शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

वित्त विभागातील पदोन्नतीत अनियमितता

By admin | Updated: September 3, 2014 00:04 IST

जिल्हा परिषदेतील वित्त विभागात करण्यात आलेल्या पदोन्नत्या संशयाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. एकूण ११ कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली आहे. या प्रक्रियेत पात्रता असलेल्या कर्मचाऱ्यांना

यवतमाळ : जिल्हा परिषदेतील वित्त विभागात करण्यात आलेल्या पदोन्नत्या संशयाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. एकूण ११ कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली आहे. या प्रक्रियेत पात्रता असलेल्या कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक पदोन्नतीपासून वंचित ठेवल्याचा आरोप केला जात आहे. शिवाय पदोन्नती दिलेल्या सहा कर्मचाऱ्यांची पदावनती करण्यात आली. यामुळे काही कर्मचाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. वित्त विभागातून कनिष्ठ लेखा अधिकारी आणि वरिष्ठ सहायक यांच्या ज्येष्ठतेनुसार पदोन्नत्या करण्यात आल्या. यात पाणीपुरवठा विभाग, सिंचन विभाग, घाटंजी पंचायत समिती, नेर पंचायत समिती, आर्णी पंचायत समिती, दिग्रस पंचायत समिती, मारेगाव पंचायत समिती, महिला बाल कल्याण विभाग, वित्त विभागातील दोन, शिक्षण विभाग, पंचायत समिती कळंब अशा ११ कर्मचाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली. नियमाप्रमाणे ४५ वर्षे झालेल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देणे आवश्यक आहे. निर्मल भारत अभियान आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा येथील दोन कर्मचाऱ्यांना या प्रक्रियेतून किरकोळ तांत्रिक त्रुट्या दाखवून हेतुपुरस्सररीत्या डावलण्यात आले आहे. पदोन्नती प्रक्रिया करताना मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली. सहायक लेखाधिकारी या पदावर पदोन्नती करत असताना विभागांतर्गत घेतली जाणारी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक होते. मात्र ही बाब दुर्लक्षित करून काही कर्मचाऱ्यांनी पदोन्नती देण्यात आली होती. यामुळे ज्यांची ४५ वर्षे सेवा पूर्ण झाली, अशा कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला. त्यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर पदोन्नती केलेल्या कर्मचाऱ्यांची पुन्हा कनिष्ठ लेखाधिकारी म्हणून पदावनती कररण्यात आली. मात्र काहीच दिवसात पुन्हा पदोन्नती आदेश देवून पदावनती केलेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यात आला. याबाबत पाणीपुरवठा विभागातील एका महिला कर्मचाऱ्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. एकंदरच ही पदोन्नती प्रक्रिया संशयास्पद आहे. मात्र वित्त विभागाशी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे सलोख्याचे संबंध असल्याने तेथील सर्व चुका मान्य केल्या जातात, अशीही चर्चा जिल्हा परिषद वर्तूळात सुरू आहे. पदोन्नतीसाठी वरिष्ठ पातळीवर घोडेबाजारही झाला आहे. त्यामुळेच ज्यांना खऱ्या अर्थाने पदोन्नती देणे गरजेचे होते त्या कर्मचाऱ्यांचा हक्क डावलण्यात आला आहे. आता हे कर्मचारी विभागीय आयुक्तांकडे तक्रार घेवून जाण्याच्या मानसिकतेत आहे. जिल्हा परिषदेत त्यांच्या तक्रारींना कोणीच दाद देत नसल्याने ही वेळ त्यांच्यावर आली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)