शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

गावातील समस्यांची गावातच व्हावी सोडवणूक

By admin | Updated: September 8, 2015 04:36 IST

सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना आहे. गावकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेतला पाहिजे. समस्यांची

यवतमाळ : सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना आहे. गावकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेतला पाहिजे. समस्यांची सोडवणूक गावातच होऊ शकते. ग्राम समाधान शिबिराच्या माध्यमातून नागरिकांची कामे गावातच व्हावी, असा प्रयत्न असून त्यासाठी गावकऱ्यांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.दिग्रस तालुक्यातील डोळंबा व महागाव येथे शुक्रवारी ग्राम समाधान शिबिर झाले. त्यावेळी ते बोलत होते. या शिबिरास जिल्हा परिषद सदस्य दिवाकर राठोड, रुक्मिणी उकंडे, पंचायत समिती सदस्य अमोल मोरे, तहसीलदार नितीन देवरे, डॉ. विष्णू उकंडे, राजकुमार वानखडे, डोळंबा येथील सरपंच श्वेता जाधव, महागाव येथील सरपंच प्रभू जाधव, उपसरपंच भीमराव नाटकर उपस्थित होते.दोनही शिबिरास गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आधारकार्ड नोंदणीसोबतच गावकऱ्यांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यात आले. दोनही ठिकाणी २२ विविध शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते. नागरिकांच्या तक्रारी स्वीकारून त्या निकाली काढण्याचे काम दिवसभर ग्राम समाधान शिबिरात सुरु होते. उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री संजय राठोड यांनी विविध शासकीय योजनांची उदाहरणे दिली. प्रत्येकाने शासकीय योजना समजून संबंधित कार्यालयांमध्ये अर्ज दाखल केले पाहिजे, असे आवाहन केले. शासनाच्या योजना गावात व लाभार्थ्यांच्या घरात याव्या यासाठी प्रयत्न सुरु आहे. त्या अनुषंगानेच ग्राम समाधान शिबिराचे आयोजन केले जात आहे. या ठिकाणी संजय गांधी, इंदिरा गांधी, श्रावणबाळ योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी अर्ज भरुन घेतले जात आहे. प्रलंबित फेरफार, भूमिहीन मजुरांना अन्न सुरक्षेचा लाभ, विहीर नसणाऱ्यांना विहिरींचा लाभ देण्यासाठी शिबिरातून प्रयत्न केले जात असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. जिल्ह्यासाठी विहिरीचा कोटा वाढवून घेण्याचा प्रयत्न आहे. यासाठी शेतकऱ्यांनीही पुढाकार घेणे आवश्यक आहे. गावातील प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय असले पाहिजे. ज्यांच्याकडे शौचालय नाही त्यांनी तातडीने बांधून घ्यावे. यासाठी शासन अनुदान देत असल्याचेही पालकमंत्री म्हणाले.शिबिरात विविध प्रकारचे दाखले, फेरफार, आधारकार्ड, निराधार अनुदान, अन्नसुरक्षा, शिधापत्रिकांसाठी नागरिकांकडून अर्ज भरुन घेण्यात आले. यावेळी दाखल झालेल्या अनेक तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करण्यात आली. पालकमंत्र्यांच्या हस्ते शौचालय अनुदान, विविध प्रकारचे प्रमाणपत्र, शिधापत्रिकांचे वाटप काही लाभार्थ्यांना करण्यात आले.(स्थानिक प्रतिनिधी)