शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

विज्ञाननिष्ठ स्वतंत्र विचाराची प्रक्रिया म्हणजे प्रबोधन

By admin | Updated: January 24, 2015 23:02 IST

माणूस जन्माला आल्यापासूनच प्रबोधन युगाचा प्रारंभ झाला आहे. इतिहासात मात्र १४ व्या शतकापासून प्रबोधन युग सुरू झाल्याचा उललेख आहे. नवविचारांची प्रक्रिया सुरू होणे म्हणजेच प्रबोधन.

यवतमाळ : माणूस जन्माला आल्यापासूनच प्रबोधन युगाचा प्रारंभ झाला आहे. इतिहासात मात्र १४ व्या शतकापासून प्रबोधन युग सुरू झाल्याचा उललेख आहे. नवविचारांची प्रक्रिया सुरू होणे म्हणजेच प्रबोधन. आहे त्या परिस्थितीत चांगले जीवन जगण्याचा ध्यास हाच प्रबोधनाचा मूळ हेतू असतो. जोपर्यंत माणसाच्या मनात ‘का’ हा प्रश्न निर्माण होत नाही तोपर्यंत त्यांच्या जगण्याला माणूस म्हणून अर्थ प्राप्त होत नाही, असे प्रतिपादन प्रा.डॉ. यशवंत मनोहर यांनी केले.येथे आयोजित डॉ. वि.भि. कोलते स्मृती व्याख्यानमालेत त्यांनी ‘प्रबोधनाची अंतहीन प्रक्रिया’ या विषयावर दुसरे पुष्प गुंफले. ते म्हणाले, आपल्या आयुष्यातील गुंता स्वत: सोडवावा लागतो. हा गुंता सोडविण्यासाठी कोणीतरी येणार, असा विचार मनात आला की मन पंगू होते, दुबळे होते. पृथ्वीवर आज ईश्वरशाहीची नाही तर लोकशाहीची गरज आहे. विचार करण्याची शक्तीच आपल्याला माणूस म्हणून प्रस्थापित करीत असते. विचारांची सत्ता प्रस्थापित होणे हा प्रबोधनाचा अर्थ आहे. या प्रबोधनाचे पहिले शिल्पकार महात्मा फुले आणि सावित्रीआई फुले आहेत.प्रबोधनाची प्रक्रिया कधीच थांबणारी नाही. माणूस दर क्षणी निर्माण होणाऱ्या आणि नष्ट होणाऱ्या पेशींमुळे नव्याने जन्माला येत असतो. एका जन्मात अनंत जन्म घेणे हाच पुनर्जन्म असतो. तो महावीर आणि गौतम बुद्धाने अनुभवला होता. पाश्चात्यांच्या अगोदर भारतात लोकायत, बुद्ध आणि जैन तत्त्वज्ञानाचे प्रबोधन केले आहे. भारतीय आणि पाश्चात्य प्रबोधनाचे प्रतिबिंब भारतीय संविधानात पडलेले आहे. प्रबोधन ही माणसाची प्रकृती आहे, किंबहुना माणूस हाच प्रबोधनाचे प्रतिक आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही, असे डॉ. मनोहर म्हणाले.व्याख्यानापूर्वी आचार्य पदवी विभूषित डॉ. कल्पना पांडे यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संचालन प्रा. घनश्याम दरणे, परिचय डॉ. रमाकांत कोलते यांनी तर आभार प्रा. कमल राठोड यांनी मानले. (सांस्कृतिक प्रतिनिधी)