शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विज्ञाननिष्ठ स्वतंत्र विचाराची प्रक्रिया म्हणजे प्रबोधन

By admin | Updated: January 24, 2015 23:02 IST

माणूस जन्माला आल्यापासूनच प्रबोधन युगाचा प्रारंभ झाला आहे. इतिहासात मात्र १४ व्या शतकापासून प्रबोधन युग सुरू झाल्याचा उललेख आहे. नवविचारांची प्रक्रिया सुरू होणे म्हणजेच प्रबोधन.

यवतमाळ : माणूस जन्माला आल्यापासूनच प्रबोधन युगाचा प्रारंभ झाला आहे. इतिहासात मात्र १४ व्या शतकापासून प्रबोधन युग सुरू झाल्याचा उललेख आहे. नवविचारांची प्रक्रिया सुरू होणे म्हणजेच प्रबोधन. आहे त्या परिस्थितीत चांगले जीवन जगण्याचा ध्यास हाच प्रबोधनाचा मूळ हेतू असतो. जोपर्यंत माणसाच्या मनात ‘का’ हा प्रश्न निर्माण होत नाही तोपर्यंत त्यांच्या जगण्याला माणूस म्हणून अर्थ प्राप्त होत नाही, असे प्रतिपादन प्रा.डॉ. यशवंत मनोहर यांनी केले.येथे आयोजित डॉ. वि.भि. कोलते स्मृती व्याख्यानमालेत त्यांनी ‘प्रबोधनाची अंतहीन प्रक्रिया’ या विषयावर दुसरे पुष्प गुंफले. ते म्हणाले, आपल्या आयुष्यातील गुंता स्वत: सोडवावा लागतो. हा गुंता सोडविण्यासाठी कोणीतरी येणार, असा विचार मनात आला की मन पंगू होते, दुबळे होते. पृथ्वीवर आज ईश्वरशाहीची नाही तर लोकशाहीची गरज आहे. विचार करण्याची शक्तीच आपल्याला माणूस म्हणून प्रस्थापित करीत असते. विचारांची सत्ता प्रस्थापित होणे हा प्रबोधनाचा अर्थ आहे. या प्रबोधनाचे पहिले शिल्पकार महात्मा फुले आणि सावित्रीआई फुले आहेत.प्रबोधनाची प्रक्रिया कधीच थांबणारी नाही. माणूस दर क्षणी निर्माण होणाऱ्या आणि नष्ट होणाऱ्या पेशींमुळे नव्याने जन्माला येत असतो. एका जन्मात अनंत जन्म घेणे हाच पुनर्जन्म असतो. तो महावीर आणि गौतम बुद्धाने अनुभवला होता. पाश्चात्यांच्या अगोदर भारतात लोकायत, बुद्ध आणि जैन तत्त्वज्ञानाचे प्रबोधन केले आहे. भारतीय आणि पाश्चात्य प्रबोधनाचे प्रतिबिंब भारतीय संविधानात पडलेले आहे. प्रबोधन ही माणसाची प्रकृती आहे, किंबहुना माणूस हाच प्रबोधनाचे प्रतिक आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही, असे डॉ. मनोहर म्हणाले.व्याख्यानापूर्वी आचार्य पदवी विभूषित डॉ. कल्पना पांडे यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संचालन प्रा. घनश्याम दरणे, परिचय डॉ. रमाकांत कोलते यांनी तर आभार प्रा. कमल राठोड यांनी मानले. (सांस्कृतिक प्रतिनिधी)