शहरं
Join us  
Trending Stories
1
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
2
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
3
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
4
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
5
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
6
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
7
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
8
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
9
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
10
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
11
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
13
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
14
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
15
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
16
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
17
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
18
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
19
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
20
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...

घाटंजी तालुक्यातील समस्या वाऱ्यावर

By admin | Updated: May 9, 2016 02:31 IST

प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून तालुक्यातील प्रश्न दुर्लक्षित आहे. पाणी, रस्ते, नाल्या, वीज या व इतर समस्या ..

पाणीटंचाईवर प्रभावी उपाय नाही : रस्ते आणि विजेच्या प्रश्नामुळे नागरिक हतबलघाटंजी : प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून तालुक्यातील प्रश्न दुर्लक्षित आहे. पाणी, रस्ते, नाल्या, वीज या व इतर समस्या निकाली काढण्यासाठी कुणाकडूनही प्रभावी उपाययोजना केल्या जात नाही. याचा त्रास मात्र नागरिकांना सहन करावा लागत आहे. तालुक्यातील अनेक गावांना उन्हाळ्यात भीषण पाणीप्रश्नाला सामोरे जावे लागते. आजही अनेक गावांमध्ये हा प्रश्न गंभीर झालेला आहे. विहिरींचे अधिग्रहण, नवीन विंधन विहिरी, टँकर या तकलादू उपाययोजना केल्या जातात. उन्हाळा संपताच पाणीटंचाई हा विषयही मागे पडतो. परिसरात मोठमोठ्या नद्या आहेत. त्यावर बांध टाकण्यात आलेले आहे. मात्र त्यात पुरेसे पाणी अडत नाही. परिसरातील जलस्रोतांची पातळी टिकून राहण्यास या उपाययोजना प्रभावी ठरू शकतात. मात्र त्यादृष्टीने प्रयत्न होत नाही. विविध गावांसाठीचे रस्ते खड्डामय झालेले आहे. वाहनधारकांना मार्ग काढण्यासाठी चांगला रस्ता शोधावा लागतो. खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटून अपघाताच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. ही मुख्य रस्त्याची समस्या आहे. गावातील अंतर्गत रस्तेही दयनीय स्थितीत आहे. काँक्रिट रस्त्यांना भेगा पडलेल्या आहे. काही ठिकाणी काँक्रिट उखडल्याने खड्डे पडलेले आहेत. यावरून सदर कामांचा दर्जा कसा असेल, हे स्पष्ट होते. कामात गैरप्रकार झाल्याचे धडधडीत दिसत असतानाही संबंधित कंत्राटदार अथवा अधिकाऱ्यांवर कारवाईचे सौजन्य दाखविले जात नाही. गावांमध्ये सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाल्या नाहीत. असल्या तरी कचऱ्याने तुंबलेल्या आहेत. रस्त्यावरून वाहणारे सांडपाणी आणि जागोजागी तयार झालेली गटारं यामुळे लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. सांडपाण्याची दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव या बाबी झोप उडविणाऱ्या ठरत आहे. ग्रामपंचायतीचे कर्मचारी हा विषय कानावरही घेत नाही. पदाधिकारी आणि ग्रामसचिवांचे मात्र त्यांच्यावर नियंत्रण नाही. पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांकडे मांडलेले प्रश्न सोडविले जात नाही. सांडपाण्याच्या प्रकारावरून गावांमध्ये भांडणतंट्यांचे प्रकार वाढलेले आहे. तालुक्याच्या काही गावातील वीज पुरवठा वारंवार खंडित होतो. याचा परिणाम काही लोकांच्या व्यवसायावर होतो. पाणीपुरवठ्याच्या योजनाही सदर बाबीमुळे प्रभावित होतात. विद्युत कंपनीचे अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी राहात नाही. ग्रामीण भागात एकदा गुल झालेली वीज केव्हा येईल, याचा कुठलाही नेम नाही. आधीच विजेचा कमी तास पुरवठा, त्यातही लपंडाव यामुळे वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत. या सर्व प्रश्नांकडे तालुका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)