शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
2
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
3
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
4
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
5
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
6
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
7
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
8
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
9
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
10
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
11
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
12
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
13
IPL Auction 2026 LIVE: केकेआरचा मोठा डाव, कॅमरून ग्रीनपाठोपाठ पतिरानावर लावली विक्रमी बोली
14
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
15
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉसह सरफराज खानला कुणीच दिला नाही भाव; सलग दुसऱ्यांदा 'अनसोल्ड'चा ठपका
16
खळबळजनक! लेकीच्या कस्टडीसाठी पतीने रचला भयंकर प्लॅन; टीव्ही अभिनेत्री पत्नीला केलं किडनॅप
17
नाईट क्लब आग प्रकरणी फरार लुथरा बंधूंना दिल्लीत आणले; थायलंडला पळून गेले होते
18
कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! मार्च २०२६ पूर्वी मिळणार मोठं गिफ्ट, सरकारनं दिली महत्त्वाची माहिती
19
सेकंदात तयार होणारी मॅगी कॅप्सूल खरी की खोटी? ४० मिलियन लोकांनी बघितलेल्या व्हिडीओचं सत्य काय?
20
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या लोकांनी पायात काळा धागा बांधू नये; होतो दुष्परिणाम!
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान कौशल्यवृद्धी योजना कागदावरच

By admin | Updated: March 1, 2017 01:16 IST

जिल्ह्यात कौशल्यवृद्धी कार्यक्रम केवळ कागदोपत्रीच राबविला जात असल्याचे स्पष्ट होत आहे.

थेट दिल्लीतून नियंत्रण: एका प्रतिष्ठानकडून २००९ ची पुनरावृत्ती सुरेंद्र राऊत   यवतमाळ जिल्ह्यात कौशल्यवृद्धी कार्यक्रम केवळ कागदोपत्रीच राबविला जात असल्याचे स्पष्ट होत आहे. एका प्रतिष्ठनाकडून चक्क शासनाची धूळफेक सुरू आहे. बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळावे म्हणून कौशल्यवृद्धी कार्यक्रम राबविला जात आहे. पूर्वी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेकडून हा उपक्रम राबविण्यात येत होता. मात्र त्यात मोठ्या प्रमाणात एका प्रतिष्ठानने अपहार केला. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी भाजप सरकारने प्रधानमंत्री कौशल्य योजनेंतर्गत (आरपीएल प्रोजेक्ट) स्किल इंडिया कार्ड हा आॅनलाईन कार्यक्रम आखला. मात्र यालाही जिल्ह्यात त्याच प्रतिष्ठानच्या संचालकांकडून कागदोपत्रीच राबविले जात असल्याची माहिती अहे. दहावी अनुत्तीर्ण, आठवी उत्तीर्ण युवकांना रोजगार मिळणे शक्य नाही. त्यांच्यात कौशल्यवृद्धी झाल्यास त्यांना चांगला रोजगार मिळू शकतो. अशा युवकांसाठी ईलेक्ट्रीशन, प्लंबिंग, मोबाईल रिपेअरिंग, वाहन दुरुस्ती, असे अनेक प्रशिक्षण वर्ग राबविण्यात येते. यासाठी भाजपा सरकारने दिल्लीतील मानव विकास मंत्रालयाकडून काही विशिष्ट संस्थांची निवड केली. यवतमाळातील एका प्रतिष्ठानने नाव बदलून हा कार्यक्रम हाती घेतला. यात एका युवकावर शासनाकडून २६०० रुपये खर्च केले जातात. ही रक्कम संस्थेला मिळते. या प्रतिष्ठानच्या संचालकाने इंटरनेट साक्षर करण्याच्या बहाण्याने जिल्ह्यातील १५ ते २० हजार बेरोजगारांची यादी तयार केली. त्यांच्याकडून फोटो, आधारकार्ड, बँक पासबुक, मार्कसिट, अशी महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत केली. आता याच मुलांना कौशल्यवृद्धी कार्यक्रमातून विविध प्रशिक्षण दिल्याचे कागदोपत्री दाखविले जात आहे. जिल्ह्यात एकही केंद्र प्रत्यक्षात सुरू नाही. इतकेच काय तर सत्ताधारी पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने शिवाजीनगर परिसरात असे प्रशिक्षण केंद्र सुरू केले. नंतर काही दिवसातच ते केंद्र गुंडाळण्यात आले. आघाडी सरकारच्या काळात २००९ मध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून हा कार्यक्रम राबविण्यात येत होता. त्यावेळी याच प्रतिष्ठानच्या संचालकाने कागदोपत्री प्रशिक्षण दिल्याचे दाखवून कोट्यवधी रुपये हडपले होते. याची चौकशीही झाली. मात्र आर्थिक व्यवहारातून या प्रतिष्ठानच्या संचालकाने स्वत:ची सुटका करून घेतली. आता कौशल्यवृद्धी कार्यक्रम थेट दिल्लीतून राबविला जात असल्याने या प्रतिष्ठानच्या संचालकाने दिल्लीशी संधान साधले आहे. या माध्यमातून चार राज्यांचे काम मिळविले. पुणे येथील प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातूनही अनेक कोर्सेस कागदोपत्रीच राबविले जात आहे. ‘स्किल इंडिया कार्ड’ अद्यापपर्यंत अनेकांना मिळालेले नाही. या प्रतिष्ठानच्या संचालकाने विदेशातून फंडींग मिळविण्यासाठीही हालचाली सुरू केल्या आहे. उपक्रमाच्या बातम्या प्रसिद्ध करून आंतरराष्ट्रीय स्तरावरून अर्थार्जनाचा मोठा मार्गच त्यांनी शोधला आहे.