शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

राज्यातील सर्वच पिकांचे उत्पादन घटणार; सर्वेक्षणातील अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 11:28 IST

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खरीप व रबी हंगामात जवळपास सर्वच पिकांच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज शासनाच्या एका सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्देकपाशीला मोठा फटकाऊस उत्पादनात मात्र वाढ

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खरीप व रबी हंगामात जवळपास सर्वच पिकांच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज शासनाच्या एका सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे. यामागे निसर्गाच्या लहरीपणासह विविध कारणे सांगितली जात आहेत.पीक आणेवारीच्या धर्तीवर राज्यात खरीप व रबी हंगामात पिकाचे उत्पादन कसे राहू शकते, याचे सर्वेक्षण केले जाते. कमी मुदतीच्या पिकासाठी दोन तर दीर्घ मुदतीच्या पिकासाठी चार असे अंदाज वर्तविले जातात. प्रातिनिधीक स्वरूपात प्रत्येक भागात सर्वेक्षण करून अंतरिम अहवाल तयार केला जातो. २०१७-१८ चा दुसरा सर्वेक्षण अहवाल नुकताच पुढे आला. २०१६-१७ च्या अंतिम अहवालासोबत तुलना केली असता यंदाच्या दुसऱ्या अहवालात बहुतांश पिकांचे उत्पादन घटण्याचा अंदाज वर्तविला गेला आहे. त्यामध्ये भात, गहू, ज्वारी, मका, तूर, उडीद, चना, भूईमूग, सोयाबीन, कपाशी या प्रमुख पिकांचा समावेश आहे. त्याचवेळी ऊस उत्पादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत ३४ टक्क्याने अर्थात एक कोटी ७२ लाख १८ हजार ६०० टनाने वाढ होण्याचा अंदाज वर्तविला आहे.

तुरीचे उत्पादन चक्क अर्ध्यावरया अहवालानुसार, सर्वाधिक फटका हा तूर पिकाला बसणार आहे. तुरीचे उत्पादन ५१.०७ टक्क्याने घटण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्या खालोखाल गहू, भूईमूग, भात, उडद या पिकांचा समावेश आहे.

धान्य-तेलबिया उत्पादनात घटएकूणच धान्याचे उत्पादन २५.०२ टक्क्याने तर तेलबियांचे १८.०१ टक्क्याने घटण्याचा अंदाज आहे. पिकांचे आणखी दोन सर्वेक्षण बाकी असून त्यात उत्पादनात पुन्हा घट दिसून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कृषी उत्पादनातील ही घट शासनाच्या शेतकरी व कृषी क्षेत्राकडे होणाऱ्या दुर्लक्षाचा परिणाम मानला जातो.

कपाशीला ४५ लाख गाठींचा फटकायंदाच्या हंगामात गेल्या वर्षीच्या तुलनेत कपाशीचे उत्पादन तब्बल ४३ टक्क्याने घटण्याचा दुसऱ्या सर्वेक्षणातील अंदाज आहे. आतापर्यंतच्या पीक पाहणीत कपाशीच्या ४५ लाख ६६ हजार २०० गाठींचा (एक गाठ म्हणजे १७० किलो कापूस) फटका बसू शकतो. कपाशीवर या हंगामात गुलाबी बोंडअळीने आक्रमण केले होते. हे आक्रमण रोखण्यासाठी कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा होऊन राज्यात सुमारे ५० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तर हजारो बाधित झाले. उत्पादनातील ४३ टक्क्यांची घट पाहता कापसावर बोंडअळीचा हल्ला खरोखरच किती तीव्र असेल याचा अंदाज येतो.

टॅग्स :agricultureशेती