शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

पंतप्रधान कौशल्यवृद्धी योजना कागदावरच

By admin | Updated: March 1, 2017 01:16 IST

जिल्ह्यात कौशल्यवृद्धी कार्यक्रम केवळ कागदोपत्रीच राबविला जात असल्याचे स्पष्ट होत आहे.

थेट दिल्लीतून नियंत्रण: एका प्रतिष्ठानकडून २००९ ची पुनरावृत्ती सुरेंद्र राऊत   यवतमाळ जिल्ह्यात कौशल्यवृद्धी कार्यक्रम केवळ कागदोपत्रीच राबविला जात असल्याचे स्पष्ट होत आहे. एका प्रतिष्ठनाकडून चक्क शासनाची धूळफेक सुरू आहे. बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळावे म्हणून कौशल्यवृद्धी कार्यक्रम राबविला जात आहे. पूर्वी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेकडून हा उपक्रम राबविण्यात येत होता. मात्र त्यात मोठ्या प्रमाणात एका प्रतिष्ठानने अपहार केला. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी भाजप सरकारने प्रधानमंत्री कौशल्य योजनेंतर्गत (आरपीएल प्रोजेक्ट) स्किल इंडिया कार्ड हा आॅनलाईन कार्यक्रम आखला. मात्र यालाही जिल्ह्यात त्याच प्रतिष्ठानच्या संचालकांकडून कागदोपत्रीच राबविले जात असल्याची माहिती अहे. दहावी अनुत्तीर्ण, आठवी उत्तीर्ण युवकांना रोजगार मिळणे शक्य नाही. त्यांच्यात कौशल्यवृद्धी झाल्यास त्यांना चांगला रोजगार मिळू शकतो. अशा युवकांसाठी ईलेक्ट्रीशन, प्लंबिंग, मोबाईल रिपेअरिंग, वाहन दुरुस्ती, असे अनेक प्रशिक्षण वर्ग राबविण्यात येते. यासाठी भाजपा सरकारने दिल्लीतील मानव विकास मंत्रालयाकडून काही विशिष्ट संस्थांची निवड केली. यवतमाळातील एका प्रतिष्ठानने नाव बदलून हा कार्यक्रम हाती घेतला. यात एका युवकावर शासनाकडून २६०० रुपये खर्च केले जातात. ही रक्कम संस्थेला मिळते. या प्रतिष्ठानच्या संचालकाने इंटरनेट साक्षर करण्याच्या बहाण्याने जिल्ह्यातील १५ ते २० हजार बेरोजगारांची यादी तयार केली. त्यांच्याकडून फोटो, आधारकार्ड, बँक पासबुक, मार्कसिट, अशी महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत केली. आता याच मुलांना कौशल्यवृद्धी कार्यक्रमातून विविध प्रशिक्षण दिल्याचे कागदोपत्री दाखविले जात आहे. जिल्ह्यात एकही केंद्र प्रत्यक्षात सुरू नाही. इतकेच काय तर सत्ताधारी पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने शिवाजीनगर परिसरात असे प्रशिक्षण केंद्र सुरू केले. नंतर काही दिवसातच ते केंद्र गुंडाळण्यात आले. आघाडी सरकारच्या काळात २००९ मध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून हा कार्यक्रम राबविण्यात येत होता. त्यावेळी याच प्रतिष्ठानच्या संचालकाने कागदोपत्री प्रशिक्षण दिल्याचे दाखवून कोट्यवधी रुपये हडपले होते. याची चौकशीही झाली. मात्र आर्थिक व्यवहारातून या प्रतिष्ठानच्या संचालकाने स्वत:ची सुटका करून घेतली. आता कौशल्यवृद्धी कार्यक्रम थेट दिल्लीतून राबविला जात असल्याने या प्रतिष्ठानच्या संचालकाने दिल्लीशी संधान साधले आहे. या माध्यमातून चार राज्यांचे काम मिळविले. पुणे येथील प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातूनही अनेक कोर्सेस कागदोपत्रीच राबविले जात आहे. ‘स्किल इंडिया कार्ड’ अद्यापपर्यंत अनेकांना मिळालेले नाही. या प्रतिष्ठानच्या संचालकाने विदेशातून फंडींग मिळविण्यासाठीही हालचाली सुरू केल्या आहे. उपक्रमाच्या बातम्या प्रसिद्ध करून आंतरराष्ट्रीय स्तरावरून अर्थार्जनाचा मोठा मार्गच त्यांनी शोधला आहे.