शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
3
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उडी मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
4
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
5
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
6
Live in Partner Murder: प्रेयसी रितिकाची गळा दाबून हत्या, दोन दिवस सचिन मृतदेहाजवळ झोपला; मित्रासोबत दारू प्यायला अन्...
7
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
8
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
9
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...
10
केंद्र सरकार ५ वर्षांत झाले मालामाल; कमावले दुप्पट, मिळाले २२ लाख कोटी 
11
Mumbai: भांडूप प्रकरणात धक्कादायक माहिती उघड, 'त्या' मुलीने आत्महत्या केली नाही तर...
12
डोळ्यात मिरची पावडर टाकली मग गळा दाबून केला खून; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केला मोठा कांड
13
Stock Market Today: ७९ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; रियल्टी आणि ऑटो सेक्टरमध्ये तेजी, कारण काय?
14
रेल्वे तिकीट बुकिंग, पॅन, ITR सह अनेक नियमांमध्ये बदल; एटीएमच्या वापरावरही शुल्क, जाणून घ्या काय काय बदललं
15
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
16
तू काय माझ्याकडे डोळे वटारून बघतो?; राज ठाकरेंनी विचारलं, स्टेजवर बोलावलं, सगळेच हसले!
17
LPG Cylinder Price Cut: स्वस्त झाला LPG सिलिंडर... आजपासून कमी झाली किंमत; दिल्ली ते मुंबईपर्यंतचे हे आहेत नवे दर
18
काँग्रेसचे १५० नेते रशियाचे एजेंट, परदेशातून मिळायची फंडिंग; भाजपा खासदाराचा खळबळजनक दावा
19
'रामायण'च्या पहिल्या भागाचं शूटिंग पूर्ण, रणबीरची ऑनस्क्रीन लक्ष्मणासोबत गळाभेट; Video व्हायरल
20
Vijay Pendse Dies: इस्रोतील माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ विजय पेंडसे यांचे निधन

प्रकल्पग्रस्त शेतकरी देशोधडीला

By admin | Updated: December 13, 2014 02:27 IST

महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री देणाऱ्या पुसद तालुक्याला सुजलाम् सुफलाम् करण्याच्या उदात्त हेतूने तालुक्यात दोन मोठे धरण बांधण्यात आले.

अखिलेश अग्रवाल पुसद महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री देणाऱ्या पुसद तालुक्याला सुजलाम् सुफलाम् करण्याच्या उदात्त हेतूने तालुक्यात दोन मोठे धरण बांधण्यात आले. परंतु उपसा जलसिंचन योजना तसेच वीज व दळणवळणाच्या व्यवस्थेअभावी ३५ वर्षांपासून माळपठारावरील शेतकरी देशोधडीला लागले आहे. मोप, होरकड व शिवणी या गावातील बहुसंख्य कुटुंबांनी उदरनिर्वाहासाठी स्थलांतरण केल्याने ही गावे ओस पडली आहेत. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने धृतराष्ट्राची भूमिका घेतल्याने काँग्रेस नेते अ‍ॅड. सचिन नाईक यांनी या गावातील शेतकऱ्यांच्या समस्या शासन दरबारी मांडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पुसद तालुक्याच्या विकासासाठी इसापूर व पूस ही धरणे बांधण्यात आली. इसापूर धरणात जी गावे गेली त्या गावातील शेतकऱ्यांकडे जी जमीन होती त्यापैकी आता २० टक्के जमीन त्यांच्याकडे उरली आहे. धरणग्रस्तांचे पुनर्वसन झाले. परंतु त्या गावांमध्ये आजही कोणत्याही सुविधा नाही. इसापूर धरण पुसद तालुक्यात असताना आज हे धरण मराठवाड्यासाठी जीवनदायिनी बनले आहे. परंतु ज्यांची या धरणासाठी शेती व घरे गेली त्यांच्याकडे कुणाचेही लक्ष नाही. पुसद तालुक्यातील मोप, होरकड व शिवणी या गावात ३५ वर्षांपूर्वी अनेक सदन शेतकऱ्यांकडे १०० ते १५० एकर शेती होती. परंतु आज हे शेतकरी देशोधडीला लागले आहे. नावाला त्यांचे पुनर्वसन झाले. पाच ते दहा एकर कोरडवाहू जमिनीवर त्यांची कशी तरी गुजरान सुरू आहे. जमिनी धरणात गेल्याने त्यांना पोरके व्हावे लागले. या गावांमध्ये धनगर व हटकर समाजाची लोकसंख्या अधिक आहे. या गावांना अ‍ॅड.नाईक यांनी भेट दिली असता मोप येथील तुकाराम सवळे, दौलतराव मस्के, अशोक सवळे, दत्तराव मस्के, चंपतराव खरात, सीर्पतराव सवळे, शिवणी येथील सरपंच कुबेर मस्के, हनवंतराव मस्के, प्रकाश धुमनर, होरकड येथील पंजाबराव मस्के या वैभवशाली जीवन पाहणाऱ्या नागरिकांची आज दुरावस्था झाल्याचे दिसून आले. पुनर्वसन झाले, अनेक योजना आल्या आणि गेल्या. परंतु बारमाही रस्तेसुद्धा होवू शकले नाही. धरणग्रस्तांना नोकरी देण्याचे आश्वासनही हवेतच विरले. पंचायत समिती सभापतींपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेकांनी या पुनर्वसन वसाहतींना भेटी दिल्या. परंतु विकास मात्र झाला नाही. धरणग्रस्तांनी स्वप्रयत्नाने सिंचन करण्याचा अयशस्वी प्रयत्न सुरू ठेवला आहे. येथे मोठी समस्या म्हणजे विजेचा प्रश्न आहे. रस्ते निर्मितीच्या अनेक योजना असल्या तरीसुद्धा कोणत्याही योजनेशी ही मंडळी संलग्नीत नाही. प्रशासकीय यंत्रणा गावकऱ्यांना उपेक्षित ठेवले. या गावातील बहुसंख्य नागरिक आता पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक अशा औद्योगिक शहरांकडे कामासाठी निघून जात आहे. या भागातील पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतलेले तरुण आता शहरांकडे धाव घेत आहेत. माळपठार भागात धरण ऊराशी असताना शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळत नाही. २४ तास वीज नाही की दळणवळणाच्या सोयी नाही. सधन शेतकरी आता निर्धन झाले आहे. तेव्हा शेतकऱ्यांना संघटित करून उपसा सिंचन योजनेचा लाभ त्यांना मिळवून देण्यासाठी शासन दरबारी लढा देणार असल्याचे सचिन नाईक यांनी सांगितले.