शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

राज्यातील सर्वच पिकांचे उत्पादन घटणार; सर्वेक्षणातील अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 11:28 IST

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खरीप व रबी हंगामात जवळपास सर्वच पिकांच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज शासनाच्या एका सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्देकपाशीला मोठा फटकाऊस उत्पादनात मात्र वाढ

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खरीप व रबी हंगामात जवळपास सर्वच पिकांच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज शासनाच्या एका सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे. यामागे निसर्गाच्या लहरीपणासह विविध कारणे सांगितली जात आहेत.पीक आणेवारीच्या धर्तीवर राज्यात खरीप व रबी हंगामात पिकाचे उत्पादन कसे राहू शकते, याचे सर्वेक्षण केले जाते. कमी मुदतीच्या पिकासाठी दोन तर दीर्घ मुदतीच्या पिकासाठी चार असे अंदाज वर्तविले जातात. प्रातिनिधीक स्वरूपात प्रत्येक भागात सर्वेक्षण करून अंतरिम अहवाल तयार केला जातो. २०१७-१८ चा दुसरा सर्वेक्षण अहवाल नुकताच पुढे आला. २०१६-१७ च्या अंतिम अहवालासोबत तुलना केली असता यंदाच्या दुसऱ्या अहवालात बहुतांश पिकांचे उत्पादन घटण्याचा अंदाज वर्तविला गेला आहे. त्यामध्ये भात, गहू, ज्वारी, मका, तूर, उडीद, चना, भूईमूग, सोयाबीन, कपाशी या प्रमुख पिकांचा समावेश आहे. त्याचवेळी ऊस उत्पादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत ३४ टक्क्याने अर्थात एक कोटी ७२ लाख १८ हजार ६०० टनाने वाढ होण्याचा अंदाज वर्तविला आहे.

तुरीचे उत्पादन चक्क अर्ध्यावरया अहवालानुसार, सर्वाधिक फटका हा तूर पिकाला बसणार आहे. तुरीचे उत्पादन ५१.०७ टक्क्याने घटण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्या खालोखाल गहू, भूईमूग, भात, उडद या पिकांचा समावेश आहे.

धान्य-तेलबिया उत्पादनात घटएकूणच धान्याचे उत्पादन २५.०२ टक्क्याने तर तेलबियांचे १८.०१ टक्क्याने घटण्याचा अंदाज आहे. पिकांचे आणखी दोन सर्वेक्षण बाकी असून त्यात उत्पादनात पुन्हा घट दिसून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कृषी उत्पादनातील ही घट शासनाच्या शेतकरी व कृषी क्षेत्राकडे होणाऱ्या दुर्लक्षाचा परिणाम मानला जातो.

कपाशीला ४५ लाख गाठींचा फटकायंदाच्या हंगामात गेल्या वर्षीच्या तुलनेत कपाशीचे उत्पादन तब्बल ४३ टक्क्याने घटण्याचा दुसऱ्या सर्वेक्षणातील अंदाज आहे. आतापर्यंतच्या पीक पाहणीत कपाशीच्या ४५ लाख ६६ हजार २०० गाठींचा (एक गाठ म्हणजे १७० किलो कापूस) फटका बसू शकतो. कपाशीवर या हंगामात गुलाबी बोंडअळीने आक्रमण केले होते. हे आक्रमण रोखण्यासाठी कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा होऊन राज्यात सुमारे ५० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तर हजारो बाधित झाले. उत्पादनातील ४३ टक्क्यांची घट पाहता कापसावर बोंडअळीचा हल्ला खरोखरच किती तीव्र असेल याचा अंदाज येतो.

टॅग्स :agricultureशेती