शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

प्रचाराला मिळणार अवघे १२ दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 21:44 IST

येत्या ११ एप्रिल रोजी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघाची निवडणूक होऊ घातली आहे. या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवार व कार्यकर्त्यांना प्रचारासाठी अवघे १२ दिवस मिळणार आहे.

ठळक मुद्देलोकसभा निवडणूक : उमेदवारांसह कार्यकर्त्यांची दमछाक

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येत्या ११ एप्रिल रोजी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघाची निवडणूक होऊ घातली आहे. या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवार व कार्यकर्त्यांना प्रचारासाठी अवघे १२ दिवस मिळणार आहे.यवतमाळ-वाशिम मतदार संघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात ११ एप्रिल रोजी होणार आहे. नामांकन दाखल करण्यासाठी आता केवळ सोमवारचा दिवस उरला आहे. त्यानंतर २६ मार्चला छाननी झाल्यानंतर २८ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. परिणामी २९ मार्चपासून खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरूवात होणार आहे. २९ मार्च ते ९ एप्रिलपर्यंत प्रचार चालणार आहे. या दरम्यान अवघे १२ दिवस प्रचारासाठी मिळणार आहे. या १२ दिवसात उमेदवार आणि कार्यकर्त्यांना मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड धावपळ करावी लागणार आहे.यवतमाळ-वाशिम या मतदार संघाचा विस्तार मोठा आहे. एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जवळपास २५० किलोमीटरचे अंतर आहे. एवढे अंतर पार करून मतदारापर्यंत पोहोचणे अवघड आहे. त्यामुळे अवघ्या १२ दिवसांत उमेदवार व कार्यकर्त्यांना दिवस-रात्र राबून मतदारांपर्यंत पोहोचावे लागणार आहे. या अवघड परीक्षेत नेमका कोणता पक्ष आणि उमेदवार उत्तीर्ण होतो, यावरच निवडणुकीचा निकाल अवलंबून राहणार आहे.प्रचारासाठी अवघे १२ दिवस मिळाल्यानंतर निकालासाठी मात्र तब्बल दीड महिना प्रतीक्षा करावी लागणार आहे. संपूर्ण देशातील मतदान आटोपल्यानंतरच २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. ११ एप्रिलपासून २३ मे पर्यंत उमेदवार आणि कार्यकर्ते ‘आॅक्सीजन’वर राहणार आहे. एकीकडे प्रचाराला कमी अवधी मिळत असताना निकालाला मात्र प्रचंड वेळ लागणार आहे. निकालापर्यंतच्या दीड महिन्यात उमेदवार आणि कार्यकर्ते केवळ आकडेमोड करण्यात व्यस्त राहणार आहे.कार्यकर्त्यांची कसोटीप्रचारासाठी अवघे १२ दिवस मिळणार असल्याने कार्यकर्त्यांची कसोटी लागणार आहे. मतदार संघाच्या टोकापर्यंत पोहोचणे उमेदवारांना अवघड होणार आहे. त्यामुळे त्यांची सर्व भिस्त निष्ठावंत कार्यकर्त्यांवरच अवलंबून राहणार आहे. हे कार्यकर्ते किती निष्ठेने पक्ष आणि उमेदवाराचा प्रचार करतील, याबाबत साशंकता आहे. उमेदवारांना कार्यकर्त्यांच्या भरवशावरच ही निवडणूक लढवावी लागणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची कसोटी लागणार आहे. सोबतच त्यांची ‘किंमत’ही वाढण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Electionनिवडणूक