शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

राज्यातील सर्वच पिकांचे उत्पादन घटणार; सर्वेक्षणातील अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 11:28 IST

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खरीप व रबी हंगामात जवळपास सर्वच पिकांच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज शासनाच्या एका सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्देकपाशीला मोठा फटकाऊस उत्पादनात मात्र वाढ

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खरीप व रबी हंगामात जवळपास सर्वच पिकांच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज शासनाच्या एका सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे. यामागे निसर्गाच्या लहरीपणासह विविध कारणे सांगितली जात आहेत.पीक आणेवारीच्या धर्तीवर राज्यात खरीप व रबी हंगामात पिकाचे उत्पादन कसे राहू शकते, याचे सर्वेक्षण केले जाते. कमी मुदतीच्या पिकासाठी दोन तर दीर्घ मुदतीच्या पिकासाठी चार असे अंदाज वर्तविले जातात. प्रातिनिधीक स्वरूपात प्रत्येक भागात सर्वेक्षण करून अंतरिम अहवाल तयार केला जातो. २०१७-१८ चा दुसरा सर्वेक्षण अहवाल नुकताच पुढे आला. २०१६-१७ च्या अंतिम अहवालासोबत तुलना केली असता यंदाच्या दुसऱ्या अहवालात बहुतांश पिकांचे उत्पादन घटण्याचा अंदाज वर्तविला गेला आहे. त्यामध्ये भात, गहू, ज्वारी, मका, तूर, उडीद, चना, भूईमूग, सोयाबीन, कपाशी या प्रमुख पिकांचा समावेश आहे. त्याचवेळी ऊस उत्पादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत ३४ टक्क्याने अर्थात एक कोटी ७२ लाख १८ हजार ६०० टनाने वाढ होण्याचा अंदाज वर्तविला आहे.

तुरीचे उत्पादन चक्क अर्ध्यावरया अहवालानुसार, सर्वाधिक फटका हा तूर पिकाला बसणार आहे. तुरीचे उत्पादन ५१.०७ टक्क्याने घटण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्या खालोखाल गहू, भूईमूग, भात, उडद या पिकांचा समावेश आहे.

धान्य-तेलबिया उत्पादनात घटएकूणच धान्याचे उत्पादन २५.०२ टक्क्याने तर तेलबियांचे १८.०१ टक्क्याने घटण्याचा अंदाज आहे. पिकांचे आणखी दोन सर्वेक्षण बाकी असून त्यात उत्पादनात पुन्हा घट दिसून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कृषी उत्पादनातील ही घट शासनाच्या शेतकरी व कृषी क्षेत्राकडे होणाऱ्या दुर्लक्षाचा परिणाम मानला जातो.

कपाशीला ४५ लाख गाठींचा फटकायंदाच्या हंगामात गेल्या वर्षीच्या तुलनेत कपाशीचे उत्पादन तब्बल ४३ टक्क्याने घटण्याचा दुसऱ्या सर्वेक्षणातील अंदाज आहे. आतापर्यंतच्या पीक पाहणीत कपाशीच्या ४५ लाख ६६ हजार २०० गाठींचा (एक गाठ म्हणजे १७० किलो कापूस) फटका बसू शकतो. कपाशीवर या हंगामात गुलाबी बोंडअळीने आक्रमण केले होते. हे आक्रमण रोखण्यासाठी कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा होऊन राज्यात सुमारे ५० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तर हजारो बाधित झाले. उत्पादनातील ४३ टक्क्यांची घट पाहता कापसावर बोंडअळीचा हल्ला खरोखरच किती तीव्र असेल याचा अंदाज येतो.

टॅग्स :agricultureशेती