शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
4
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
5
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
6
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
7
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
8
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
9
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
10
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
11
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
12
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
13
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
14
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
15
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
16
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
17
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
18
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
19
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
20
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?

प्रचारात वीज प्रश्न गूल

By admin | Updated: October 4, 2014 23:32 IST

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रत्येक जण विकासाचे स्वप्न दाखवित असताना शेतकरी आणि सर्वसामान्यांचा जिव्हाळ्याचा विषय असलेला वीज प्रश्न मात्र गूल झाल्याचे दिसत आहे.

भारनियमनाचा अतिरेक : ग्रामीणला केवळ दोन-तीन तास वीज यवतमाळ : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रत्येक जण विकासाचे स्वप्न दाखवित असताना शेतकरी आणि सर्वसामान्यांचा जिव्हाळ्याचा विषय असलेला वीज प्रश्न मात्र गूल झाल्याचे दिसत आहे. तळपत्या उन्हात गावागावात भारनियमनाचे चटके बसत असताना राजकीय पुढारी मात्र वातानुकूलित वाहनात प्रचारात मग्न आहे. वाळणारी पिके पाहून संतप्त शेतकरी वीज वितरणवर रोष व्यक्त करीत असले तरी त्यांचा आवाज मात्र कुणाच्याही कानावर जात नाही. विधानसभा निवडणुकीचा प्रचाराने आता वेग घेतला आहे. गावागावात नेते मंडळी विकासाचे स्वप्न विकत आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत सर्वसामान्यांचा मीच वाली असा डांंगोरा पिटत आहे. मात्र ग्रामीण भागातील परिस्थिती अत्यंत विपरित आहे. महिनाभरापासून पावसाने दांडी मारल्याने पीक अखेरच्या घटका मोजत आहे. सोयाबीन वाळला असून शेतकरी त्यात जनावरे सोडत आहे. तर कपाशीही त्याच वाटेवर आहे. अशा स्थितीत शेतकरी मात्र आशा धरुन पिकांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र गेल्या १५ दिवसात अचानक वाढलेल्या भारनियमनाने ओलित करणेही शक्य नाही. ग्रामीण भागात दोन ते तीन तासच आणि तेही रात्रीच वीज पुरवठा होत आहे. अशा स्थितीत कमी दाबाच्या विजेमुळे मोटारपंप जळत आहे. त्यावर पर्याय म्हणून डिझेल पंप खरेदी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र त्याच्याही किंमती दोन-तीन दिवसातच अचानक वाढल्या आहे. शासकीय योजनातील डिझेल पंपाची मागणी करण्यासाठी शेतकरी कृषी विभागात जातात तेथे त्यांची बोळवण केली जात आहे. डोळ्याने वाळणारे पीक पाहून शेतकरी संतप्त होत आहे. वीज वितरणविरुद्ध प्रचंड उद्रेक निर्माण झाला आहे. गावागावातील वीज वितरण केंद्रावर शेतकरी धडकत आहे. त्यांच्या संयमाचा बांध फुटत आहे. फुलसावंगी येथील वीज वितरण केंद्राची तर शेतकऱ्यांनी दसऱ्याच्या दिवशी तोडफोड केली. शेतकऱ्यांचा संताप समजून घ्यायला कुणी तयार नाही. उलट त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल होत आहे. बाभूळगाव तालुक्यातील गव्हळा येथे केवळ तीन तास होणाऱ्या वीज पुरवठ्याने संतप्त झाले. त्यांनी सावर येथील वीज उपकेंद्रावर धडक दिली. साहित्याची फेकाफेक केली. मात्र त्यांचा प्रश्न समजून न घेता १० ते १५ लोकांवर गुन्हे दाखल केले. असेच प्रकार जिल्ह्यात सुरू आहे. मात्र प्रचाराच्या रणधुमाळीत कोणताही उमेदवार आणि पुढारी विजेचा प्रश्न घेऊन जाब विचारताना दिसत नाही. केवळ शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचा आव आणत आहे. (नगर प्रतिनिधी)