शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्त शेतकरी देशोधडीला

By admin | Updated: December 13, 2014 02:27 IST

महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री देणाऱ्या पुसद तालुक्याला सुजलाम् सुफलाम् करण्याच्या उदात्त हेतूने तालुक्यात दोन मोठे धरण बांधण्यात आले.

अखिलेश अग्रवाल पुसद महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री देणाऱ्या पुसद तालुक्याला सुजलाम् सुफलाम् करण्याच्या उदात्त हेतूने तालुक्यात दोन मोठे धरण बांधण्यात आले. परंतु उपसा जलसिंचन योजना तसेच वीज व दळणवळणाच्या व्यवस्थेअभावी ३५ वर्षांपासून माळपठारावरील शेतकरी देशोधडीला लागले आहे. मोप, होरकड व शिवणी या गावातील बहुसंख्य कुटुंबांनी उदरनिर्वाहासाठी स्थलांतरण केल्याने ही गावे ओस पडली आहेत. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने धृतराष्ट्राची भूमिका घेतल्याने काँग्रेस नेते अ‍ॅड. सचिन नाईक यांनी या गावातील शेतकऱ्यांच्या समस्या शासन दरबारी मांडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पुसद तालुक्याच्या विकासासाठी इसापूर व पूस ही धरणे बांधण्यात आली. इसापूर धरणात जी गावे गेली त्या गावातील शेतकऱ्यांकडे जी जमीन होती त्यापैकी आता २० टक्के जमीन त्यांच्याकडे उरली आहे. धरणग्रस्तांचे पुनर्वसन झाले. परंतु त्या गावांमध्ये आजही कोणत्याही सुविधा नाही. इसापूर धरण पुसद तालुक्यात असताना आज हे धरण मराठवाड्यासाठी जीवनदायिनी बनले आहे. परंतु ज्यांची या धरणासाठी शेती व घरे गेली त्यांच्याकडे कुणाचेही लक्ष नाही. पुसद तालुक्यातील मोप, होरकड व शिवणी या गावात ३५ वर्षांपूर्वी अनेक सदन शेतकऱ्यांकडे १०० ते १५० एकर शेती होती. परंतु आज हे शेतकरी देशोधडीला लागले आहे. नावाला त्यांचे पुनर्वसन झाले. पाच ते दहा एकर कोरडवाहू जमिनीवर त्यांची कशी तरी गुजरान सुरू आहे. जमिनी धरणात गेल्याने त्यांना पोरके व्हावे लागले. या गावांमध्ये धनगर व हटकर समाजाची लोकसंख्या अधिक आहे. या गावांना अ‍ॅड.नाईक यांनी भेट दिली असता मोप येथील तुकाराम सवळे, दौलतराव मस्के, अशोक सवळे, दत्तराव मस्के, चंपतराव खरात, सीर्पतराव सवळे, शिवणी येथील सरपंच कुबेर मस्के, हनवंतराव मस्के, प्रकाश धुमनर, होरकड येथील पंजाबराव मस्के या वैभवशाली जीवन पाहणाऱ्या नागरिकांची आज दुरावस्था झाल्याचे दिसून आले. पुनर्वसन झाले, अनेक योजना आल्या आणि गेल्या. परंतु बारमाही रस्तेसुद्धा होवू शकले नाही. धरणग्रस्तांना नोकरी देण्याचे आश्वासनही हवेतच विरले. पंचायत समिती सभापतींपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेकांनी या पुनर्वसन वसाहतींना भेटी दिल्या. परंतु विकास मात्र झाला नाही. धरणग्रस्तांनी स्वप्रयत्नाने सिंचन करण्याचा अयशस्वी प्रयत्न सुरू ठेवला आहे. येथे मोठी समस्या म्हणजे विजेचा प्रश्न आहे. रस्ते निर्मितीच्या अनेक योजना असल्या तरीसुद्धा कोणत्याही योजनेशी ही मंडळी संलग्नीत नाही. प्रशासकीय यंत्रणा गावकऱ्यांना उपेक्षित ठेवले. या गावातील बहुसंख्य नागरिक आता पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक अशा औद्योगिक शहरांकडे कामासाठी निघून जात आहे. या भागातील पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतलेले तरुण आता शहरांकडे धाव घेत आहेत. माळपठार भागात धरण ऊराशी असताना शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळत नाही. २४ तास वीज नाही की दळणवळणाच्या सोयी नाही. सधन शेतकरी आता निर्धन झाले आहे. तेव्हा शेतकऱ्यांना संघटित करून उपसा सिंचन योजनेचा लाभ त्यांना मिळवून देण्यासाठी शासन दरबारी लढा देणार असल्याचे सचिन नाईक यांनी सांगितले.