेब कन्नलवार, रमेश पाटील, अतुल नगराळे, नाना नगराळे, नाना अगरुलवार, कृष्णा मारपवार, किष्टन्ना मॅकलवार, अशोक मॅकलवार, दत्ता गेडाम, कमलाबाई नैताम, किष्टाबाई गोपावार, गंगाबाई शलार्वार, वासुदेव नैताम, समितीचे सचिव मोहन जाधव, अंकीत नैताम, सुरेश बोलेनवार, नितीन कांबळे, नंदू जयस्वाल, संतोष नैताम, भीमराव नैताम आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)