शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

प्रचाराला मिळणार अवघे १२ दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 21:44 IST

येत्या ११ एप्रिल रोजी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघाची निवडणूक होऊ घातली आहे. या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवार व कार्यकर्त्यांना प्रचारासाठी अवघे १२ दिवस मिळणार आहे.

ठळक मुद्देलोकसभा निवडणूक : उमेदवारांसह कार्यकर्त्यांची दमछाक

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येत्या ११ एप्रिल रोजी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघाची निवडणूक होऊ घातली आहे. या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवार व कार्यकर्त्यांना प्रचारासाठी अवघे १२ दिवस मिळणार आहे.यवतमाळ-वाशिम मतदार संघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात ११ एप्रिल रोजी होणार आहे. नामांकन दाखल करण्यासाठी आता केवळ सोमवारचा दिवस उरला आहे. त्यानंतर २६ मार्चला छाननी झाल्यानंतर २८ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. परिणामी २९ मार्चपासून खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरूवात होणार आहे. २९ मार्च ते ९ एप्रिलपर्यंत प्रचार चालणार आहे. या दरम्यान अवघे १२ दिवस प्रचारासाठी मिळणार आहे. या १२ दिवसात उमेदवार आणि कार्यकर्त्यांना मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड धावपळ करावी लागणार आहे.यवतमाळ-वाशिम या मतदार संघाचा विस्तार मोठा आहे. एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जवळपास २५० किलोमीटरचे अंतर आहे. एवढे अंतर पार करून मतदारापर्यंत पोहोचणे अवघड आहे. त्यामुळे अवघ्या १२ दिवसांत उमेदवार व कार्यकर्त्यांना दिवस-रात्र राबून मतदारांपर्यंत पोहोचावे लागणार आहे. या अवघड परीक्षेत नेमका कोणता पक्ष आणि उमेदवार उत्तीर्ण होतो, यावरच निवडणुकीचा निकाल अवलंबून राहणार आहे.प्रचारासाठी अवघे १२ दिवस मिळाल्यानंतर निकालासाठी मात्र तब्बल दीड महिना प्रतीक्षा करावी लागणार आहे. संपूर्ण देशातील मतदान आटोपल्यानंतरच २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. ११ एप्रिलपासून २३ मे पर्यंत उमेदवार आणि कार्यकर्ते ‘आॅक्सीजन’वर राहणार आहे. एकीकडे प्रचाराला कमी अवधी मिळत असताना निकालाला मात्र प्रचंड वेळ लागणार आहे. निकालापर्यंतच्या दीड महिन्यात उमेदवार आणि कार्यकर्ते केवळ आकडेमोड करण्यात व्यस्त राहणार आहे.कार्यकर्त्यांची कसोटीप्रचारासाठी अवघे १२ दिवस मिळणार असल्याने कार्यकर्त्यांची कसोटी लागणार आहे. मतदार संघाच्या टोकापर्यंत पोहोचणे उमेदवारांना अवघड होणार आहे. त्यामुळे त्यांची सर्व भिस्त निष्ठावंत कार्यकर्त्यांवरच अवलंबून राहणार आहे. हे कार्यकर्ते किती निष्ठेने पक्ष आणि उमेदवाराचा प्रचार करतील, याबाबत साशंकता आहे. उमेदवारांना कार्यकर्त्यांच्या भरवशावरच ही निवडणूक लढवावी लागणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची कसोटी लागणार आहे. सोबतच त्यांची ‘किंमत’ही वाढण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Electionनिवडणूक