शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आर्णीत कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 23:51 IST

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पुकारण्यात आलेल्या आर्णी बंदला मंगळवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. तसेच आमदार ख्वाजा बेग यांच्या नेतृत्वात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देराष्ट्रवादीचा मोर्चा : तहसीलदारांना निवेदन, दाभडी येथे लावला सरकारच्या निषेधाचा फलक

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पुकारण्यात आलेल्या आर्णी बंदला मंगळवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. तसेच आमदार ख्वाजा बेग यांच्या नेतृत्वात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.तूर, हरभरा खरेदीचा प्रश्न, पीक विम्याची न मिळालेली रक्कम, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न अद्यापही सुटला नाही. शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. या सर्व प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आर्णी शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत संपूर्ण शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर शेतकऱ्यांची सभा झाली. त्यानंतर मुख्य मार्गाने आर्णी तहसीलवर मोर्चा काढण्यात आला.यावेळी आमदार ख्वाजा बेग, बाजार समिती सभापती राजू पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे, रवींद्र नालमवार, शेखर खंदार, चिराग शाह, उमेश ठाकरे, उमेद फानन, खलील बेग, अमीन भाटी, ज्योत्स्ना ठाकरे, निलंकुश चव्हाण, यासीम नागानी, राजू गावंडे, राजन भागवत, गणेश मोरे, परशराम राठोड, फिरोज सोलंकी, गोपाल कोठारी, मुबारक तंवर, रामेश्वर चौधरी, संदीप बुटले, तुकाराम आडे आदी उपस्थित होते.दरम्यान केंद्र व राज्य सरकारच्या निषेधाचा फलक तालुक्यातील दाभडी येथे लावण्यात आला. त्यावर ‘क्या हुआ तेरा वादा’ असे लिहिण्यात आले होते.

टॅग्स :Morchaमोर्चा