शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; मध्य रेल्वेला फटका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
2
१८ महिने राहु-केतु गोचर: ५ मूलांकांना दुपटीने लाभ, गुंतवणुकीत फायदा; सुख-समृद्धी-भरभराट!
3
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
4
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
5
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
6
"तुझा नंबर पाठव, फ्लर्ट करायची इच्छा झालीये", टीव्ही अभिनेत्रीला दिग्गज मराठी अभिनेत्याचा मेसेज, म्हणाली- "तुझ्या बायकोला..."
7
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
8
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
9
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
10
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
11
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
12
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
13
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
14
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
15
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
16
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
17
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
18
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
19
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
20
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी

स्थायी समितीत शासनाचा निषेध

By admin | Updated: January 16, 2016 03:11 IST

संपूर्ण जिल्हा दुष्काळात होरपळत असताना राज्य शासनाने शेतकरी मदतीच्या नावाखाली केवळ पाच लाख रुपये मंजूर ...

जिल्हा परिषद : १२ हजार गावांना मदत नाकारल्याचा संताप, डिजिटलसाठी निधीचा ठराव यवतमाळ : संपूर्ण जिल्हा दुष्काळात होरपळत असताना राज्य शासनाने शेतकरी मदतीच्या नावाखाली केवळ पाच लाख रुपये मंजूर केल्याचे पडसाद शुक्रवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीतही उमटले. शासनाच्या निषेधाचा ठराव घेऊन सदस्यांनी आपला संताप व्यक्त केला. यवतमाळ जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा झाली. सभेच्या सुरुवातीला दुष्काळी मदतीचा मुद्दा चर्चेला आला. जिल्ह्यातील शेतकरी अडचणीचा सामना करीत आहे. शासनाने ९ नोव्हेंबर २०१५ मध्ये जाहीर केलेल्या यादीत जिल्ह्याचा समावेश केला नाही. परिणामी शेतकऱ्यांना अडचणीत कोणतीच मदत शासनाकडून मिळालेली नाही. आज चार लाख १७ हजार शेतकरी वाऱ्यावर आहेत. या शेतकऱ्यांना १५ दिवसाच्या आत शासनाने मदत जाहीर करावी, अशी मागणीही समितीने ठरावातून केली आहे. तसेच शासनाच्या निषेधाचा ठरावही करण्यात आला. जिल्ह्यात शिक्षण हक्क कायद्यानुसार जिल्ह्यातील ३१८ शाळा बंद होणार आहे. या सर्व शाळा अतिदुर्गम भागातील आहेत. घाटंजी, पांढरकवडा, आर्णी, पुसद, राळेगाव, मारेगाव, झरी, बाभूळगाव, दारव्हा या मानव विकास निर्देशांक कमी असलेल्या तालुक्यातील शाळा आहेत. शासनाने या शाळा बंद करू नये असा ठराव स्थायी समितीने घेतला. अजूनही काही ठिकाणी इयत्ता पाचवी व आठवीला तज्ज्ञ विषय शिक्षक नसल्याचा मुद्दा सभेत चर्चेला आला. मानव विकासच्या तालुक्यातील सर्व शाळा डिजीटल करण्यासाठी मानव विकास मिशन व जिल्हा नियोजन समितीतून नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून द्यावा, अशा मागणीचा ठराव घेण्यात आला. सरपंचांना १४ व्या वित्त आयोगातील निधीच्या विनियोगाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी पंचायत समिती स्तरावर कार्यशाळा घेण्याचा ठराव झाला. बैठकीला सर्व सदस्य व विभाग प्रमुख उपस्थित होते. नवीन हॉलमध्ये पहिलीच सभा झाली. (कार्यालय प्रतिनिधी)