शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
3
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
4
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
5
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
6
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
7
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
8
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
9
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
10
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
11
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
12
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
13
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
14
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
15
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
16
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
17
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
18
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
19
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
20
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!

प्रचारात वीज प्रश्न गूल

By admin | Updated: October 4, 2014 23:32 IST

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रत्येक जण विकासाचे स्वप्न दाखवित असताना शेतकरी आणि सर्वसामान्यांचा जिव्हाळ्याचा विषय असलेला वीज प्रश्न मात्र गूल झाल्याचे दिसत आहे.

भारनियमनाचा अतिरेक : ग्रामीणला केवळ दोन-तीन तास वीज यवतमाळ : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रत्येक जण विकासाचे स्वप्न दाखवित असताना शेतकरी आणि सर्वसामान्यांचा जिव्हाळ्याचा विषय असलेला वीज प्रश्न मात्र गूल झाल्याचे दिसत आहे. तळपत्या उन्हात गावागावात भारनियमनाचे चटके बसत असताना राजकीय पुढारी मात्र वातानुकूलित वाहनात प्रचारात मग्न आहे. वाळणारी पिके पाहून संतप्त शेतकरी वीज वितरणवर रोष व्यक्त करीत असले तरी त्यांचा आवाज मात्र कुणाच्याही कानावर जात नाही. विधानसभा निवडणुकीचा प्रचाराने आता वेग घेतला आहे. गावागावात नेते मंडळी विकासाचे स्वप्न विकत आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत सर्वसामान्यांचा मीच वाली असा डांंगोरा पिटत आहे. मात्र ग्रामीण भागातील परिस्थिती अत्यंत विपरित आहे. महिनाभरापासून पावसाने दांडी मारल्याने पीक अखेरच्या घटका मोजत आहे. सोयाबीन वाळला असून शेतकरी त्यात जनावरे सोडत आहे. तर कपाशीही त्याच वाटेवर आहे. अशा स्थितीत शेतकरी मात्र आशा धरुन पिकांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र गेल्या १५ दिवसात अचानक वाढलेल्या भारनियमनाने ओलित करणेही शक्य नाही. ग्रामीण भागात दोन ते तीन तासच आणि तेही रात्रीच वीज पुरवठा होत आहे. अशा स्थितीत कमी दाबाच्या विजेमुळे मोटारपंप जळत आहे. त्यावर पर्याय म्हणून डिझेल पंप खरेदी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र त्याच्याही किंमती दोन-तीन दिवसातच अचानक वाढल्या आहे. शासकीय योजनातील डिझेल पंपाची मागणी करण्यासाठी शेतकरी कृषी विभागात जातात तेथे त्यांची बोळवण केली जात आहे. डोळ्याने वाळणारे पीक पाहून शेतकरी संतप्त होत आहे. वीज वितरणविरुद्ध प्रचंड उद्रेक निर्माण झाला आहे. गावागावातील वीज वितरण केंद्रावर शेतकरी धडकत आहे. त्यांच्या संयमाचा बांध फुटत आहे. फुलसावंगी येथील वीज वितरण केंद्राची तर शेतकऱ्यांनी दसऱ्याच्या दिवशी तोडफोड केली. शेतकऱ्यांचा संताप समजून घ्यायला कुणी तयार नाही. उलट त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल होत आहे. बाभूळगाव तालुक्यातील गव्हळा येथे केवळ तीन तास होणाऱ्या वीज पुरवठ्याने संतप्त झाले. त्यांनी सावर येथील वीज उपकेंद्रावर धडक दिली. साहित्याची फेकाफेक केली. मात्र त्यांचा प्रश्न समजून न घेता १० ते १५ लोकांवर गुन्हे दाखल केले. असेच प्रकार जिल्ह्यात सुरू आहे. मात्र प्रचाराच्या रणधुमाळीत कोणताही उमेदवार आणि पुढारी विजेचा प्रश्न घेऊन जाब विचारताना दिसत नाही. केवळ शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचा आव आणत आहे. (नगर प्रतिनिधी)