शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
2
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
3
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
4
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
5
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
6
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
7
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
8
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
9
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
10
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
11
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
12
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
13
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
14
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
15
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
16
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
17
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
18
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
19
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
20
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

कर्मचारी निवासस्थानांचा प्रस्ताव लालफितीत

By admin | Updated: March 30, 2015 02:07 IST

स्थानिक पंचायत समिती कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थानांचा जिल्हा परिषदेकडे पाठविलेला प्रस्ताव गेली अनेक वर्षांपासून धूळ खात आहे.

राळेगाव : स्थानिक पंचायत समिती कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थानांचा जिल्हा परिषदेकडे पाठविलेला प्रस्ताव गेली अनेक वर्षांपासून धूळ खात आहे. सध्या असलेल्या निवासस्थानांची डागडुजी करून भागविले जात आहे. मात्र निवासस्थान सुयोग्य नसल्याचे कारण पुढे करून कर्मचारीही यवतमाळवरून ये-जा करत आहेत. प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी हा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी करण्यात येत आहे. याठिकाणी जिल्हा परिषदेची मोठी जागा आहे. मात्र त्याचा कुठलाही उपयोग होत नाही. या जागेमध्ये कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने, जुन्या प्रशासकीय कार्यालयाकरिता सुरक्षा भिंत, गेट याकरिता मागील काही वर्षात अनेकदा पंचायत समितीने जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठविले आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. सुरक्षेअभावी जुन्या प्रशासकीय इमारतीतील अभिलेखे आणि साहित्याची सुरक्षितता धोक्यात राहात आली आहे. यावर जिल्हा परिषदेने वेळीच लक्ष घालणे आवश्यक आहे. येथे पंचायत समिती कर्मचाऱ्यांसाठी ५० वर्षांपूर्वी निवासस्थाने बांधण्यात आली होती. दरम्यानच्या काळात थातुरमातूर दुरुस्ती करून काम भागविण्यात आले. आता मात्र या पलीकडेही स्थिती निर्माण झाली आहे. पंचायत समिती पदाधिकारी कक्ष आणि इतर बाबींसाठी ५० लाख रुपये तसेच फर्निचरसाठी निधी दोन वर्षांपूर्वी मंजूर झाला. परंतु पंचायत समितीला अजूनतरी या सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या नाही. येथे पंचायत समितीची जवळपास अडीच ते तीन एकर मौल्यवान जागा आहे. या मोक्याच्या जागेचा व्यावसायिकदृष्ट्या उपयोग करण्याकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष राहिले आहे. पंचायत समितीची नवीन इमारत दोन वर्षांपूर्वीच बांधून पूर्ण झाली. नवी व जुनी इमारत, अनेक गोडावून, शिक्षण विभाग कार्यालय येथे आहे. याठिकाणी पश्चिम व उत्तर दिशेला गाळे काढले जावू शकतात. पंचायत समिती कर्मचाऱ्यांचे निवासस्थान असलेल्या पश्चिम व दक्षिणेस गाळे बांधले जावू शकतात. जिल्हा परिषदेने या बाबीकडे लक्ष दिल्यास कायम उत्पन्न वाढण्यासोबतच शहरवासीयांनाही व्यापाराकरिता चांगला उपयोग होवू शकतो. त्याचप्रमाणे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या पूर्व व उत्तर बाजूने शॉपिंग कॉम्पलेक्स काढली जावून जिल्हा परिषद व नागरिकांची सुविधा होवू शकते, असे मत नागरिकांमधून मांडले जात आहे. मात्र यासाठी प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांची इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. (तालुका प्रतिनिधी)