शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
4
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
5
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
6
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
7
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
8
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
9
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
10
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
11
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
12
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
13
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
14
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
15
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
16
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
17
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
18
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
19
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
20
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका

विज्ञाननिष्ठ स्वतंत्र विचाराची प्रक्रिया म्हणजे प्रबोधन

By admin | Updated: January 24, 2015 23:02 IST

माणूस जन्माला आल्यापासूनच प्रबोधन युगाचा प्रारंभ झाला आहे. इतिहासात मात्र १४ व्या शतकापासून प्रबोधन युग सुरू झाल्याचा उललेख आहे. नवविचारांची प्रक्रिया सुरू होणे म्हणजेच प्रबोधन.

यवतमाळ : माणूस जन्माला आल्यापासूनच प्रबोधन युगाचा प्रारंभ झाला आहे. इतिहासात मात्र १४ व्या शतकापासून प्रबोधन युग सुरू झाल्याचा उललेख आहे. नवविचारांची प्रक्रिया सुरू होणे म्हणजेच प्रबोधन. आहे त्या परिस्थितीत चांगले जीवन जगण्याचा ध्यास हाच प्रबोधनाचा मूळ हेतू असतो. जोपर्यंत माणसाच्या मनात ‘का’ हा प्रश्न निर्माण होत नाही तोपर्यंत त्यांच्या जगण्याला माणूस म्हणून अर्थ प्राप्त होत नाही, असे प्रतिपादन प्रा.डॉ. यशवंत मनोहर यांनी केले.येथे आयोजित डॉ. वि.भि. कोलते स्मृती व्याख्यानमालेत त्यांनी ‘प्रबोधनाची अंतहीन प्रक्रिया’ या विषयावर दुसरे पुष्प गुंफले. ते म्हणाले, आपल्या आयुष्यातील गुंता स्वत: सोडवावा लागतो. हा गुंता सोडविण्यासाठी कोणीतरी येणार, असा विचार मनात आला की मन पंगू होते, दुबळे होते. पृथ्वीवर आज ईश्वरशाहीची नाही तर लोकशाहीची गरज आहे. विचार करण्याची शक्तीच आपल्याला माणूस म्हणून प्रस्थापित करीत असते. विचारांची सत्ता प्रस्थापित होणे हा प्रबोधनाचा अर्थ आहे. या प्रबोधनाचे पहिले शिल्पकार महात्मा फुले आणि सावित्रीआई फुले आहेत.प्रबोधनाची प्रक्रिया कधीच थांबणारी नाही. माणूस दर क्षणी निर्माण होणाऱ्या आणि नष्ट होणाऱ्या पेशींमुळे नव्याने जन्माला येत असतो. एका जन्मात अनंत जन्म घेणे हाच पुनर्जन्म असतो. तो महावीर आणि गौतम बुद्धाने अनुभवला होता. पाश्चात्यांच्या अगोदर भारतात लोकायत, बुद्ध आणि जैन तत्त्वज्ञानाचे प्रबोधन केले आहे. भारतीय आणि पाश्चात्य प्रबोधनाचे प्रतिबिंब भारतीय संविधानात पडलेले आहे. प्रबोधन ही माणसाची प्रकृती आहे, किंबहुना माणूस हाच प्रबोधनाचे प्रतिक आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही, असे डॉ. मनोहर म्हणाले.व्याख्यानापूर्वी आचार्य पदवी विभूषित डॉ. कल्पना पांडे यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संचालन प्रा. घनश्याम दरणे, परिचय डॉ. रमाकांत कोलते यांनी तर आभार प्रा. कमल राठोड यांनी मानले. (सांस्कृतिक प्रतिनिधी)