शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

वित्त विभागातील पदोन्नतीत अनियमितता

By admin | Updated: September 3, 2014 00:04 IST

जिल्हा परिषदेतील वित्त विभागात करण्यात आलेल्या पदोन्नत्या संशयाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. एकूण ११ कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली आहे. या प्रक्रियेत पात्रता असलेल्या कर्मचाऱ्यांना

यवतमाळ : जिल्हा परिषदेतील वित्त विभागात करण्यात आलेल्या पदोन्नत्या संशयाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. एकूण ११ कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली आहे. या प्रक्रियेत पात्रता असलेल्या कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक पदोन्नतीपासून वंचित ठेवल्याचा आरोप केला जात आहे. शिवाय पदोन्नती दिलेल्या सहा कर्मचाऱ्यांची पदावनती करण्यात आली. यामुळे काही कर्मचाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. वित्त विभागातून कनिष्ठ लेखा अधिकारी आणि वरिष्ठ सहायक यांच्या ज्येष्ठतेनुसार पदोन्नत्या करण्यात आल्या. यात पाणीपुरवठा विभाग, सिंचन विभाग, घाटंजी पंचायत समिती, नेर पंचायत समिती, आर्णी पंचायत समिती, दिग्रस पंचायत समिती, मारेगाव पंचायत समिती, महिला बाल कल्याण विभाग, वित्त विभागातील दोन, शिक्षण विभाग, पंचायत समिती कळंब अशा ११ कर्मचाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली. नियमाप्रमाणे ४५ वर्षे झालेल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देणे आवश्यक आहे. निर्मल भारत अभियान आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा येथील दोन कर्मचाऱ्यांना या प्रक्रियेतून किरकोळ तांत्रिक त्रुट्या दाखवून हेतुपुरस्सररीत्या डावलण्यात आले आहे. पदोन्नती प्रक्रिया करताना मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली. सहायक लेखाधिकारी या पदावर पदोन्नती करत असताना विभागांतर्गत घेतली जाणारी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक होते. मात्र ही बाब दुर्लक्षित करून काही कर्मचाऱ्यांनी पदोन्नती देण्यात आली होती. यामुळे ज्यांची ४५ वर्षे सेवा पूर्ण झाली, अशा कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला. त्यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर पदोन्नती केलेल्या कर्मचाऱ्यांची पुन्हा कनिष्ठ लेखाधिकारी म्हणून पदावनती कररण्यात आली. मात्र काहीच दिवसात पुन्हा पदोन्नती आदेश देवून पदावनती केलेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यात आला. याबाबत पाणीपुरवठा विभागातील एका महिला कर्मचाऱ्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. एकंदरच ही पदोन्नती प्रक्रिया संशयास्पद आहे. मात्र वित्त विभागाशी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे सलोख्याचे संबंध असल्याने तेथील सर्व चुका मान्य केल्या जातात, अशीही चर्चा जिल्हा परिषद वर्तूळात सुरू आहे. पदोन्नतीसाठी वरिष्ठ पातळीवर घोडेबाजारही झाला आहे. त्यामुळेच ज्यांना खऱ्या अर्थाने पदोन्नती देणे गरजेचे होते त्या कर्मचाऱ्यांचा हक्क डावलण्यात आला आहे. आता हे कर्मचारी विभागीय आयुक्तांकडे तक्रार घेवून जाण्याच्या मानसिकतेत आहे. जिल्हा परिषदेत त्यांच्या तक्रारींना कोणीच दाद देत नसल्याने ही वेळ त्यांच्यावर आली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)